शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांचे आंदोलन का फसले?

By सुधीर लंके | Updated: April 5, 2018 00:28 IST

कार्यकर्ते घडविण्याकडे अण्णांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातून त्यांची चळवळच थकू लागली आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.

अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.दिल्लीतील केजरीवाल आणि त्यांची चमू सोबत आली तेव्हापासून ‘टीम अण्णा’हा शब्द बाजारात आला. तत्पूर्वी महाराष्टÑात खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांच्या जोरावर ‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन’ या नावाने हे आंदोलन सुरू होते. ते एकटे अण्णा नावाभोवती केंद्रित नसायचे. मीडियाचे ‘बूम’ अण्णांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तेव्हापर्यंत फारसे परिचित नव्हते. उपोषणस्थळांची रचनाही साधी असायची. तिरंगा हातात घेऊन तो इकडून तिकडे फिरविण्याची सवय तोपर्यंत अण्णांना नव्हती.केजरीवालांच्या काळात आलेल्या ‘टीम अण्णा’ने आंदोलनाचे तंत्रच बदलविले. नामांकित अवॉर्ड मिळविलेले केजरीवाल यांसारखे मान्यवर, बेदींसारख्या निवृत्त अधिकारी, निवृत्त न्यायाधीश अशा लोकांची अण्णांना या आंदोलनापासून मोठी भुरळ पडू लागली. अण्णांभोवती असे कोंडाळे झाल्याने त्यांचे स्वत:च्या संघटनेकडे व सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. जे खरे तर त्यांचे मूळ होते.‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली अण्णांनी राज्यभर संघटन उभे केले होते. या संघटनेच्या जिल्हा, तालुकावार शाखा होत्या. २०१२ मध्ये अण्णांनी या शाखा बरखास्त केल्या. पर्यायाने खाली काम करणारे कार्यकर्तेच उरले नाहीत. शासनाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त करावी, असा कायदा अण्णांच्या आंदोलनातूनच झाला. या समित्यांवर अण्णांचा एक सदस्य नियुक्त करण्याबाबत नियम आहे. पण, गत चार वर्षांपासून या समित्यांवर अण्णांनी आपले कार्यकर्ते पाठविणेच थांबविले आहे. या समित्यांत आलेल्या तक्रारींवर योग्य कारवाईच होत नाही असा अण्णांचा आक्षेप आहे. यातून घडले असे की येथेही काम करण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची संधी गेली. या समित्यांच्या गुणवत्तेसाठी लढण्याऐवजी अण्णांनी पळ काढला. कार्यक्रमच नसल्याने अण्णांसोबत जे कार्यकर्ते होते ते दुरावले. त्यामुळे अचानक आंदोलनात कार्यकर्ते कुठून आणायचे? हा प्रश्न यावेळच्या आंदोलनात उभा राहिला. या आंदोलनात अण्णांनी जी कोअर कमिटी नियुक्त केली तिच्याबाबतही आक्षेप होते. दिल्लीतील या समितीचे सदस्य मनींद्र जैन हे अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाराष्टÑातील कल्पना इनामदार यांनाही समितीत कोणत्या निकषावर घेतले? ते अण्णांनाच ठाऊक. अण्णा आपल्या जवळच्या मूळ कार्यकर्त्यांना अधिकार व संधी देत नाहीत. दुसरीकडे ‘भूछत्री’ कार्यकर्त्यांवर आंदोलनात अवलंबून राहतात. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारी आता राळेगणमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत, असाही फलक अण्णांनी लावला आहे. अण्णांचे म्हणणे आहे की मी आता एकटा किती दिवस लढणार? अण्णा एकटे पुरेसे नाहीत हे खरे. पण, आपले उत्तराधिकारीही ते स्वत:च निर्माण होऊ द्यायला तयार नाहीत. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत