शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोण आधी थकतं

By admin | Updated: October 21, 2015 04:07 IST

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही दोन भागीदारांमध्ये वरचढ ठरण्याचा एक सुप्त संघर्ष असतो, तसाच परंतु उघड उघड संघर्ष या दोहोत दिसून येतो आहे. फरक इतकाच की या संघर्षातून त्यांना ज्या एका प्रश्नाच्या उत्तराचा शोध आहे तो प्रश्न म्हणजे आधी कोण थकतं, तू का मी? किंवा मग असं तर नाही की, आपण दोघे सरकारात असल्याने व त्याचे ओझे बाळगण्याची आमची व कोणतेच ओझे न बाळगण्याची तुमची वृत्ती असल्याने तुम्ही धुडगूस घालीत राहा, आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी अशी सिद्धसाधकाची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे? कायमस्वरुपी भगव्या रंगाच्या प्रेमात रंगून जाणाऱ्या शिवसेनेला अलीकडे काळ्या रंगाविषयी बरेच ममत्व वाटू लागले आहे. असे असताना सोमवारी जे सैनिक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयावर चालून गेले तेव्हां त्यांना काही काळी शाई मिळाली नसावी. परिणामी त्यांनी नुसताच धुडगूस घातला. पाकी क्रिकेटचे अध्यक्ष शहरीयार खान तिथे येणार हे शिवसेनेना आधीच कळले होते. पण तिची मोठी बहीण असलेल्या व सरकारात बसलेल्या भाजपाला मात्र म्हणे तसे काही कळले नाही. बीसीसीआयने तसे सरकारला न कळवता केवळ सेनेला कळविले हे काही बरोबर झाले नाही! शशांक मनोहर यांनी आपले नागपूरपण जपण्यासाठी तरी फडणवीसांच्या ते कानावर घालण्यास हरकत नव्हती. पण मग सुधीन्द्र कुळकर्णी यांनीदेखील तीच चूक केली होती की काय? त्यांनी आगाऊ कळवायला हवे होते व फडणवीस सरकारने त्यांना संरक्षण द्यायला हवे होते. कळवूनही सरकार गाफील राहिले असेल तर मग ‘दया, कुछ तो गडबड है’! म्हणे आंदोलन करणे हा सेनेचा हक्कच आहे. ते बरोबर आहे. अखेर सेना रस्त्यावरची संघटना. ती सरकारात बसून सरकारच्या विरोधात आंदोलन करु शकते. सध्या तेच चालू आहे म्हणूनच उभयतात कोण आधी थकते याचीच वाट पाहाणे सुरु असावे असे दिसते!