शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

राजकीय स्खलन कधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 6:50 AM

नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्राला येत्या काही वर्षांत कोणत्या पातळीवर नेऊन ठेवणार, ही चिंता आणि चिंतनाची बाब आहे.

वैचारिक व्यभिचारातून निर्माण झालेली ही नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्राला येत्या काही वर्षांत कोणत्या पातळीवर नेऊन ठेवणार, ही चिंता आणि चिंतनाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत आणि त्यातही गेल्या वर्षभरात हे राजकीय स्खलन फार वेगाने झाले. त्याचा अंत काय होईल?विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात राजकीय अधिष्ठान हा शब्दप्रयोग पुढे आला. या लढ्याकडे केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष या नजरेने न पाहता हा लढा लढताना जनतेमध्ये राजकीय आणि वैचारिक जागृती निर्माण करावी हा त्यामागचा हेतू होता. काँग्रेस पक्षाची स्थापना ही अशाच वैचारिक मंथनातून झाली होती. त्याच वेळी जगाच्या राजकीय व्यासपीठावर फ्रान्समधील लोकशाहीचे आंदोलन रशियन राज्यक्रांती या वैचारिक अधिष्ठानावर लढल्या गेलेल्या राजकीय लढ्याची उदाहरणे होती. त्यामुळे हा लढा या अंगाने पुढे नेत जनजागृती करावी हा विचार पुढे आला. लोकमान्य टिळकांनी तो सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले, तर पुढची म्हणजे १९२० नंतरची सत्तावीस वर्षे भारतीय राजकारण महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाने व्यापून टाकले होते. तरीही साम्यवादी आणि समाजवादी प्रवाह आपली विचारधारा टिकवून होते. हाच काळ हिंदू राष्ट्रवादाच्या उदयाचा होता. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून हिंदू राष्ट्रवादाची कल्पना रुजविली आणि येथून पुढची पंचवीस वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या राष्ट्रीय आंदोलनाची होती तशी या वेगवेगळ्या विचारांच्या वैचारिक आंदोलनाचीही होती. या सगळ्या मंथनातून स्वातंत्र्योत्तर काळातील पुढच्या पन्नास वर्षांच्या भारतीय राजकारणाने आकार घेतला आणि हा काळ महात्मा गांधींनी बांधणी केलेल्या काँग्रेसच्या राजकीय अधिष्ठानाचा होता.

या काळात सत्तेसाठी अनेक पक्षांच्या आघाड्या बनल्या. त्यांनी राज्यकारभारही वेगवेगळ्या राज्यांमध्ये केला. १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग हा एका समान राजकीय हेतूने प्रेरित होऊन तो झाला; पण परस्पर विरोधी विचारधारांचे कडबोळे बांधून सत्ता प्राप्त केली की काय होते, याचा परिपाठ यातून मिळाला. यापूर्वी वैचारिक समान धागा असलेल्या पक्षांच्या आघाड्या बनल्या होत्या. काँग्रेस आणि समाजवादी ही विचारधारा समांतर असल्याने अशी प्रादेशिक सरकारे अस्तित्वात आली; परंतु जनता पक्षाच्या प्रयोगात जनसंघाचा समावेश केला गेला. त्यात समान धागा नव्हता म्हणूनच तो फसला. म्हणजे या राजकीय संकटातून राजकीय गोंधळच निर्माण झाला आणि भारतीय राजकारणातून राजकीय अधिष्ठानाचे स्खलन सुरू झाले. हे सगळे मांडण्याचे कारण म्हणजे आज महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत जो राजकीय गोंधळ सुरू आहे, हा त्याचा परिपाक म्हटला पाहिजे. सत्ताप्राप्तीसाठी समान वैचारिक धागा असलाच पाहिजे. एवढीसुद्धा नैतिकता पाळायची कोणाचीही तयारी नाही आणि मिळेल त्या मार्गाने येईल त्याच्या सोबत सत्तासोबत करताना कोणालाही गैर वाटत नाही.
वैचारिक व्यभिचारातून निर्माण झालेली ही नवी राजकीय संस्कृती कुठे नेणार? गेल्या काही वर्षांत आणि त्यातही गेल्या वर्षभरात हे राजकीय स्खलन फार वेगाने झाले. भाजपच्या फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दुराग्रहापायी या पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या मांडवात आणून बसवले. त्यांनी निर्माण केलेल्या ‘साम्राज्याला’ धोका निर्माण होईल, अशा धाकातून हे घाऊक पक्षांतर झाले आणि उरल्यासुरल्या वैचारिक राजकीय निष्ठा किंवा अधिष्ठानाला तिलांजली मिळाली आणि कोणतेही तारतम्य, जनकल्याण यापेक्षा केवळ पैसा, धर्म, जात, राजकीय प्राबल्य या आधारावर प्राबल्य असलेल्या आणि स्वार्थासाठी सत्ता प्राप्त करून राबविणाऱ्या नव्या संस्कृतीचा उदय झाला. आज राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी निवडणुकीचा शिमगा चालू आहे. ती या नव्या राजकीय संस्कृतीची चुणूक म्हणावी लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुसंख्य जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या नव्या संस्कृतीने त्यांचे राजकीय गणित तोडून टाकलेले दिसते. स्वातंत्र्यलढ्याचे वैचारिक नेतृत्व करणाºया या महाराष्ट्रातील राजकारणाला आजवर एक वैचारिक अधिष्ठान होते. राजकीय पाट लावण्याच्या नादात आता महाराष्ट्राच्या राजकारणाची किती अधोगती होणार, याचीच चिंता आहे. कारण यापुढे किमान एक तपाचा काळ तरी ही राजकीय संस्कृती फुलणार आहे आणि ही महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ठरू नये.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार