शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

ही तंबी कोण ऐकेल ?

By admin | Updated: December 18, 2014 00:27 IST

बोलायचे तर फक्त विकासाविषयी आणि सरकारच्या परिणामकारकतेविषयीच बोला. अवांतर बोलणे टाळा. या लक्ष्मणरेषेचा आदर करा’ अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

बोलायचे तर फक्त विकासाविषयी आणि सरकारच्या परिणामकारकतेविषयीच बोला. अवांतर बोलणे टाळा. या लक्ष्मणरेषेचा आदर करा’ अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात घेतलेल्या त्यांच्या पक्षातील खासदारांच्या बैठकीत साऱ्यांना दिली. ती देण्याआधी तेथे हजर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सभागृहाबाहेर जायला सांगितले. या तंबीने भाजपाच्या उठवळ खासदारांनी त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे पंतप्रधानांना आणलेला वैतागच उघड केला आहे. ‘गुड गव्हर्नन्स अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट’ याच गोष्टींवर सातत्याने बोलणारे नरेंद्र मोदी जातीधर्मावरून समाजात नको ते वाद निर्माण करण्याच्या त्यांच्या पक्षातील खासदारांच्या प्रयत्नांमुळे व्यथित आहेत आणि अशा तऱ्हेची तंबी त्यांनी याआधी किमान अर्धा डझनवेळा दिली आहे. या तंबीचा परिणाम होऊन ही माणसे गप्प होतील आणि त्यांनी दाखविलेल्या लक्ष्मणरेषेची मर्यादा सांभाळतील, अशी शक्यता मात्र कमी आहे. धर्मांधता आणि तिच्यातून येणारा इतर धर्मांविषयीचा द्वेष ज्यांच्या हाडीमासी रुजला आहे, त्यांच्याकडून अशा राजकीय सभ्यतेची अपेक्षाही फारशी बाळगता येत नाही. त्यातून हे पुढारी ज्या संघ संस्कारात वाढले, तो संस्कारही धार्मिक एकारलेपणाचा आणि परधर्माविषयीच्या टोकाच्या द्वेषाचा आहे. स्वत: नरेंद्र मोदीही याच संस्कारात वाढले आहेत. मात्र, पंतप्रधानपद ही देशाचे नेतृत्व करण्याची व जबाबदारीची गंभीर बाब आहे. त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला देशातील सर्व जातीधर्माच्या व भाषा-प्रदेशांच्या लोकांना सोबत घेऊन चालावे लागते आणि त्यातला कोणताही वर्ग दुखावला जाणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. ही जबाबदारी ज्यांच्यावर नाही, त्यांना उठवळपणे वागता येते व तशी ही माणसे वागता-बोलताना देशाने पाहिलीही आहेत. आपला धर्म सोडून इतर धर्माच्या लोकांना हरामजादे म्हणणारे मंत्री, मोदींना पाठिंबा न देणाऱ्यांनी देश सोडून चालते व्हावे असे म्हणणारे खासदार, आपल्या धर्माचा ग्रंथच तेवढा राष्ट्रीय ठरविला जावा, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ मंत्रीणबाई आणि साऱ्या देशाला आपलीच प्राचीन भाषा सक्तीने शिकवायला निघालेल्या दुसऱ्या एका मंत्रीणबार्इंचे अभिनेतेपण हा सारा मोदींच्या नेतृत्वाचा दुबळेपणा सांगणारा प्रकार आहे. असे बेताल बोलणारी माणसे मोदींच्या तंबीने शिस्तीत येतील, अशी अपेक्षा बाळगता येत नाही. मोदींची पाठ फिरल्यानंतर या माणसांनी त्यांना वाकुल्या दाखवल्या असतील तर त्याचेही आपण नवल वाटू देता कामा नये. (आदित्यनाथ या खासदारांनी त्या दाखविल्याही आहेत. उत्तर प्रदेशात चालविलेल्या धर्मांतराच्या उपद्रवाला सरकारने मदत करावी, अशी अफलातून विनंतीच त्यांनी जाहीररीत्या केली आहे) मोदींचा लोकसभेच्या निवडणुकीतील विजय हा त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा व त्यांनी जनतेला दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचा विजय नसून, संघाच्या हिंदुत्वाचा विजय आहे, असा गैरसमज करून घेतलेली ही माणसे आहेत आणि त्यांना कसेही करून आपल्याला असलेले संघाचे पाठबळ बळकट करायचे आहे. त्यांच्या वक्तव्यातून प्रगट होणारी एकारलेली धार्मिकता त्यांच्या या गरजेतून आली आहे. मात्र, संघाचे आताचे नेतृत्व पूर्वीएवढे स्वप्नाळू नाही आणि धार्मिकतेला असलेल्या मर्यादाही ते ओळखणारे आहेत. सुषमा स्वराज यांनी भगवद््गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा दिला पाहिजे असे म्हटले. त्यावर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच ‘भगवद््गीता हा ग्रंथ सारेच वाचत नाहीत. ज्यांच्या घरी तो आहे तेही त्याकडे बघत नाहीत’ असे सांगून सुषमाबाईंच्या आग्रहातली सारी हवाच काढून घेतली आहे. भागवतांच्या या अभिप्रायातूनही या उठवळांनी शिकावे असे बरेच आहे. परंतु स्वत:ला महाराज किंवा महंत म्हणविणारी माणसे आपल्याला स्वयंभू समजत असतात. दुसऱ्या कोणी आपल्याला काही शिकवावे असे नाही, असा त्यांचा स्वत:विषयीचा समज असतो. त्यामुळे साक्षी महाराजापासून गिरीराज सिंगापर्यंत आणि स्मृती इराणीपासून निरंजन ज्योतीपर्यंतची माणसे त्यांचे अंगभूत बेबंदपण विसरतील, असे समजणे चुकीचे आहे. नरेंद्र मोदींनाही या माणसांना वठणीवर आणायचे असेल तर नुसती तोंडी तंबी देऊन चालणार नाही. त्यासाठी या माणसांविरुद्ध त्यांना कठोर पाऊलच उचलावे लागेल. तसे करणे हे त्यांच्या नेतृत्वासाठी वा पक्षासाठीच गरजेचे नसून देशासाठी आवश्यक आहे. भारत हा धर्मबहुल व भाषाबहुल देश आहे. त्याच्या भिन्न प्रदेशात भिन्न संस्कृतींचा वावर आहे. शिवाय या देशाची मूलभूत प्रकृती मध्यममार्गाची आहे. त्याची धार्मिक, जातीय, भाषिक वा प्रादेशिक ओढाताण करणारी माणसे या देशात दुही माजविणारी आहेत. त्यांना वठणीवर आणणे देशहितासाठी आवश्यक आहे.