शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:24 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी शालिनी सिंह या कर्तव्यकठोर महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविली आहे.

नववर्षाच्या पहिल्याच पहाटे राजधानी दिल्ली हादरली. आणखी एक कळी पूर्ण उमलण्यापूर्वीच खुडली गेली. नववर्षाचे आगमन हर्षोल्लासात साजरे करण्याचा उत्साह तिला थेट आयुष्याच्या मावळतीकडेच घेऊन गेला. नववर्षातील जीवनाची स्वप्ने रंगवीत स्कूटरवर घराकडे परतत असताना, पाच दारूड्यांच्या बेफामपणाने तिला तिच्या स्वप्नांसह कारखाली चिरडून टाकले. पहाटेच्या त्या अत्यंत पीडादायक घटनेचे हादरे अजूनही सुरूच आहेत. नवनवे खुलासे होत आहेत. नवनवी तथ्ये समोर येत आहेत. प्रारंभिक माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेली युवती घराकडे परतत असताना आरोपींच्या कारसोबत तिच्या स्कूटरचा अपघात होऊन ती कारखाली सापडली; परंतु नशेत असलेल्या युवकांनी तिला तसेच फरफटत नेले. त्यामुळे तिच्या हाडांचा अक्षरशः चुराडा झाला. तिच्या अंगावर एकही वस्त्र शिल्लक राहिले नाही.

अंगावर शहारे आणणारे हे दृश्य बघून कुणीतरी ते पोलिसांना कळविले तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. नेहमीप्रमाणे या घटनेतही, अकर्मण्यता, अकार्यक्षमता, संवेदनहीनता ही दिल्ली पोलिसांची गुणवैशिष्ट्ये पुन्हा एकदा समोर आली. पोलिसांनी प्रारंभिक टप्प्यात ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळले, त्याची निंदा करावी तेवढी थोडीच! प्रारंभिक वृत्तांनुसार, गाडीखाली आलेल्या युवतीला आरोपी पाच किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले; पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, ते अंतर पाच नव्हे, तर १३ किलोमीटर एवढे होते. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या रात्री तालुका मुख्यालयीदेखील रात्रभर रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त असतो. मग देशाच्या राजधानीतील एकाही पोलिसाला भर रस्त्यावर माणुसकीची हत्या होताना दिसू नये? घटनेनंतर पोलिस उपायुक्तांनी केलेले वक्तव्य तर फारच असंवेदनशील आहे.

घडलेली घटना हा एक अपघात होता, असे ते म्हणाले. एका युवतीच्या गाडीला पाच दारुडे धडक देतात आणि त्यानंतर तिला तब्बल १३ किलोमीटर कारखाली फरफटत नेतात, ही घटना केवळ एक अपघात? घटनेसंदर्भात जी नवनवी माहिती समोर येत आहे, त्यानुसार घटना घडली तेव्हा युवती एकटी नव्हती, तर तिच्यासोबत एक मैत्रिणही होती, जी किरकोळ जखमी झाली आणि घाबरून घरी निघून गेली. ज्या मैत्रिणीसोबत आपण नववर्षाचे आगमन साजरे करायला जातो, त्या मैत्रिणीला कारखाली फरफटत नेल्यानंतरही पोलिसांना न कळविणे, हे संशयास्पद आहे. त्या दोघींनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती, तिथे त्यांना भेटायला काही पुरुष मित्र आले होते, नंतर त्या दोघींमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोघीही एकाच स्कूटरवर निघून गेल्या, असाही घटनाक्रम आता समोर आला आहे. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होते.

अर्थात त्या युवतींच्या वर्तणुकीमुळे पीडित युवतीसोबत जे घडले, त्याचे गांभीर्य कमी होत नाही. शिवाय आता एक नवे ‘सीसीटीव्ही फुटेज’ समोर आले आहे. त्यामध्ये आरोपींची कार आणि युवतींची स्कूटर परस्पर विरुद्ध दिशेने येताना दिसतात आणि कोणताही अपघात न होता निघून जातात. जर हे `सीसीटीव्ही फुटेज’ खरे असेल, तर याचा अर्थ दोन्ही गाड्या पुन्हा एकदा समोरासमोर आल्या असतील आणि तेव्हाच अपघात घडला असेल. हा निव्वळ योगायोग असण्याची शक्यता फार कमी!  मग आरोपी ‘यू टर्न’ घेऊन पुन्हा युवतींच्या गाडीसमोर आले असतील का? तसे असल्यास घडलेली घटना हा अपघात नव्हे, तर घातपातच ! या प्रकरणात दिल्ली पोलिसांप्रमाणेच राजकीय पक्षांनीही असंवेदनशीलतेचे प्रदर्शन घडविले. आरोपींपैकी एक जण भारतीय जनता पक्षाच्या ‘आयटी सेल’शी संबंधित आहे. या मुद्यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

भाजपदेखील प्रत्युत्तर देण्यात मागे नाही. नेमके तथ्य समोर आणून आरोपींना कठोरतम शिक्षा होईल, याची तजवीज करणे, हीच सध्याची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. दुर्दैवाने राजकीय पक्षांना नेमका याच गोष्टीचा विसर पडला असून, प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची स्पर्धा लागली आहे. हे अत्यंत उद्वेगजनक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी शालिनी सिंह या कर्तव्यकठोर महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविली आहे. ते उत्तमच झाले; पण देशातील इतर महानगरांच्या तुलनेत राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात, याचाही गंभीर विचार या निमित्ताने व्हायला हवा ! 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी