शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

कर्तृत्वशून्य कारभाराचा जाब कुणाला विचारायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:53 PM

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर होणारे दु:ख विसरुन भाजपने तीन महिन्यांत पहिल्यांदा रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी धरणे आंदोलन केले.

मिलिंद कुलकर्णीहातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर होणारे दु:ख विसरुन भाजपने तीन महिन्यांत पहिल्यांदा रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेतील फोलपणा महाविकास आघाडीच्या मजबुतीकरणामुळे लक्षात आल्याने प्रदेश अधिवेशनात भाजपला विरोधी पक्षाची भूमिका नाईलाजाने स्विकारावी लागलेली दिसत आहे. सर्वाधिक आमदार असतानाही सत्तेपासून वंचित रहावे लागले आहे; याचे दु:ख जेवढे आहे, त्यापेक्षा भीती ही आहे की, सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अन्य पक्षीयांना ‘घरवापसी’चे वेध लागले तर थोपवायचे कसे? म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची वारंवार घोषणा केली गेली; परंतु किमान समान कार्यक्रमावर गठीत झालेल्या या सरकारने वादग्रस्त विषय समोर आले तरी सामोपचार आणि सामंजस्याने ते सोडवित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपपुढे संघर्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेण्याच्या या भाजपच्या कृतीचे स्वागत करायला हवे. कोणत्याही सरकारवर विरोधी पक्षाचा अंकुश राहिला तर जनहितविरोधी निर्णय घेण्यास सरकार धजावत नाही.भाजपने धरणे आंदोलनासाठी काही मुद्दे हाती घेतले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत करु ही आश्वासने महाविकास आघाडीने पाळली नाही, हा पहिला मुद्दा होता. तर दुसºया मुद्यात गुन्हेगारांना धाक न राहिल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे या गंभीर समस्येला हात घातला आहे. भाजपने महत्त्वाच्या प्रश्नांवर संघर्ष सुरु केला आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती यासंबंधी सरकारला निश्चित शेतकºयांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा लागेल. आंध्रच्या धर्तीवर कायदा करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर केले होते, आता अधिवेशनात ते विधेयक आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. भाजपने दबाव वाढविला आहे, आणि तो रास्त म्हणावा लागेल.अवघ्या तीन महिन्यात सरकारची संभावना ही विश्वासघातकी अशी करणाºया भाजपने आता स्वत:च्या ताब्यात असलेल्या केंद्र सरकार, जिल्हा परिषदा, पालिकांमधील कारभाराची जबाबदारीदेखील घ्यायला हवी. तेथील कर्तृत्वशून्य नेतृत्व, दिशाहीन कारभार, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप आणि या सर्वांंचा जनसामान्यांच्या जीवनावर होणारा विपरीत परिणाम याचा जाब कोणाला विचारायचा आणि कोणी विचारायचा हेदेखील भाजपने एकदा स्पष्ट करावे. खान्देशचा विचार केला तर चारही खासदार हे भाजपचे आहेत. गेल्या सहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. मात्र राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा घोळ काही संपता संपेना. चार खासदार आणि या कामाशी संबंधित मंत्री नेमके करतात काय, हा प्रश्न आता जनतेला पडला आहे.तीच अवस्था जळगाव जिल्हा परिषद, जळगाव आणि धुळे महापालिका यांची आहे. अमृत पाणी योजना, मल निस्सारण योजना, घनकचरा प्रकल्प या केंद्र व राज्य शासनाशी निगडीत योजना सुरळीतपणे राबविल्या न गेल्याने पालिका आणि ठेकेदारांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की, मुदतीत कामे झाली नाही, त्यामुळे पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे न करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे. धूळ आणि धुराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन्ही शहरे बकाल झाली आहेत. अतिक्रमणांना सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवक अभय देत असल्याने प्रशासनाचे हात बांधले आहेत. ‘एक वर्षात विकास करुन दाखवू, १०० कोटींचा निधी आणू, ८०० कोटींचा निधी आणला ’ अशा वल्गना करणारे नेते आता कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत, हे सामान्य नागरिकांना कळायला मार्ग नाही. राज्य सरकारची तीन महिन्यात परीक्षा घेणाºया भाजपने स्वत:च्या ताब्यातील संस्थांचा कारभार तरी सुरळीत आणि प्रामाणिकपणे केला तर नागरिकांचे किमान आशीर्वाद तरी पुढील निवडणुकीत त्यांना मिळतील, अन्यथा राज्याप्रमाणे जिल्हा परिषदा आणि पालिकादेखील गमावण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. विरोधी पक्षाचा अनुभव असल्याने ही भूमिका भाजप स्थानिक पातळीवर चांगली निभावू शकेल, असे जनतेला वाटू लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव