शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

शेतकरी का संतापले आहेत? राजू शेट्टींनी दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 01:40 IST

स्वातंत्र्यानंतर पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना हा पंजाब प्रांताचा कायदा जसाच्या तसा संसदेत मंजूर करून घेतला आणि देशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला.

नव्या व्यवस्थेत किमान आधारभूत किमतीतून केंद्र सरकार अंग काढून घेईल का?१. स्वातंत्र्यापूर्वी पंजाब प्रांत सरकारने पहिल्यांदा शेतीमालाला हमीभाव ही संकल्पना अंमलात आणली. त्यावेळचे कृषिमंत्री शेतकरी नेते सर छोटू रामयांच्या संकल्पनेतून हमीभावाचे संरक्षण शेतकऱ्यांना मिळाले. स्वातंत्र्यानंतर पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना हा पंजाब प्रांताचा कायदा जसाच्या तसा संसदेत मंजूर करून घेतला आणि देशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला.२. १९९०च्या दशकानंतर देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. शेतकरी आंदोलन व चळवळ निस्तेज होत गेली. नव्या व्यवस्थेतून शेतकºयांच्या पदरात काही तरी पडेल असा भाबडा आशावाद होता. पण घोर निराशाच झाली. त्याच नैराश्यातून शेतकºयांच्या आत्महत्या सुरू झाल्या, त्या अजून थांबलेल्या नाहीत.३. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेवरून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने शेतकºयांची परिस्थिती सुधारायची असेल तर हमीभाव ठरवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची शिफारस केली.४. तोवर ए-२ म्हणजे शेतकºयांनी केलेला खर्च हाच उत्पादन खर्च समजला जायचा. स्वामीनाथन यांनी शेतकºयांनी केलेला खर्च, कुटुंबातील सदस्यांच्या श्रमाची किंमत, काढलेले कर्ज, त्यावरील व्याज, जमिनीचा घसारा इत्यादीचा समावेश करण्यास सुचवले. हा खर्च (सी-२) व त्यावर ५० टक्के नफा असा हमीभाव द्यावा, अशी शिफारस केली.५. मनमोहन सिंग सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमीभाव देण्याचे जाहीर केले.६. मोदी सत्तेत आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाचे सूत्र सोयीस्कर विसरले. त्यांनी नेमलेल्या शांताकुमार समितीने हमीभाव ही संकल्पनाच रद्दबातल करावी व सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे होणारा प्रचंड भ्रष्टाचार टाळण्यासाठी रेशन व्यवस्था संपवून टाकावी, अशी शिफारस केली.७. मोदी सरकारने त्याला अनुसरूनच आताची तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. पंतप्रधान सांगतात त्यापद्धतीने आधारभूत किंमत अस्तित्वात राहील, पण ती कागदावरच राहील. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे अशक्यप्राय वाटते.८. आजही हमीभाव ही एक शिफारसच आहे. तिला कायदेशीर स्वरूप नाही. पण तरीही शेतकºयांना हमीभावाच्या जवळपास भाव मिळतो. कारण एकूण उत्पादनाच्या ३० टक्के अन्नधान्याचे उत्पादन स्वत: केंद्र सरकार भारतीय खाद्य निगम तसेच नाफेड यासारख्या सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करते.९. ही खरेदी हमीभावाच्या दरात होते. त्यामुळे बाजारातील भाव हमीभावाच्या आसपास स्थिर राहतात. तोट्याचे कारण सांगून केंद्र सरकारने सरकारी कंपन्या व महामंडळे विकायला काढलेली आहेत.त्या रांगेत भारतीय खाद्य निगम व नाफेडसारख्यासंस्था आहेत.१०. या संस्था जर विक्रीस काढल्या तर एकतर केंद्र सरकार अन्नधान्य खरेदी करण्याचे बंद करेल, किंवा खुल्या बाजारातून ग्लोबल टेंडर काढून खरेदी करेल, ज्याचा गैरफायदा कॉर्पोरेट कंपन्या घेतील. यामुळे सुगीच्या काळात शेतकºयांना आपला शेतीमाल हमीभावापेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये विकावा लागेल.११. आता हमीभावाचा कायदा असूनही लुबाडणूक होते, त्याचे संरक्षण हिरावून घेतल्यास शेतकरी नागवला जाईल. हमीभाव कागदावरच राहील. या तिन्ही विधेयकांबद्दल शेतकºयांच्या मनांमध्ये हीच भीती सर्वाधिक आहे, म्हणूनच देशभरातील शेतकरी त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.(शब्दांकन : विश्वास पाटील)

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी