शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

हवेत कशाला वारकऱ्यांमध्ये धारकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 00:53 IST

परवा पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या दाखल झाल्या. त्या आधीपासूनच म्हणजे सकाळपासूनच वारक-यांचे जत्थे जत्थेच्या, तुळशीमाळा गळा घालून, पताका आणि नामघोषासह पुण्यात दाखल होत होेते. त्या सा-या वारक-यांचे स्वागत पुणेकर भक्तिभावाने करीत होते.

- रूपा कुळकर्णी बोधीपरवा पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या दाखल झाल्या. त्या आधीपासूनच म्हणजे सकाळपासूनच वारक-यांचे जत्थे जत्थेच्या, तुळशीमाळा गळा घालून, पताका आणि नामघोषासह पुण्यात दाखल होत होेते. त्या सा-या वारक-यांचे स्वागत पुणेकर भक्तिभावाने करीत होते. सा-याच वारक-यांच्या चेह-यांवर पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागल्याचे भाव दिसत असणार. त्यामुळे सारे वातावरण आपोआप भक्तिभावाने भारलेले आणि सात्विक बनून गेले असणार.कितीतरी मैल चालून आलेले असतात हे वारकरी. पुढेही पंढरपूरपर्यंत कितीतरी अंतर चालावयाचे असते. शनिवारी पुण्यात आल्यावर शांतपणे दोन दिवस मुक्काम करून पुढचा प्रवास हे वारकरी करतात. वारकºयांची ही नित्याची वहिवाट आहे. त्यांना विठूच्या भक्तीपुढे कशाचीही चिंता वाटत नाही, की ते स्वत:च्या सुरक्षेसाठी कुणावरही अवलंबून नसतात. टाळ-मृदंगाच्या तालात पुढे पुढे जाणाºया लक्षावधी वारकºयांच्या या पंढरपूर वारीकडे सारं जग आश्चर्याने पाहात आले आहे. इतकी शिस्त वारकरी पाळतात.त्यात मध्येच कुदून पडणारे हे धारकरी आहेत तरी कोण? आणि त्यांचा स्वयंघोषित नेता संभाजी भिडे हा तरी कोण आहे? भिडे गुरुजी नुसता मोकाट सुटला असून त्याचे उपद्रव समाजाला सतत त्रासदायक होत आहेत. मात्र महाराष्टÑ शासन त्याच्या या उपद्रवांना भिऊन सारी पोलीस यंत्रणा त्याच्या दिमतीला देते म्हणजे काय? या पालख्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या आगमनाच्या वेळी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी खरे तर पोलिसांची कुमक येत असते. परंतु परवा पुण्यात पोलीस पूर्णपणे संभाजी भिडेच्या दिमतीत होते. कारण त्याच्याबरोबर भगवे फेटे घातलेले शेकडो लोक होते आणि त्यांच्या हातात धारदार नंग्या तलवारी होत्या. म्हणून ते धारकरी. दिंडीतील वारकºयांचा, संभाजी भिडे व त्याच्या इशाºयावर त्या नंग्या तलवारी उपसून नाचणाºया तथाकथित दंगलखोर लोकांच्या येण्यास विरोध होता व गेल्या वर्षी भिडे अशा तलवार धाºयांसह सहभागी झाल्याने वाद निर्माण झाले होते. म्हणून यावर्षी त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. पण त्याला काडीचीही किंमत न देता पुण्याच्या जंगली महारात मंदिरात भिडे व त्यांचे तलवारधारी सहकारी ठाण मांडून बसले व तिथूून ते सारे वारीत घुसणार होते. पण त्यांना अडविण्यात सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि पालख्या व्यवस्थितपणे मार्गस्थ झाल्यावरच त्यांना सोडण्यात आले.भिडे गुरुजींचा संबंध दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांच्या घटनांशी आहे असे म्हटले जाते. भिडे व एकबोटे ही दोन नावे या हत्यांच्या संदर्भात घेण्यात येतात. परंतु साधे चौकशीसाठीही या माणसाला शासनाचे गुप्तहेर खाते पकडत नाही. आंबे खाऊन स्त्रियांना मुले होतात असा अजब शोध राजरोसपणे या माणसाने सोशल मीडियावरून सर्वत्र पसरविला. (त्याची भरपूर टवाळीही लोकांनी केली - मोठमोठ्या नेत्यांनीही केली.) त्यानंतर हे महाराज पुन्हा एकदा मनुस्मृतीबद्दल गुणगान करणारे काहीतरी आक्षेपार्ह बोलले. हा मनुष्य तरुणांची डोकी भडकवून त्यांना हिंसाप्रवृत्त करीत असणार यात काहीच संशय नाही.यापुढे या मनुस्मृतिपूजक भिडे गुरुजीला मोकळीक देऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी हाती घेऊन भर रस्त्यावरून नाचवीत जाणे हाच केवढा मोठा गुन्हा आहे. एखाद्या नागरिकाने असे कृत्य केले तर शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यावरून त्याला पोलीस लगेच पकडून नेतात. मग भिडे गुरुजी जंगली महाराज मंदिरात राजरोसपणे तलवारबाज धारक-यांसोबत ठाण मांडतो, मग भररस्त्याने त्या परजत जातो आणि संत ज्ञानेश्वरांच्या-संत तुकारामांच्या पालख्यांसमोर उभा राहतो. बंदीचा हुकूम सरळसरळ पायदळी तुडवितो आणि पोलीस नुसते बघत राहतात. याला काय म्हणावे? हे उघड उघड अधर्माचे कृत्यच नाही काय? म्हणूनच यापुढे पंढरीच्या वारकºयांमध्ये जाण्यास धारकºयांना पूर्णपणे मज्जाव करावा. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी