शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गुजरातच्या तरुण तुर्कांचा कल कोणाकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:27 IST

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे.

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे. १९९८ पासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. नरेंद्र मोदींनी तर गुजरातवर एकहाती अंमल प्रस्थापित केला. मात्र ते पंतप्रधान झाल्यानंतर आधी आनंदीबेन पटेल व आता विजय रूपाणी यांची राज्यावर हवी तशी पकड नाही. दोघांच्या काळात राज्यात एकामागून एक प्रश्न उग्र होत गेले. त्यातून लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. आरक्षणासाठी पाटीदार (पटेल) समाजाने आंदोलन सुरू केले. त्यानंतर गुजरातमध्ये हिंसाचारही झाला होता.आरक्षणाच्या प्रश्नावर पटेल अनामत आंदोलन समितीचा युवा नेता हार्दिक पटेलच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. २०१५ नंतर हार्दिकचे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर हार्दिक तुरुंगातही गेला होता व नंतर त्यास गुजरातबाहेर जाण्यास भाग पाडले होते. आक्रमकपणामुळे हार्दिक हा पटेल समाजात खूपच लोकप्रिय झाला आहे. त्याने नरेंद्र मोदींविरोधात थेट भूमिका घेतली आहे. भाजपाला पराभूत करणे एवढेच पटेल समाजाचे लक्ष्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे.गुजरातमधील ओबीसी समाजही भाजपावर काहीसा नाराज दिसत आहे. त्यातून ओबीसी समाजाचा युवा नेता अल्पेश ठाकूर याने तर राहुल गांधींच्या उपस्थितीत थेट काँग्रेसमध्येच प्रवेश केला आहे. २०१६ मध्ये ठाकूर समाजाने शेती व रोजगाराच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर जुलै महिन्यात थेट रस्त्यावरच दूध ओतून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला होता. अल्पेश हा ठाकूर समाजासह ओबीसींचे नेतृत्व करतो. गुजरातमध्ये ओबीसी समाजाचा टक्का एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के आहे. त्यांची सरकारवरील नाराजी ही भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे.दलित समाजावर गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. राज्य सरकारने हल्लेखोरांविरोधात ठोस कारवाई केली नाही. त्यातून दलित समाजात सरकारविरोधात एक प्रकारची चीड आहे. दलित समाजाने ठिकठिकाणी मोर्चेही काढले होते. त्यातून दलित युवा नेता निग्नेश मेवानी हासुद्धा भाजपाविरोधात उभा ठाकला आहे. तो लवकरच काँग्रेसच्या गोटात सामील होण्याची चिन्हे आहेत. एकूणच गुजरातमध्ये प्रथमच भाजपाला ‘अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये दलित, ओबीसी व पटेल समाजाची मिळून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत.१९ वर्षांच्या भाजपाच्या सत्ताकाळात काही घटकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यातून आता विरोधाचा आवाज घुमू लागला आहे. गुजरातचे तीन तरुण तुर्क या निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. तिन्ही युवा नेते विरोधात गेल्याने भाजपा अडचणीत सापडली आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस