शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची?

By संजय पाठक | Updated: May 20, 2023 09:13 IST

नाशिकमध्ये अचानक दीडशे उंट का, कशामुळे आले, याचा उलगडा अजूनही ना पोलिसांना झाला आहे, ना प्रशासनाला! प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे!

संजय पाठक - वृत्तसंपादक, लोकमत, नाशिक

‘एक हत्ती आणि सात आंधळे’ ही  गोष्ट सर्वांनाच माहीत असेल. आता या गोष्टीत हत्तीच्या जागी उंट आला आहे इतकेच! नाशिक जिल्ह्यात अचानक आलेले तब्बल १५४ उंट पंधरा दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यापैकी १११ उंटांनी नाशिकच्या पांजरापोळ संस्थेत पाहुणचार घेतला तर ४३ उंट मालेगाव येथे गोशाळेत आहेत. तेथून त्यांना शुभास्ते पंथान: करण्याची जबाबदारी एका प्राणीमित्र संस्थेकडे सोपवण्यात आली. यासाठी ‘रायका’ म्हणजेच पशुपालक जमातीच्या लोकांना बोलावण्यात आले. पोलिस बंदोबंस्तात या उंटांची रवानगी आता राजस्थानात मरूभूमीकडे करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात थकल्या-भागल्या आणि येथील वातावरण न मानवलेल्या १३ उंटांचा मात्र मृत्यू झाला आहे.हे उंट येथे कसे आले, याचा उलगडा जिल्हा प्रशासनासह पोलिसांनाही झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने तपासाचे काम आमचे नाही, असे सांगून पोलिसांकडे बाेट दाखवले तर पोलिसांकडेही याचे ठोस उत्तर नाही. मे महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात अचानक उंटांचे कळप दिसू लागल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राजस्थानसारख्या ठिकाणाहून खडतर प्रवास करत आलेल्या उंटांची अवस्था बिकट होती. राजस्थानमधील हे उंट नाशिकमध्ये एकाएकी घुसले नाहीत तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ते जिल्ह्यात आले. विशेष म्हणजे प्राणीमित्रांच्या आग्रहावरून दिंडोरी आणि मालेगावी उंटांची हेळसांड आणि क्रूर वागणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला खरा; परंतु तो अत्यंत साध्या स्वरूपाचा! सटाणा पोलिसांनी हे सर्व उंटवाहक मदारी आणि उंट नाशिक जिल्ह्यातीलच आहेत, चारापाण्यासाठी नाशिकहून ते गुजरातला कच्छच्या रणामध्ये (उलट) गेल्याचा जावईशोध लावला. मदारी हे कठपुतली आहेत, त्यांचे खरे सूत्रधार कोण, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. उंट हा प्राणी मुख्यत: सवारी आणि मालवाहतुकीसाठी वापरला जात असला तरी अभक्ष्य भक्षणासाठीही त्याचा वापर होतो. त्यामुळे कत्तलही मोठ्या प्रमाणात होते. नाशिकच्या उंट प्रकरणाला धार्मिक जोड दिली जाऊ लागल्याने आणि हे उंट मालेगाव तसेच हैदराबादमध्ये कत्तलीसाठीच जात असल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन हे उंट ताब्यात घेत पुन्हा राजस्थानकडे परत पाठवण्याची जबाबदारी महावीर कॅमल सेंच्युरी व धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थांना दिली. मुळात हा मुद्दा राजस्थानशी संंबंधीत आहे. उंट हा राजस्थानचा राज्य प्राणी आहे. त्यामुळेच त्याला महत्त्व असले तरी गेल्या काही वर्षात उंटांची तस्करी हा चिंतेचा विषय ठरला आहे. उंटांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने राजस्थान सरकाराने उष्ट्र संरक्षण (उंट संवर्धन) कायदा केला असून विक्री-कत्तलीला बंदी घातली आहे. उंट संवर्धनासाठी उंट पालकांना प्रत्येक उंटामागे पाच हजार रुपये दिले जातात. मात्र, तेथील सरकारच्या कायद्यामुळे तो विकता येत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम झाला.उंटांची तस्करी वाढल्याने उंटांच्या संख्येत जागतिक क्रमवारीत भारताचा असलेला पाचवा क्रमांक आता नऊवर घसरला आहे. विशेष म्हणजे ही तस्करी हैदराबादकडे होत असल्याने यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे हैदराबादमध्ये कत्तलीसाठी गेलेले उंट पुन्हा राजस्थानात आणण्यात आले आहेत. नाशिकमधील या प्रकरणामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अन्य राज्यातील प्राणी कशासाठी येतात, याची किमान नोंद कोणत्या ना कोणत्या ठिकाणी असायला हवी, वन्य जीव किंवा अन्य अधिसूचीत किंवा संवर्धीत पाळीव प्राणी याबाबत तर त्यांची नोंदणी आणि माहिती असायला हवी. राजस्थानमधून उंट निघून जातात आणि अन्य दोन राज्यातून ते महाराष्ट्रात नाशिकला दाखल होतात, तरीही या सर्व राज्यांत कोणताही समन्वय नाही, हे आश्चर्यजनक आहे. या प्रकरणाला केवळ प्राणीमित्रांच्या मदतीमुळे विधायक वळण मिळाले. उंट आता निघून गेले असले तरी यापुढे काळजी घेतली जाईल, हीच अपेक्षा.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस