शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

वाचनीय लेख - इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:47 IST

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली.

राही भिडे

सध्या देशभर नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, असे रोजगाराच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२२मध्ये जागतिक व्यापारवाढीचा दर ३.५ टक्के असेल, तर २०२३मध्ये तो केवळ एक टक्क्यांपर्यंत कमी होईल. एक प्रकारे, हा अंदाज जागतिक मंदीचा सांगावा आहे. म्हणजे भारताची निर्यात आणखी कमी होईल आणि ही घट म्हणजे रोजगार बाजारावर आलेले काळे ढग असतील. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या आकडेवारीवरून असे दिसते, की बेरोजगारीचा दर सप्टेंबर २०२२मध्ये ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर आठ टक्के नोंदवला गेला. बेरोजगारी भारतीय अर्थव्यवस्थेला जळूसारखी चिकटली आहे, यात शंका नाही. जून २०२०पासून, बेरोजगारीचा सरासरी दर ७.७ टक्के राहिला आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२२मध्ये केवळ बेरोजगारीचा दर वाढला नाही तर रोजगार बाजारपेठेतील कामगारांचा सहभागही कमी झाला आहे. कामगार सहभाग दर (लेबर पार्टिसीपेशन रेट, एलपीआर) सप्टेंबर २०२२मध्ये ३९.३ टक्के होता, जो ऑक्टोबर २०२२मध्ये  ३९ टक्के झाला. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२पर्यंत (एप्रिल महिना वगळता) ‘एलपीआर’ सतत ४० टक्क्यांच्या खाली आहे. ‘एलपीआर’मधील घसरण हे कार्यरत लोकसंख्येमध्ये वाढत्या नैराश्याचे द्योतक  आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली. म्हणजे जवळपास २२ लाख लोक रोजगार बाजारातून निराश होऊन आपल्या घरी परतले.  ग्रामीण भागातील नोकऱ्या कमी होऊ लागतात, त्याही बिगर कृषी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतात, तेव्हा नोकरीच्या बाजारपेठेतील परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण नोकऱ्यांमध्ये झालेली घसरण ही केवळ बिगर कृषी क्षेत्रात झाली आहे. तथापि, ऑक्टोबर २०२२वगळता कृषी क्षेत्रातही गेल्या एक वर्षापासून नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत, नोव्हेंबर २०२१मध्ये कृषी क्षेत्रात १६.४ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु, त्यानंतर हा आकडा झपाट्याने खाली आला. सप्टेंबर २०२२मध्ये केवळ १३ कोटी ४० लाख लोक कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबर २०२२मध्ये या आकडेवारीत थोडी सुधारणा झाली आणि ती वाढून १३.९६ कोटी झाली. परंतु, गेल्या ४ वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात कृषी क्षेत्रातील नोकऱ्यांचा हा किमान आकडा आहे. सेवा क्षेत्रदेखील ऑक्टोबर २०२२मध्ये कोमेजलेले दिसले. सेवा क्षेत्रातील ७९ लाख नोकऱ्या गेल्या. यापैकी ४.६ दशलक्ष ग्रामीण भागात आणि ४.३ दशलक्ष किरकोळ क्षेत्रात होते. म्हणजेच सेवा क्षेत्राचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या रिटेल क्षेत्राची अवस्थाही ग्रामीण भागात दयनीय होत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, की ग्रामीण भारतातील क्रयशक्ती कमी होत आहे आणि मागणी कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्राचे चित्रही उदास आहे. येथे ऑक्टोबर २०२२मध्ये ५३ लाख नोकऱ्या गेल्या. सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणाऱ्या  बांधकाम क्षेत्रात दहा लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या. ऑक्टोबर २०२२मध्ये शहरी भागातील रोजगाराची स्थिती थोडी चांगली दिसली. परंतु, नोव्हेंबर २०२२च्या बेरोजगारीच्या दरवाढीमुळे ही सुधारणा अनावश्यक होत असल्याचे दिसते. नोव्हेंबर २०२२मध्ये शहरी बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांच्या वर आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दरही साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२मध्ये शहरांमध्ये एकूण १२.६ कोटी नोकऱ्या होत्या. ऑक्टोबर २०२२मध्ये हा आकडा वाढून १२.७४ कोटी झाला. मात्र, आकारमानाचा विचार करता शहरी भागासाठी ही वाढ नगण्य आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये, निर्यात १६.६५ टक्क्यांनी घसरून वीस महिन्यांच्या नीचांकी २९.७८ अब्ज डॉलरवर आली, तर आयात सहा टक्क्यांनी वाढून ५६.६९ अब्ज डॉलर झाली आहे. २०२२च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, निर्यात केवळ १२.५५ टक्क्यांनी वाढली आणि  २६३.३५ अब्ज डॉलर झाली, तर आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून  ४३६.८१ अब्ज डॉवर झाली. निर्यात - आयातीची ही प्रवृत्ती देशांतर्गत रोजगार बाजाराच्या भविष्यासाठी दुधारी तलवारीसारखी आहे. एकीकडे निर्यातीत घट झाल्याने नोकऱ्यांचे नुकसान होणार आहे, तर दुसरीकडे आयात बिल वाढल्याने भांडवली गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्याचा परिणाम रोजगार उपलब्धतेवर होणार आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत