शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर

By सुधीर महाजन | Updated: June 19, 2019 17:46 IST

महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते.

- सुधीर महाजन

‘तेरे कमीज से मेरे कमीज पर धब्बे कम है’, असा खेळ औरंगाबादेतशिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी सुरू केला आहे. तुझ्यापेक्षा मी किती स्वच्छ हे दाखवताना माझ्या सदऱ्यावरही डाग आहेत; पण ते तुझ्यापेक्षा कमी आहेत, असेच सांगण्याचा हा प्रयत्न. म्हणजे घोटाळे आम्हीही करतो; पण तुमचे तर महाघोटाळे आहेत. तुम्ही महाघोटाळेबाज आम्ही म्हणजे ‘चिरगूट’ असा हा प्रकार. हे दोघेही पक्ष एकमेकांचे कपडे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. महापौरांनी चहा, नाश्ता, भोजनावळी, फोटो, यासाठी कशी उधळपट्टी केली हे एमआयएमने उघड करताच शिवसेनेनेही मुशायऱ्याचा पैसा एमआयएम नेत्याने कसा हडप केला, याची कथा लावली. यातून मनोरंजनच झाले. आता एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील हे पाच दिवसांत महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे घबाडच बाहेर काढणार आहेत. एका अर्थाने आता हा कलगीतुरा रंगणार आणि यांच्यात तोंडातून महापालिकेतील भ्रष्टाचारांच्या सुरसकथा बाहेर पडणार, अशी आशा करायला हरकत नाही; पण असे घडणार नाही. जलीलसुद्धा भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर मांडणार नाहीत. कारण या आरोप-प्रत्यारोपाचे स्वरूप पाहता एकमेकांवर शिंतोडे उडविण्याचा हा खेळ दोघेही खेळणार नाहीत, एवढा राजकीय सुज्ञपणा या दोघांकडेही आहेच.

लोकसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पाच वर्षांपूर्वी मध्य औरंगाबादची विधानसभेची जागा शिवसेनेच्या नाकावर टिच्चून एमआयएमने जिंकली आणि आता खासदारकी हिसकावली. त्यामुळे हा पराभव सेनेच्या पचनी पडणे शक्यच नाही. या पराभवाची पहिली मळमळ महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाहेर पडली. या सभेत खा. जलील यांच्या अभिनंदनाचा एमआयएमच्या प्रस्तावाला शिवसेनेने बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सर्वच नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावरून एमआयएमचे नगरसेवक संतप्त झाले आणि गदारोळ उडाला. २० सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला. येथूनच दोन पक्षांमधील धुम्मस बाहेर आली. जलील यांच्या वैयक्तिक अभिनंदन ठरावाला बगल देत सेनेने मार्ग काढला. कारण महापौर नंदकुमार घोडेले यांना चंद्रकांत खैरेंना दुखवायचे नव्हते. शिवसेनेची सारी सत्ताच चंद्रकांत खैरे यांच्याकडे एकवटली असल्याने त्यांना पराभूत करणाऱ्या उमेदवाराच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याएवढे मोठे मन आणि धारिष्ट्य घोडेलेंकडे नाही आणि समजा त्यांनी असे केले असते, तर त्यांना ते परवडणारेही नव्हते. याचे उत्तर म्हणून एमआयएमने महापौर घोडेले यांच्या उधळपट्टीचे जाहीर दाखले द्यायला सुरुवात करीत महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. नंतर सेनेने मुशायऱ्याच्या खर्चाचे पाकीट उघडे केले?

या दोन पक्षांतील ही हाणामारी एवढ्यापुरती मर्यादित राहिली असती, तर हरकत नव्हती. उलट जनतेचे मनोरंजन झाले असते. महापालिकेतील गैरव्यवहाराची सुरस, मनोरंजक प्रकरणे बाहेर आली असती. आपण कर रूपाने भरलेला पैसा कसा उधळला जातो, याचे वास्तव लोकांसमोर आले असते; परंतु आता शिवसेनेने एमआयएमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शाहगंजमधील ज्या टपरी प्रकरणावरून गेल्यावर्षी दंगल झाली होती त्या टपऱ्या हटविण्याचा पवित्रा आता सेनेने घेतला आहे. हा संवेदनक्षम मुद्दा असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. एमआयएम हा महापालिकेतील विरोधी पक्ष; परंतु महापौरांच्या उधळपट्टीचा विषय त्यांनी सभागृहात उपस्थित करण्याऐवजी निदर्शनानंतर मांडला. याच विषयावर त्यांना सभागृहात सेनेची कोंडी करता आली असती. महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद