शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

कोण आधी थकतं

By admin | Updated: October 21, 2015 04:07 IST

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही दोन भागीदारांमध्ये वरचढ ठरण्याचा एक सुप्त संघर्ष असतो, तसाच परंतु उघड उघड संघर्ष या दोहोत दिसून येतो आहे. फरक इतकाच की या संघर्षातून त्यांना ज्या एका प्रश्नाच्या उत्तराचा शोध आहे तो प्रश्न म्हणजे आधी कोण थकतं, तू का मी? किंवा मग असं तर नाही की, आपण दोघे सरकारात असल्याने व त्याचे ओझे बाळगण्याची आमची व कोणतेच ओझे न बाळगण्याची तुमची वृत्ती असल्याने तुम्ही धुडगूस घालीत राहा, आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी अशी सिद्धसाधकाची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे? कायमस्वरुपी भगव्या रंगाच्या प्रेमात रंगून जाणाऱ्या शिवसेनेला अलीकडे काळ्या रंगाविषयी बरेच ममत्व वाटू लागले आहे. असे असताना सोमवारी जे सैनिक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयावर चालून गेले तेव्हां त्यांना काही काळी शाई मिळाली नसावी. परिणामी त्यांनी नुसताच धुडगूस घातला. पाकी क्रिकेटचे अध्यक्ष शहरीयार खान तिथे येणार हे शिवसेनेना आधीच कळले होते. पण तिची मोठी बहीण असलेल्या व सरकारात बसलेल्या भाजपाला मात्र म्हणे तसे काही कळले नाही. बीसीसीआयने तसे सरकारला न कळवता केवळ सेनेला कळविले हे काही बरोबर झाले नाही! शशांक मनोहर यांनी आपले नागपूरपण जपण्यासाठी तरी फडणवीसांच्या ते कानावर घालण्यास हरकत नव्हती. पण मग सुधीन्द्र कुळकर्णी यांनीदेखील तीच चूक केली होती की काय? त्यांनी आगाऊ कळवायला हवे होते व फडणवीस सरकारने त्यांना संरक्षण द्यायला हवे होते. कळवूनही सरकार गाफील राहिले असेल तर मग ‘दया, कुछ तो गडबड है’! म्हणे आंदोलन करणे हा सेनेचा हक्कच आहे. ते बरोबर आहे. अखेर सेना रस्त्यावरची संघटना. ती सरकारात बसून सरकारच्या विरोधात आंदोलन करु शकते. सध्या तेच चालू आहे म्हणूनच उभयतात कोण आधी थकते याचीच वाट पाहाणे सुरु असावे असे दिसते!