शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 07:17 IST

गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत. 

- अश्वनी कुमार,

माजी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री

जागतिक संघर्ष चिघळत चाललेले असताना लोकशाही जगतात राजकीय नेतृत्वाचा प्रश्न कळीचा होऊन बसला आहे. जगाच्या विविध भागात उत्पन्न झालेला वैरभाव जागतिक नेतृत्वाचे अपयशच दर्शवितो. नैतिक मूल्यांच्या बाजूने उभे राहण्यात जागतिक नेत्यांनी दाखवलेली बेफिकिरी,  दादागिरी करणाऱ्या शक्तींपुढे गुडघे टेकणे हे सगळेच फार क्लेशदायक आहे. मानवतेचा गळा घोटणाऱ्या  सत्ताउन्मादातून सुरू झालेली युद्धे चिघळत चालली आहेत. सत्तेपेक्षा मूल्यभान महत्त्वाचे आहे, हे नेत्यांच्या मनावर बिंबवणे कधी नव्हते इतके महत्त्वाचे झाले आहे. विविध देशांमधील संघर्षाने जगाला धोक्याच्या काठावर उभे केले असून, धुरिणांच्या बौद्धिक आणि नैतिक दारिद्र्यामुळे लोकशाही देश प्रेरणादायी नेतृत्व निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. 

शीर्षस्थानी असलेली संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशादेशांतील संबंध नीट राखण्यात आंतरराष्ट्रीय कायदे निरुपयोगी ठरतात हे पुन्हा एकदा दिसले. इराक व युक्रेनच्या काही भागांवर झालेली बेकायदा आक्रमणे केवळ इतिहासातील तळटीपा होऊन बसल्या आहेत. जागतिक मतैक्याचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची आज जगाला गरज आहे. सद्य:स्थितीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची शिस्त पाळली पाहिजे; प्रादेशिक वाद मिटवायला हवेत, याचे स्मरण लोकशाही जगाचे नेतृत्व करणाऱ्यांना दिले  पाहिजे. लोकशाही नेतृत्व म्हणजे मूल्यांची पाठराखण, कितीही अडथळे येवोत सदैव सत्य उचलून धरणे, दुर्बलांना बळ-आवाज देणे होय. कसोटीच्या काळात लोकांना एकत्र आणणे, अवाजवी विषमता दूर करून मानवी प्रतिष्ठा पुढे नेणे हे सारे या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. शांतता-सलोख्याच्या वातावरणात मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करता येईल, अशी सामाजिक, राजकीय परिस्थिती निर्माण करण्यावर प्रेरक नेतृत्वाने भर दिला पाहिजे.

अर्थात, नेतृत्व काही पोकळीतून निर्माण होत नाही. माणसाचा विकास, परिस्थिती, प्रदेश यातून नेतृत्व निर्माण होते. ‘माणसे आपला इतिहास घडवतात; परंतु तो त्यांना हवा तसा घडवत नाहीत’ असे कार्ल मार्क्सने म्हटले ते आजची परिस्थिती  आणि पूर्वानुभव लक्षात घेता खरेच आहे.

 भारतीय लोकशाहीने आजवर अनेक चढउतार पाहिले. नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अनेक उत्तुंग नेत्यांनी ही लोकशाही समृद्ध केली आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या नेत्यांनी बदलास अभिमुख नेतृत्व कसे असते हे दाखवून दिले आहे. महात्माजींचे राजकारण सत्तापिपासू नव्हते. उलट स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेची आस  बाळगणाऱ्या लोकमानसातून ते उमललेले होते. त्यातूनच अन्यायाविरुद्ध शाश्वत अशी अहिंसक लढाई त्यांना उभी  करता आली. 

 गांधींच्या नैतिकतेने प्रेरित राजकारणाचा वारसदार असलेला भारत देश सर्वत्र न्यायाच्या रक्षणासाठी उभा राहिला पाहिजे. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने  आता नैतिक दंड थोपटले पाहिजेत. त्याची आर्थिक ताकद, आण्विक क्षमता, प्रादेशिक शक्ती यातून आंतरराष्ट्रीय नीतीधैर्य उंचावले पाहिजे. महत्त्वाच्या मित्रांपासून बाजूला न पडता किंवा धोरणात्मक स्वायत्तता न गमावता हे घडले पाहिजे. या कठीण काळात आपण आपल्या मोठ्या नेत्यांना पाचारण करून भारतीय लोकशाहीत चैतन्य निर्माण केले पाहिजे. सध्याच्या भग्न आणि भयाकुल कालखंडात आशेचे किरण ठरण्यासाठी सत्तापिपासू वृत्तीच्या पलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेणारे राजकारण केले पाहिजे. सध्या देशांतर्गत आणि बाहेरील आव्हाने सलोख्याला धोका उत्पन्न करत आहेत. सत्तेच्या  लंबकाचे हेलकावे सामाजिक समतोलाची परीक्षा पाहत आहेत. 

अशा वेळी आपल्याला बलवान, संवेदनशील, समजूतदार, निर्णायक अशा नेतृत्वाची गरज आहे. जे नेतृत्व महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गांनी मतैक्य घडवून आणू शकेल. अन्याय आणि धुमसत्या संघर्षांपासून बोध घेऊन आपण ‘बदल घडवून आणणाऱ्यां’च्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

टॅग्स :Indiaभारत