शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा शशी थरूर यांचा देह, मन आणि बुद्धीही चोरली जाते... AI वाले थरूरच प्रश्न विचारत होते...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 10:27 IST

तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात शशी थरूर यांच्या AI अवताराने त्यांचीच मुलाखत घेतली. थक्क करणाऱ्या त्या अनुभवाबद्दल....

- अनंत घोटगाळकर, लेखक, अनुवादकशशी थरूर यांनी आजवर शेकडो मुलाखती दिल्या असतील. पण काही दिवसांपूर्वी तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना द्याव्या लागलेल्या मुलाखतीचं स्वरूप त्यांनाही नवखं होतं, कारण मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या चेहऱ्यात, भावमुद्रांत आणि लकबीतही तिळमात्र अंतर नव्हतं. दोघांचीही उच्चारण शैली, शब्दनिवड आणि शब्दफेक एकसारखीच! मुलाखतकाराने थरूर यांचा देहच नव्हे तर त्यांचं मन आणि बुद्धीही जणू चोरली होती. हे आक्रीत बहुचर्चित कृत्रिम बुद्धिमत्तेनं (AI) घडवून आणलं होतं. हा मुलाखतकार कुणी जिवंत माणूस नव्हताच, तो थरूर यांचा AI अवतार होता. नखशिखांत थरूर अंतर्बाह्य थरूर, आभासी प्रतिमा जिवंत व्यक्तीसारखा विचार करू शकत होती. मुलाखतीत एका प्रश्नाला मिळालेलं उत्तर समजून घेऊन प्रतिसाद देत पुढला प्रश्न विचारत होती. अत्यंत तंत्रस्नेही असूनही साक्षात थरूरही यामुळे आरंभी थक्क झाले होते. माहिती असणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभवणं वेगळं, एखाद्या मुरब्बी मुलाखतकाराच्या थाटात तन्हेत-हेचे प्रश्न विचारून या अवताराने थरूरांचं व्यक्तित्व श्रोत्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न केला.

बहुस्वरता हे या साहित्य महोत्सवाचं मुख्य सूत्र होतं. साहित्य आणि बहुस्वरता यांच्यामधील संबंध उलगडून दाखवताना थरूर म्हणाले की, 'लोकशाही जीवनपद्धतीत तऱ्हेतऱ्हेच्या मतांचा स्वीकार आणि आदर करणं आणि साहित्यातही अशा विविधतेचा पुरस्कार करणं हे परस्परपूरक असून, त्यातून बहुस्वरता पुष्ट होते. समाजातील बहुस्वरतेची गळचेपी करावयाची असेल तर साहित्यातही मतभिन्नता दडपणं ओघानेच येतं; समाजातील आणि साहित्यातील बहुस्वरता अशी परस्परावलंबी असते.'

समाजाच्या धारणा घडवण्यात या डिजिटल माध्यमांची भूमिका कोणती, या प्रश्नावर ते म्हणाले, 'आपण या माध्यमात सुरुवातीला उतरलो तेव्हाच्या आणि आताच्या अवस्थेत फारच फरक पडला आहे. सुरुवातीला या माध्यमात डोकावणाऱ्या लोकांची संख्या अगदी मर्यादित होती. त्यांच्या विचारांवर प्रभाव पाहणं त्यावेळी अधिक प्रमाणात शक्य होतं. कारण त्यात खऱ्याखुऱ्या व्यक्ती खऱ्याखुऱ्या नावाने वावरत होत्या. आता संघटित जथ्थे तिथं गोळा झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले आयटी सेल्स बनवले आहेत. ते लोकांवर आपल्या राजकीय दृष्टिकोनाचा अखंड मारा करत आहेत. एका अक्षराचा फरक नसलेले शेकडो मेसेज एकाचवेळी अनेक खात्यांवरून सामान्य माणसाच्या डोळ्यांवर आदळत आहेत. त्यामुळे योग्य दृष्टिकोन घडवण्याचं काम कठीण बनलं आहे. हल्ली माणसं स्वतःच्या मताला पुष्टी देणारे संदेशच केवळ वाचतात. एकांगी बनलेली माध्यमं पूर्वग्रहांचं दृढीकरण करण्याचं साधन बनली आहेत. तथापि सार्वजनिक संवाद घडतो तिथं मतं प्रभावित होतातच. म्हणूनच ही माध्यमं सोडून द्यावीतसं वाटत नाही.' 

कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रश्न तयार केले आणि तिनेच बनवलेल्या त्यांच्या स्वत:च्याच प्रतिमेने त्यांना ते विचारले, हा अनुभव कसा वाटला, या प्रश्नावर थरूर म्हणाले, 'आपल्याला हवी ती उत्तरं शोधून देणारं इंटरनेट स्वतःच प्रश्न तयार करतं ही मोठी गमतीची गोष्ट वाटली. परंतु माझी प्रतिमा माझ्याच आवाजात ते प्रश्न विचारते यामुळे मात्र काहीशी धास्तीही वाटली. कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या दिसण्याची, आवाजाची तंतोतंत नक्कल करता येणं हे भयावह आहे. उद्या काहीही भयानक गोष्टी एखाद्याच्या तोंडी घातल्या जाऊ शकतील आणि त्याला गोत्यात आणलं जाऊ शकेल, काळजी तर वाटणारच'

ही सारी गंमत मानायची की आपण कुठल्यातरी धोकादायक गुहेचे दार उघडून आत जात आहोत, असा प्रश्न थरूर यांना पडला तसाच तो आपल्यालाही पडेल यात शंका नाही. आपल्याच बुद्धीने निर्माण केलेली ही करामत आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे, कुणास ठाऊक?

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर