शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आळशी कोण? - सरकार की धडपडणारे गरीब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:10 IST

गरिबीचा प्रश्न मुळातून सोडविण्याचे कष्ट न घेता झटपट रेवड्या वाटून गरिबांच्या अस्वस्थतेवर झाकण घालण्याची धडपड हा खरा आळशीपणा आहे.

प्रगती अभियान

ग्रामीण भागात शेतीला मजूर मिळत नाहीत. गरीब आता आळशी झाले आहेत, अशी विधाने सर्रास ऐकायला मिळतात. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आली. त्याच दिवशी ‘लार्सन अँड टुब्रो’च्या अध्यक्षांनीही मोफत योजनांमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, मग कामगारांचा तुटवडा जाणवतो, असे विधान केले. गरिबी, गरिबीची कारणे, गरिबांची मानसिकता, सामाजिक, आर्थिक वस्तुस्थितीचा अभ्यास सातत्याने होत असताे; पण अशा अभ्यासातील शहाणपण आपल्यापर्यंत पोहाचत नाही. म्हणून कदाचित गैरसमज पसरतात.

भारतात बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे. सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था नाही. एका अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी कुटुंबाला पावसाळ्यावर अवलंबून असलेल्या शेतीतून वर्षभर पुरेल एवढे उत्पन्न मिळत नाही. ते स्वतःची शेती करतात. त्याच काळात शेतमजूर म्हणून इतरांच्या शेतीवरही काम करतात. पावसाळ्यानंतर काम शोधत स्थलांतर ठरलेले. रोजगार हमी योजनेची कामे मिळाली तर काही दिवस गावात राहून कमाई करता येते; पण या सगळ्या मजुरीच्या कमाईतूनही वर्ष निघत नाही, म्हणून कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या पाळायच्या. तरीही जेमतेम पुरेल इतकी कमाई होत असताना त्यांना आळशी असणे परवडेल का?

विविध योजनांतून सरकारकडून प्रतिव्यक्ती प्रतिमहिना अंदाजे ५०० रुपये मिळतात. सरकारी आकडेवारी सांगते की, ग्रामीण भागातील गरीब घरातील प्रतिव्यक्ती प्रतिमहिना सरासरी १६७७ रुपये (घराचे धान्य धरून) खर्च करतात. ही आकडेवारी पुरेशी आहे. हे शेतकरी खूप कष्ट आणि कमी उत्पादकता या जाळ्यात अडकलेले आहेत. अशा कुटुंबांना उपयुक्त पशुपालनाच्या योजना नाहीत, कारण  पशुपालनाच्या योजनांमध्ये लवचीकता नाही. पाणलोट विकासातून प्रत्येक गावात पाणी साठवण वाढेल अशा योजना नाहीत. रस्ते, सार्वजनिक बस या अत्यावश्यक सेवाही कमी प्रमाणात मिळतात.

बरे, चांगले शिक्षण घेऊन शेतीतून बाहेर पडावे तर शिक्षणाची गुणवत्ता नाही. आरोग्य सेवाही तुटपुंजी आणि अनिश्चित.  तेव्हा तो खर्च हेही गरिबांना गरीब ठेवण्याचे एक कारण आहे. रोजगार हमी योजना जरी १०० दिवसांची हमी देते तर मागणी असूनसुद्धा ५० दिवसांच्या वर (प्रतिकुटुंब, प्रतिवर्षी, सरासरी) काम दिले जात नाही.

जर गरीब कुटुंब गरिबीतून बाहेर यायचे असेल तर त्यांच्या गरजा-शिक्षण, आरोग्य सेवा, सार्वजनिक दळणवळणाची साधने, बाजारपेठेत शोषण होऊ नये, असे नियमन, बँक, रस्ते, वीज, इंटरनेट, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारे छोटे व्यवसाय, नैसर्गिक संपत्तीचे संगोपन असे सर्व मिळणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी चार पैकी तीन जण गरीब होते. आता ते प्रमाण चार पैकी एक गरीब इतके कमी झाले. सरकारने पुरवलेल्या सोयीसुविधा,   त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्याने हे शक्य झाले. सरकारांनी योजनेच्या प्राप्तीचे कितीही मोठे आकडे मांडले तरी त्याचे सातत्य राहत नाही. सेवासुविधा पुरवणे सोपे नाही, सतत नजर ठेवून, अंमलबजावणीमधील नियमावली, पद्धती यात सुधार करत राहणे जरुरी आहे. एखादी योजना सुरू झाली तर आता ती नित्यनियमाने व्यवस्थित सुरू राहील असे नाही. सतर्क राहून आवश्यक बदल करावे लागतात.

पण हे का घडत नाही? भ्रष्टाचार, अनियमितता, अकार्यक्षमता, ही कारणे असतीलच; पण त्याहून महत्त्वाचे करण आहे ते आपली धोरणे, योजनांची आखणी, नियमन, यातील सुधारणा. हे काम किचकट आहे, त्याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत; पण गरिबीसारख्या प्रश्नावर झटपट उत्तरे असत नाहीत. आणि हे सर्व करण्याची अनिच्छा किंवा कंटाळा! म्हणून मग सरकारे झटपट पैसा वाटून गरिबांची अस्वस्थता कमी करण्याचे मार्ग शोधू पाहतात. म्हणजे आळशी कोण? सरकार की कष्ट करून गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड करणारे गरीब?

               pragati.abhiyan@gmail.com

टॅग्स :Farmerशेतकरी