शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:57 IST

अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. 

हरीष गुप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत, हे लपून राहिलेले नाही. मोदी यांनी अनेकदा पवारांची जाहीर प्रशंसा केली असल्याने भाजपत काही वेळा बेचैनीही दिसली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही नाराज आहेत. शरद पवार यांनी दिलेले निमंत्रण मोदी आनंदाने स्वीकारतात आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये पवार कृषिमंत्री असताना त्यांनी आपल्याला कसे मार्गदर्शन केले, हेही सांगत असतात. मात्र, अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. 

‘भटकती आत्मा’, ‘गद्दार’, असे शब्द वापरायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शरद पवार अलीकडेच मोदींना भेटले आणि त्यांनी डाळिंबाची रोपे त्यांना भेट दिली, तेव्हापासून शाह यांनी पवारांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा या भेटीनंतर सुरू झाली होती. महाराष्ट्रातील महायुतीत त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वाभाविकच कोणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे आवश्यक होते. १९७८ साली वसंतदादांच्या सरकारमधून शरद पवार ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले; तो संदर्भ देऊन शाह यांनी पवार यांना गद्दार म्हटले. धोका, विश्वासघाताचे राजकारण पवार यांनी सुरू केले, असा आरोप त्यांनी केला. शाह गृहमंत्र्यांच्या पदाला शोभेसे वागत नाहीत, अशी प्रतिटीका करून शरद पवार यांनी त्यांना ‘तडीपार’ संबोधले. सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमध्ये प्रवेश करायला बंदी केली होती, यासंदर्भात हा उल्लेख होता. नंतर शाह यांनी पवारांवर पुन्हा हल्ला केला. देशाचे कृषिमंत्री असताना, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपला पवार यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही, हे दाखवण्यासाठी भाजपची ही विचारपूर्वक खेळलेली चाल आहे, असे अंतस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. संसदेत दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिडवत नाहीत.

उपसभापतीशिवाय सहा वर्षे

१७ व्या लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळात सभागृहाला उपसभापतीच नव्हता. १८ व्या लोकसभेतही तो मिळण्याची शक्यता धूसरच दिसते. परंपरेने उपसभापतिपद मुख्य विरोधी पक्षांकडे जाते. पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हते. त्यामुळे हे पद रिक्त राहिले. मात्र विरोधी पक्षांना द्यावे लागेल म्हणूनच हे पद रिकामे ठेवले जात आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. जवाहरलाल नेहरू यांनी ही प्रथा सुरू केली. १९५६ साली त्यांनी शिरोमणी अकाली दलचे सरदार हुकूमसिंग यांना उपसभापतिपदी नेमले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात अपक्ष खासदार जी. जी. स्वेल यांना या पदावर नेमले गेले. तोवर उपसभापतिपद काँग्रेसकडेच राहिले होते. त्यानंतर विरोधी पक्षाचा खासदार नेमला जाऊ लागला. १६ व्या लोकसभेपर्यंत ही परंपरा चालू होती. १७ व्या लोकसभेत मोदी सरकारने उपसभापती न नेमण्याचे ठरवले, तेव्हापासून हे पद रिकामे आहे. घटनेचे कलम ९३ सांगते की, लोकसभेने शक्य तितक्या लवकर सभापती आणि उपसभापतिपदासाठी दोन खासदारांची निवड करावयाची आहे. त्यामुळे सत्तापक्षाला या पदावरील नियुक्ती बेमुदत लांबवण्याची संधी मिळाली.

harish.gupta@lokmat.com 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह