शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:47 IST

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली.

राही भिडे

सध्या देशभर नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, असे रोजगाराच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२२मध्ये जागतिक व्यापारवाढीचा दर ३.५ टक्के असेल, तर २०२३मध्ये तो केवळ एक टक्क्यांपर्यंत कमी होईल. एक प्रकारे, हा अंदाज जागतिक मंदीचा सांगावा आहे. म्हणजे भारताची निर्यात आणखी कमी होईल आणि ही घट म्हणजे रोजगार बाजारावर आलेले काळे ढग असतील. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या आकडेवारीवरून असे दिसते, की बेरोजगारीचा दर सप्टेंबर २०२२मध्ये ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर आठ टक्के नोंदवला गेला. बेरोजगारी भारतीय अर्थव्यवस्थेला जळूसारखी चिकटली आहे, यात शंका नाही. जून २०२०पासून, बेरोजगारीचा सरासरी दर ७.७ टक्के राहिला आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२२मध्ये केवळ बेरोजगारीचा दर वाढला नाही तर रोजगार बाजारपेठेतील कामगारांचा सहभागही कमी झाला आहे. कामगार सहभाग दर (लेबर पार्टिसीपेशन रेट, एलपीआर) सप्टेंबर २०२२मध्ये ३९.३ टक्के होता, जो ऑक्टोबर २०२२मध्ये  ३९ टक्के झाला. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२पर्यंत (एप्रिल महिना वगळता) ‘एलपीआर’ सतत ४० टक्क्यांच्या खाली आहे. ‘एलपीआर’मधील घसरण हे कार्यरत लोकसंख्येमध्ये वाढत्या नैराश्याचे द्योतक  आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली. म्हणजे जवळपास २२ लाख लोक रोजगार बाजारातून निराश होऊन आपल्या घरी परतले.  ग्रामीण भागातील नोकऱ्या कमी होऊ लागतात, त्याही बिगर कृषी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतात, तेव्हा नोकरीच्या बाजारपेठेतील परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण नोकऱ्यांमध्ये झालेली घसरण ही केवळ बिगर कृषी क्षेत्रात झाली आहे. तथापि, ऑक्टोबर २०२२वगळता कृषी क्षेत्रातही गेल्या एक वर्षापासून नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत, नोव्हेंबर २०२१मध्ये कृषी क्षेत्रात १६.४ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु, त्यानंतर हा आकडा झपाट्याने खाली आला. सप्टेंबर २०२२मध्ये केवळ १३ कोटी ४० लाख लोक कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबर २०२२मध्ये या आकडेवारीत थोडी सुधारणा झाली आणि ती वाढून १३.९६ कोटी झाली. परंतु, गेल्या ४ वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात कृषी क्षेत्रातील नोकऱ्यांचा हा किमान आकडा आहे. सेवा क्षेत्रदेखील ऑक्टोबर २०२२मध्ये कोमेजलेले दिसले. सेवा क्षेत्रातील ७९ लाख नोकऱ्या गेल्या. यापैकी ४.६ दशलक्ष ग्रामीण भागात आणि ४.३ दशलक्ष किरकोळ क्षेत्रात होते. म्हणजेच सेवा क्षेत्राचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या रिटेल क्षेत्राची अवस्थाही ग्रामीण भागात दयनीय होत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, की ग्रामीण भारतातील क्रयशक्ती कमी होत आहे आणि मागणी कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्राचे चित्रही उदास आहे. येथे ऑक्टोबर २०२२मध्ये ५३ लाख नोकऱ्या गेल्या. सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणाऱ्या  बांधकाम क्षेत्रात दहा लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या. ऑक्टोबर २०२२मध्ये शहरी भागातील रोजगाराची स्थिती थोडी चांगली दिसली. परंतु, नोव्हेंबर २०२२च्या बेरोजगारीच्या दरवाढीमुळे ही सुधारणा अनावश्यक होत असल्याचे दिसते. नोव्हेंबर २०२२मध्ये शहरी बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांच्या वर आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दरही साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२मध्ये शहरांमध्ये एकूण १२.६ कोटी नोकऱ्या होत्या. ऑक्टोबर २०२२मध्ये हा आकडा वाढून १२.७४ कोटी झाला. मात्र, आकारमानाचा विचार करता शहरी भागासाठी ही वाढ नगण्य आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये, निर्यात १६.६५ टक्क्यांनी घसरून वीस महिन्यांच्या नीचांकी २९.७८ अब्ज डॉलरवर आली, तर आयात सहा टक्क्यांनी वाढून ५६.६९ अब्ज डॉलर झाली आहे. २०२२च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, निर्यात केवळ १२.५५ टक्क्यांनी वाढली आणि  २६३.३५ अब्ज डॉलर झाली, तर आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून  ४३६.८१ अब्ज डॉवर झाली. निर्यात - आयातीची ही प्रवृत्ती देशांतर्गत रोजगार बाजाराच्या भविष्यासाठी दुधारी तलवारीसारखी आहे. एकीकडे निर्यातीत घट झाल्याने नोकऱ्यांचे नुकसान होणार आहे, तर दुसरीकडे आयात बिल वाढल्याने भांडवली गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्याचा परिणाम रोजगार उपलब्धतेवर होणार आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत