शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर

By सुधीर महाजन | Updated: June 19, 2019 17:46 IST

महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते.

- सुधीर महाजन

‘तेरे कमीज से मेरे कमीज पर धब्बे कम है’, असा खेळ औरंगाबादेतशिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी सुरू केला आहे. तुझ्यापेक्षा मी किती स्वच्छ हे दाखवताना माझ्या सदऱ्यावरही डाग आहेत; पण ते तुझ्यापेक्षा कमी आहेत, असेच सांगण्याचा हा प्रयत्न. म्हणजे घोटाळे आम्हीही करतो; पण तुमचे तर महाघोटाळे आहेत. तुम्ही महाघोटाळेबाज आम्ही म्हणजे ‘चिरगूट’ असा हा प्रकार. हे दोघेही पक्ष एकमेकांचे कपडे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. महापौरांनी चहा, नाश्ता, भोजनावळी, फोटो, यासाठी कशी उधळपट्टी केली हे एमआयएमने उघड करताच शिवसेनेनेही मुशायऱ्याचा पैसा एमआयएम नेत्याने कसा हडप केला, याची कथा लावली. यातून मनोरंजनच झाले. आता एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील हे पाच दिवसांत महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे घबाडच बाहेर काढणार आहेत. एका अर्थाने आता हा कलगीतुरा रंगणार आणि यांच्यात तोंडातून महापालिकेतील भ्रष्टाचारांच्या सुरसकथा बाहेर पडणार, अशी आशा करायला हरकत नाही; पण असे घडणार नाही. जलीलसुद्धा भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर मांडणार नाहीत. कारण या आरोप-प्रत्यारोपाचे स्वरूप पाहता एकमेकांवर शिंतोडे उडविण्याचा हा खेळ दोघेही खेळणार नाहीत, एवढा राजकीय सुज्ञपणा या दोघांकडेही आहेच.

लोकसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पाच वर्षांपूर्वी मध्य औरंगाबादची विधानसभेची जागा शिवसेनेच्या नाकावर टिच्चून एमआयएमने जिंकली आणि आता खासदारकी हिसकावली. त्यामुळे हा पराभव सेनेच्या पचनी पडणे शक्यच नाही. या पराभवाची पहिली मळमळ महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाहेर पडली. या सभेत खा. जलील यांच्या अभिनंदनाचा एमआयएमच्या प्रस्तावाला शिवसेनेने बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सर्वच नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावरून एमआयएमचे नगरसेवक संतप्त झाले आणि गदारोळ उडाला. २० सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला. येथूनच दोन पक्षांमधील धुम्मस बाहेर आली. जलील यांच्या वैयक्तिक अभिनंदन ठरावाला बगल देत सेनेने मार्ग काढला. कारण महापौर नंदकुमार घोडेले यांना चंद्रकांत खैरेंना दुखवायचे नव्हते. शिवसेनेची सारी सत्ताच चंद्रकांत खैरे यांच्याकडे एकवटली असल्याने त्यांना पराभूत करणाऱ्या उमेदवाराच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याएवढे मोठे मन आणि धारिष्ट्य घोडेलेंकडे नाही आणि समजा त्यांनी असे केले असते, तर त्यांना ते परवडणारेही नव्हते. याचे उत्तर म्हणून एमआयएमने महापौर घोडेले यांच्या उधळपट्टीचे जाहीर दाखले द्यायला सुरुवात करीत महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. नंतर सेनेने मुशायऱ्याच्या खर्चाचे पाकीट उघडे केले?

या दोन पक्षांतील ही हाणामारी एवढ्यापुरती मर्यादित राहिली असती, तर हरकत नव्हती. उलट जनतेचे मनोरंजन झाले असते. महापालिकेतील गैरव्यवहाराची सुरस, मनोरंजक प्रकरणे बाहेर आली असती. आपण कर रूपाने भरलेला पैसा कसा उधळला जातो, याचे वास्तव लोकांसमोर आले असते; परंतु आता शिवसेनेने एमआयएमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शाहगंजमधील ज्या टपरी प्रकरणावरून गेल्यावर्षी दंगल झाली होती त्या टपऱ्या हटविण्याचा पवित्रा आता सेनेने घेतला आहे. हा संवेदनक्षम मुद्दा असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. एमआयएम हा महापालिकेतील विरोधी पक्ष; परंतु महापौरांच्या उधळपट्टीचा विषय त्यांनी सभागृहात उपस्थित करण्याऐवजी निदर्शनानंतर मांडला. याच विषयावर त्यांना सभागृहात सेनेची कोंडी करता आली असती. महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद