शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वाचनीय लेख - इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:47 IST

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली.

राही भिडे

सध्या देशभर नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, असे रोजगाराच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२२मध्ये जागतिक व्यापारवाढीचा दर ३.५ टक्के असेल, तर २०२३मध्ये तो केवळ एक टक्क्यांपर्यंत कमी होईल. एक प्रकारे, हा अंदाज जागतिक मंदीचा सांगावा आहे. म्हणजे भारताची निर्यात आणखी कमी होईल आणि ही घट म्हणजे रोजगार बाजारावर आलेले काळे ढग असतील. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या आकडेवारीवरून असे दिसते, की बेरोजगारीचा दर सप्टेंबर २०२२मध्ये ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर आठ टक्के नोंदवला गेला. बेरोजगारी भारतीय अर्थव्यवस्थेला जळूसारखी चिकटली आहे, यात शंका नाही. जून २०२०पासून, बेरोजगारीचा सरासरी दर ७.७ टक्के राहिला आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२२मध्ये केवळ बेरोजगारीचा दर वाढला नाही तर रोजगार बाजारपेठेतील कामगारांचा सहभागही कमी झाला आहे. कामगार सहभाग दर (लेबर पार्टिसीपेशन रेट, एलपीआर) सप्टेंबर २०२२मध्ये ३९.३ टक्के होता, जो ऑक्टोबर २०२२मध्ये  ३९ टक्के झाला. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२पर्यंत (एप्रिल महिना वगळता) ‘एलपीआर’ सतत ४० टक्क्यांच्या खाली आहे. ‘एलपीआर’मधील घसरण हे कार्यरत लोकसंख्येमध्ये वाढत्या नैराश्याचे द्योतक  आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली. म्हणजे जवळपास २२ लाख लोक रोजगार बाजारातून निराश होऊन आपल्या घरी परतले.  ग्रामीण भागातील नोकऱ्या कमी होऊ लागतात, त्याही बिगर कृषी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतात, तेव्हा नोकरीच्या बाजारपेठेतील परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण नोकऱ्यांमध्ये झालेली घसरण ही केवळ बिगर कृषी क्षेत्रात झाली आहे. तथापि, ऑक्टोबर २०२२वगळता कृषी क्षेत्रातही गेल्या एक वर्षापासून नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत, नोव्हेंबर २०२१मध्ये कृषी क्षेत्रात १६.४ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु, त्यानंतर हा आकडा झपाट्याने खाली आला. सप्टेंबर २०२२मध्ये केवळ १३ कोटी ४० लाख लोक कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबर २०२२मध्ये या आकडेवारीत थोडी सुधारणा झाली आणि ती वाढून १३.९६ कोटी झाली. परंतु, गेल्या ४ वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात कृषी क्षेत्रातील नोकऱ्यांचा हा किमान आकडा आहे. सेवा क्षेत्रदेखील ऑक्टोबर २०२२मध्ये कोमेजलेले दिसले. सेवा क्षेत्रातील ७९ लाख नोकऱ्या गेल्या. यापैकी ४.६ दशलक्ष ग्रामीण भागात आणि ४.३ दशलक्ष किरकोळ क्षेत्रात होते. म्हणजेच सेवा क्षेत्राचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या रिटेल क्षेत्राची अवस्थाही ग्रामीण भागात दयनीय होत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, की ग्रामीण भारतातील क्रयशक्ती कमी होत आहे आणि मागणी कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्राचे चित्रही उदास आहे. येथे ऑक्टोबर २०२२मध्ये ५३ लाख नोकऱ्या गेल्या. सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणाऱ्या  बांधकाम क्षेत्रात दहा लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या. ऑक्टोबर २०२२मध्ये शहरी भागातील रोजगाराची स्थिती थोडी चांगली दिसली. परंतु, नोव्हेंबर २०२२च्या बेरोजगारीच्या दरवाढीमुळे ही सुधारणा अनावश्यक होत असल्याचे दिसते. नोव्हेंबर २०२२मध्ये शहरी बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांच्या वर आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दरही साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२मध्ये शहरांमध्ये एकूण १२.६ कोटी नोकऱ्या होत्या. ऑक्टोबर २०२२मध्ये हा आकडा वाढून १२.७४ कोटी झाला. मात्र, आकारमानाचा विचार करता शहरी भागासाठी ही वाढ नगण्य आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये, निर्यात १६.६५ टक्क्यांनी घसरून वीस महिन्यांच्या नीचांकी २९.७८ अब्ज डॉलरवर आली, तर आयात सहा टक्क्यांनी वाढून ५६.६९ अब्ज डॉलर झाली आहे. २०२२च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, निर्यात केवळ १२.५५ टक्क्यांनी वाढली आणि  २६३.३५ अब्ज डॉलर झाली, तर आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून  ४३६.८१ अब्ज डॉवर झाली. निर्यात - आयातीची ही प्रवृत्ती देशांतर्गत रोजगार बाजाराच्या भविष्यासाठी दुधारी तलवारीसारखी आहे. एकीकडे निर्यातीत घट झाल्याने नोकऱ्यांचे नुकसान होणार आहे, तर दुसरीकडे आयात बिल वाढल्याने भांडवली गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्याचा परिणाम रोजगार उपलब्धतेवर होणार आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत