शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अण्णांचे आंदोलन का फसले?

By सुधीर लंके | Updated: April 5, 2018 00:28 IST

कार्यकर्ते घडविण्याकडे अण्णांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातून त्यांची चळवळच थकू लागली आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.

अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्यांच्या चळवळीलाच थकवा जाणवू लागला आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास अण्णांच्या उपस्थितीतच ही चळवळ संपण्याचा धोकाही संभवतो.दिल्लीतील केजरीवाल आणि त्यांची चमू सोबत आली तेव्हापासून ‘टीम अण्णा’हा शब्द बाजारात आला. तत्पूर्वी महाराष्टÑात खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांच्या जोरावर ‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन’ या नावाने हे आंदोलन सुरू होते. ते एकटे अण्णा नावाभोवती केंद्रित नसायचे. मीडियाचे ‘बूम’ अण्णांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तेव्हापर्यंत फारसे परिचित नव्हते. उपोषणस्थळांची रचनाही साधी असायची. तिरंगा हातात घेऊन तो इकडून तिकडे फिरविण्याची सवय तोपर्यंत अण्णांना नव्हती.केजरीवालांच्या काळात आलेल्या ‘टीम अण्णा’ने आंदोलनाचे तंत्रच बदलविले. नामांकित अवॉर्ड मिळविलेले केजरीवाल यांसारखे मान्यवर, बेदींसारख्या निवृत्त अधिकारी, निवृत्त न्यायाधीश अशा लोकांची अण्णांना या आंदोलनापासून मोठी भुरळ पडू लागली. अण्णांभोवती असे कोंडाळे झाल्याने त्यांचे स्वत:च्या संघटनेकडे व सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. जे खरे तर त्यांचे मूळ होते.‘भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली अण्णांनी राज्यभर संघटन उभे केले होते. या संघटनेच्या जिल्हा, तालुकावार शाखा होत्या. २०१२ मध्ये अण्णांनी या शाखा बरखास्त केल्या. पर्यायाने खाली काम करणारे कार्यकर्तेच उरले नाहीत. शासनाने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त करावी, असा कायदा अण्णांच्या आंदोलनातूनच झाला. या समित्यांवर अण्णांचा एक सदस्य नियुक्त करण्याबाबत नियम आहे. पण, गत चार वर्षांपासून या समित्यांवर अण्णांनी आपले कार्यकर्ते पाठविणेच थांबविले आहे. या समित्यांत आलेल्या तक्रारींवर योग्य कारवाईच होत नाही असा अण्णांचा आक्षेप आहे. यातून घडले असे की येथेही काम करण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची संधी गेली. या समित्यांच्या गुणवत्तेसाठी लढण्याऐवजी अण्णांनी पळ काढला. कार्यक्रमच नसल्याने अण्णांसोबत जे कार्यकर्ते होते ते दुरावले. त्यामुळे अचानक आंदोलनात कार्यकर्ते कुठून आणायचे? हा प्रश्न यावेळच्या आंदोलनात उभा राहिला. या आंदोलनात अण्णांनी जी कोअर कमिटी नियुक्त केली तिच्याबाबतही आक्षेप होते. दिल्लीतील या समितीचे सदस्य मनींद्र जैन हे अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाराष्टÑातील कल्पना इनामदार यांनाही समितीत कोणत्या निकषावर घेतले? ते अण्णांनाच ठाऊक. अण्णा आपल्या जवळच्या मूळ कार्यकर्त्यांना अधिकार व संधी देत नाहीत. दुसरीकडे ‘भूछत्री’ कार्यकर्त्यांवर आंदोलनात अवलंबून राहतात. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारी आता राळेगणमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत, असाही फलक अण्णांनी लावला आहे. अण्णांचे म्हणणे आहे की मी आता एकटा किती दिवस लढणार? अण्णा एकटे पुरेसे नाहीत हे खरे. पण, आपले उत्तराधिकारीही ते स्वत:च निर्माण होऊ द्यायला तयार नाहीत. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत