शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:57 IST

अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. 

हरीष गुप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत, हे लपून राहिलेले नाही. मोदी यांनी अनेकदा पवारांची जाहीर प्रशंसा केली असल्याने भाजपत काही वेळा बेचैनीही दिसली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही नाराज आहेत. शरद पवार यांनी दिलेले निमंत्रण मोदी आनंदाने स्वीकारतात आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये पवार कृषिमंत्री असताना त्यांनी आपल्याला कसे मार्गदर्शन केले, हेही सांगत असतात. मात्र, अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. 

‘भटकती आत्मा’, ‘गद्दार’, असे शब्द वापरायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शरद पवार अलीकडेच मोदींना भेटले आणि त्यांनी डाळिंबाची रोपे त्यांना भेट दिली, तेव्हापासून शाह यांनी पवारांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा या भेटीनंतर सुरू झाली होती. महाराष्ट्रातील महायुतीत त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वाभाविकच कोणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे आवश्यक होते. १९७८ साली वसंतदादांच्या सरकारमधून शरद पवार ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले; तो संदर्भ देऊन शाह यांनी पवार यांना गद्दार म्हटले. धोका, विश्वासघाताचे राजकारण पवार यांनी सुरू केले, असा आरोप त्यांनी केला. शाह गृहमंत्र्यांच्या पदाला शोभेसे वागत नाहीत, अशी प्रतिटीका करून शरद पवार यांनी त्यांना ‘तडीपार’ संबोधले. सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमध्ये प्रवेश करायला बंदी केली होती, यासंदर्भात हा उल्लेख होता. नंतर शाह यांनी पवारांवर पुन्हा हल्ला केला. देशाचे कृषिमंत्री असताना, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपला पवार यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही, हे दाखवण्यासाठी भाजपची ही विचारपूर्वक खेळलेली चाल आहे, असे अंतस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. संसदेत दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिडवत नाहीत.

उपसभापतीशिवाय सहा वर्षे

१७ व्या लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळात सभागृहाला उपसभापतीच नव्हता. १८ व्या लोकसभेतही तो मिळण्याची शक्यता धूसरच दिसते. परंपरेने उपसभापतिपद मुख्य विरोधी पक्षांकडे जाते. पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हते. त्यामुळे हे पद रिक्त राहिले. मात्र विरोधी पक्षांना द्यावे लागेल म्हणूनच हे पद रिकामे ठेवले जात आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. जवाहरलाल नेहरू यांनी ही प्रथा सुरू केली. १९५६ साली त्यांनी शिरोमणी अकाली दलचे सरदार हुकूमसिंग यांना उपसभापतिपदी नेमले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात अपक्ष खासदार जी. जी. स्वेल यांना या पदावर नेमले गेले. तोवर उपसभापतिपद काँग्रेसकडेच राहिले होते. त्यानंतर विरोधी पक्षाचा खासदार नेमला जाऊ लागला. १६ व्या लोकसभेपर्यंत ही परंपरा चालू होती. १७ व्या लोकसभेत मोदी सरकारने उपसभापती न नेमण्याचे ठरवले, तेव्हापासून हे पद रिकामे आहे. घटनेचे कलम ९३ सांगते की, लोकसभेने शक्य तितक्या लवकर सभापती आणि उपसभापतिपदासाठी दोन खासदारांची निवड करावयाची आहे. त्यामुळे सत्तापक्षाला या पदावरील नियुक्ती बेमुदत लांबवण्याची संधी मिळाली.

harish.gupta@lokmat.com 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह