शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे चाललोय आपण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:55 IST

एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?

- जितेंद्र ढवळेएखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?आठ दिवसांपूर्वी नागपुरात पवनकर कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या कशासाठी करण्यात आली? मारणारा संशयित आरोपी विवेक पालटकर हा सायको होता? त्याने कौटुंबिक वादातून हे हत्यांकाड घडवून आणले, असा कयास परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी बांधला आहे. नराधम पालटकर हत्याकांडानंतर फरार झाला आहे. मात्र या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर आणि नागपूरकरांवर प्रेम न करणाऱ्यांनी पुन्हा एकदा नागपूरला ‘क्राईम कॅपिटल’ची बिरुदावली लावली आहे. गत सहा वर्षांत नागपुरात दुहेरी हत्याकांडाची सहा आणि तिहेरी हत्याकांडाची पाच प्रकरणं घडली. काही व्यक्तिगत कारणांमुळे तर काही आपसी वैमनस्यातून ही हत्याकांड घडली आहेत. मुळात या हत्याकांडाचा खोलवर अभ्यास केला तर क्रोध आणि अहंकार या दोन गोष्टी यात दडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी नरसाळ्यात कोंबडी अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एका माथेफिरूने तिघांना ठार मारले होते. अतिक्रोधाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.२६ जून २०१२ रोजी कळमन्यातील आभा कॉलनीत नाथजोगी समुदायातील सुपडा मगन नागनाथ, हसन दादाराव सोलंकी आणि पंजाब भिकाराम शिंदे या तिघांची जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. हे बिचारे पोट भरण्यासाठी महिलांचे सोंग (वेशांतर) करून भीक मागत होते. जमावाच्या नावाखाली अविवेकी वृत्तीने या तिघांना दगडाने ठेचून ठार मारले होते. या हत्याकांडात तर मारणारे आणि मरणारे दोन्ही पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. मग यालाही क्राईम कॅपिटलची फोडणी आपण लावायची का? १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नंदनवन परिसरात राशी कांबळे आणि उषा सेवकदास कांबळे या आजीनातीची गणेश शाहू आणि साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. यात मरणाºया राशीचा काय दोष होता ? मात्र येथेही क्रोधाने निरागस मुलीचा बळी घेतला. स्वत:च्या चार वर्षीय मुलासह बहीण, जावई, भाची आणि बहिणीची सासू या सर्वांना एकाच वेळी एवढ्या क्रूरपणे मारून विवेक पालटकर याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र हे हत्याकांड त्यानेच घडवून आणले, हे अद्यापही कायदेशीररीत्या कुठेच सिद्ध झालेले नाही. पालटकरला तातडीने अटक झालीच पाहीजे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून पवनकर कुटुंबातील हत्याकांडावर पर्दाफाश करण्याची मागणी समाजातून प्रखरतेने होताना दिसत नाही. मात्र एखादे हत्याकांड घडल्यानंतर केवळ पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही, नागपूरची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे उपदेश सोशल मीडियावर पहायला आणि शहरातील कट्ट्यावर ऐकायला मिळतात. मात्र हे असे का होतेय ? नागपुरात अशा घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर कुणी तसा मॅसेज किंवा व्हिडीओ टाकल्याचे क्वचितच पाहावयास मिळते. मात्र एखाद्या पोलीस वाल्याने कुणाशी वाद घातला किंवा कुणाला मारले तर तो व्हिडीओ आम्ही क्षणाचाही विलंब न करता विविध गु्रपवर व्हायरल करतो. मात्र नागपुरात एखादी चांगली घटना घडली तर ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी किती लोक पुढाकार घेतात? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असतील तर हे माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? सजग नागपूरकर म्हणून ही आमची जबाबदारी नाही का ?

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया