शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आळशी कोण? - सरकार की धडपडणारे गरीब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:10 IST

गरिबीचा प्रश्न मुळातून सोडविण्याचे कष्ट न घेता झटपट रेवड्या वाटून गरिबांच्या अस्वस्थतेवर झाकण घालण्याची धडपड हा खरा आळशीपणा आहे.

प्रगती अभियान

ग्रामीण भागात शेतीला मजूर मिळत नाहीत. गरीब आता आळशी झाले आहेत, अशी विधाने सर्रास ऐकायला मिळतात. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आली. त्याच दिवशी ‘लार्सन अँड टुब्रो’च्या अध्यक्षांनीही मोफत योजनांमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, मग कामगारांचा तुटवडा जाणवतो, असे विधान केले. गरिबी, गरिबीची कारणे, गरिबांची मानसिकता, सामाजिक, आर्थिक वस्तुस्थितीचा अभ्यास सातत्याने होत असताे; पण अशा अभ्यासातील शहाणपण आपल्यापर्यंत पोहाचत नाही. म्हणून कदाचित गैरसमज पसरतात.

भारतात बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे. सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था नाही. एका अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी कुटुंबाला पावसाळ्यावर अवलंबून असलेल्या शेतीतून वर्षभर पुरेल एवढे उत्पन्न मिळत नाही. ते स्वतःची शेती करतात. त्याच काळात शेतमजूर म्हणून इतरांच्या शेतीवरही काम करतात. पावसाळ्यानंतर काम शोधत स्थलांतर ठरलेले. रोजगार हमी योजनेची कामे मिळाली तर काही दिवस गावात राहून कमाई करता येते; पण या सगळ्या मजुरीच्या कमाईतूनही वर्ष निघत नाही, म्हणून कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या पाळायच्या. तरीही जेमतेम पुरेल इतकी कमाई होत असताना त्यांना आळशी असणे परवडेल का?

विविध योजनांतून सरकारकडून प्रतिव्यक्ती प्रतिमहिना अंदाजे ५०० रुपये मिळतात. सरकारी आकडेवारी सांगते की, ग्रामीण भागातील गरीब घरातील प्रतिव्यक्ती प्रतिमहिना सरासरी १६७७ रुपये (घराचे धान्य धरून) खर्च करतात. ही आकडेवारी पुरेशी आहे. हे शेतकरी खूप कष्ट आणि कमी उत्पादकता या जाळ्यात अडकलेले आहेत. अशा कुटुंबांना उपयुक्त पशुपालनाच्या योजना नाहीत, कारण  पशुपालनाच्या योजनांमध्ये लवचीकता नाही. पाणलोट विकासातून प्रत्येक गावात पाणी साठवण वाढेल अशा योजना नाहीत. रस्ते, सार्वजनिक बस या अत्यावश्यक सेवाही कमी प्रमाणात मिळतात.

बरे, चांगले शिक्षण घेऊन शेतीतून बाहेर पडावे तर शिक्षणाची गुणवत्ता नाही. आरोग्य सेवाही तुटपुंजी आणि अनिश्चित.  तेव्हा तो खर्च हेही गरिबांना गरीब ठेवण्याचे एक कारण आहे. रोजगार हमी योजना जरी १०० दिवसांची हमी देते तर मागणी असूनसुद्धा ५० दिवसांच्या वर (प्रतिकुटुंब, प्रतिवर्षी, सरासरी) काम दिले जात नाही.

जर गरीब कुटुंब गरिबीतून बाहेर यायचे असेल तर त्यांच्या गरजा-शिक्षण, आरोग्य सेवा, सार्वजनिक दळणवळणाची साधने, बाजारपेठेत शोषण होऊ नये, असे नियमन, बँक, रस्ते, वीज, इंटरनेट, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारे छोटे व्यवसाय, नैसर्गिक संपत्तीचे संगोपन असे सर्व मिळणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी चार पैकी तीन जण गरीब होते. आता ते प्रमाण चार पैकी एक गरीब इतके कमी झाले. सरकारने पुरवलेल्या सोयीसुविधा,   त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्याने हे शक्य झाले. सरकारांनी योजनेच्या प्राप्तीचे कितीही मोठे आकडे मांडले तरी त्याचे सातत्य राहत नाही. सेवासुविधा पुरवणे सोपे नाही, सतत नजर ठेवून, अंमलबजावणीमधील नियमावली, पद्धती यात सुधार करत राहणे जरुरी आहे. एखादी योजना सुरू झाली तर आता ती नित्यनियमाने व्यवस्थित सुरू राहील असे नाही. सतर्क राहून आवश्यक बदल करावे लागतात.

पण हे का घडत नाही? भ्रष्टाचार, अनियमितता, अकार्यक्षमता, ही कारणे असतीलच; पण त्याहून महत्त्वाचे करण आहे ते आपली धोरणे, योजनांची आखणी, नियमन, यातील सुधारणा. हे काम किचकट आहे, त्याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत; पण गरिबीसारख्या प्रश्नावर झटपट उत्तरे असत नाहीत. आणि हे सर्व करण्याची अनिच्छा किंवा कंटाळा! म्हणून मग सरकारे झटपट पैसा वाटून गरिबांची अस्वस्थता कमी करण्याचे मार्ग शोधू पाहतात. म्हणजे आळशी कोण? सरकार की कष्ट करून गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड करणारे गरीब?

               pragati.abhiyan@gmail.com

टॅग्स :Farmerशेतकरी