शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस बदल्यांमधले ‘अदृश्य’ हात कोणाचे?

By यदू जोशी | Updated: September 5, 2020 05:27 IST

ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा मुहूर्त अखेर निघाला. बदल्या तर झाल्या; पण काही प्रश्नही त्या निमित्तानं निर्माण झाले.

- यदू जोशी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा मुहूर्त अखेर निघाला. बदल्या तर झाल्या; पण काही प्रश्नही त्या निमित्तानं निर्माण झाले. बदल्यांसाठी पाच अधिकाऱ्यांच्या आस्थापना मंडळात तीव्र मतभेद होणे, महासंचालक सुबोध जयस्वाल यांची नाराजी, बदल्यामधील राजकीय हस्तक्षेप, आस्थापना मंडळात महासंचालक अल्पमतात होते वगैरे चर्चा रंगली. महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यातील काहीशा ताणलेल्या संबंधांची किनार त्याला होती, शिवाय बदल्यांमध्ये अदृश्य हात होते म्हणतात. स्वच्छ प्रतिमेच्या काही अधिकाºयांना निश्चितच महत्त्वाची पदं देण्यात आली; पण काहींना मिळालेल्या क्रीम पोस्टिंगने भुवया उंचावल्या. देवेन भारती, विनय कारगावकर, संजय बाविस्कर, सुनील फुलारी, मनोज शर्मा, निशित मिश्रा अशा अधिकाºयांना वेटिंगवर का ठेवलं ते कळलं नाही. त्यापैकी बहुतेकांची आधीच्या मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक हे तर कारण नसेल? एडीजी म्हणून प्रमोशन मिळालेल्या ज्युनियरमोस्ट अधिका-याला महत्त्वाच्या शहरात पोलीस आयुक्त म्हणून पाठवणे यातून चुकीचा मेसेज गेला.ते वीस हजार कोटी गेले कुठे?पूर्वी दलितांच्या वस्त्या गावाच्या पूर्व दिशेला असायच्या. कारण काय, तर जातीयवादी व्यवस्था असं मानायची की हवा ही पश्चिमेकडून येते, आधी ती गावातील इतर लोकांना मिळेल आणि मग दलित वस्तीकडे जाईल. दलित वस्तीतून गावात आलेली हवा चालायची नाही. राज्यात १९७६ पासून दलित वस्ती सुधार योजना होती. तिचं नाव आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असं आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी ४०० कोटी रुपये तर या विभागानं दिलेल्या निधीतून जिल्हा नियोजन मंडळांमार्फत १५०० हजार कोटी रुपये या योजनेसाठी सध्या दिले जातात. सुरुवातीला हा निधी कमी होता; पण १९७६ पासूनचा हिशेब केला तर आतापर्यंत २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम या योजनेसाठी दिली गेली. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, गटारे ही कामे त्यातून होतात. या योजनेत आजही प्रचंड भ्रष्टाचार आहे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याला हात घातला तर शेपाचशे अधिकारी, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार गजाआड होतील. एवढा पैसा खर्च होऊनही अनुसूचित जातींच्या वस्त्यांची दैना कायम आहे, मग पैैसा गेला कुठे? जिल्हा परिषदांच्या समाजकल्याण समितीपासून भ्रष्टाचाराची पाळमुळं दिसतील. एकच रस्ता दहावेळा केल्याची उदाहरणं तर अनेक आहेत. आतापर्यंत कागदावर लावलेले दिवे खरंच लावले असते तर दीपमाळा तयार झाल्या असत्या. मुंडेजी, किमान एवढं करा की या कामांचं जीआयएस मॅपिंग करा. म्हणजे मंत्रालयात बसल्या बसल्या समजेल की कुठे, किती कामं झाली. या आधीच्या सरकारनं त्यासाठी जीआर काढला होता, जीआयएस मॅपिंगचं कंत्राट २५० कोटींना देणार होते, त्यातही खाबूगिरी होती. ते सोडून एमआरसॅक या इस्रोच्या संस्थेला काम द्या, सामूहिक खाबूगिरीला चाप बसेल. योजना खूपच चांगली आहे, ती टिकली पाहिजे; पण मानवी हस्तक्षेप संपवा.चला! परिणाम झाला...आमदार रोहित पवार युवा ब्रिगेड अशी संघटना स्थापन झाली असून, राष्ट्रवादीत समांतर संघटना पुन्हा वाढू लागल्यात की काय अशी शंका गेल्या शनिवारच्या स्तंभात व्यक्त केली होती. त्याचा परिणाम झाला. रोहित पवार यांनी पक्षनिष्ठा अन् संवेदनशीलता दाखवत टिष्ट्वट केलं. ‘माझ्यावर प्रेम करणाºया काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना काढल्याचं कळलं. माझी विनंती आहे की मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही’, असं रोहित यांनी बजावलं. ‘युवा ब्रिगेड ही यानंतर फक्त युवा सोशल ब्रिगेड या नावानं काम करेल, प्रेरणास्थान मात्र रोहित पवारच असतील’, असं आता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार