शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जेव्हा शशी थरूर यांचा देह, मन आणि बुद्धीही चोरली जाते... AI वाले थरूरच प्रश्न विचारत होते...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 10:27 IST

तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात शशी थरूर यांच्या AI अवताराने त्यांचीच मुलाखत घेतली. थक्क करणाऱ्या त्या अनुभवाबद्दल....

- अनंत घोटगाळकर, लेखक, अनुवादकशशी थरूर यांनी आजवर शेकडो मुलाखती दिल्या असतील. पण काही दिवसांपूर्वी तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना द्याव्या लागलेल्या मुलाखतीचं स्वरूप त्यांनाही नवखं होतं, कारण मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या चेहऱ्यात, भावमुद्रांत आणि लकबीतही तिळमात्र अंतर नव्हतं. दोघांचीही उच्चारण शैली, शब्दनिवड आणि शब्दफेक एकसारखीच! मुलाखतकाराने थरूर यांचा देहच नव्हे तर त्यांचं मन आणि बुद्धीही जणू चोरली होती. हे आक्रीत बहुचर्चित कृत्रिम बुद्धिमत्तेनं (AI) घडवून आणलं होतं. हा मुलाखतकार कुणी जिवंत माणूस नव्हताच, तो थरूर यांचा AI अवतार होता. नखशिखांत थरूर अंतर्बाह्य थरूर, आभासी प्रतिमा जिवंत व्यक्तीसारखा विचार करू शकत होती. मुलाखतीत एका प्रश्नाला मिळालेलं उत्तर समजून घेऊन प्रतिसाद देत पुढला प्रश्न विचारत होती. अत्यंत तंत्रस्नेही असूनही साक्षात थरूरही यामुळे आरंभी थक्क झाले होते. माहिती असणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभवणं वेगळं, एखाद्या मुरब्बी मुलाखतकाराच्या थाटात तन्हेत-हेचे प्रश्न विचारून या अवताराने थरूरांचं व्यक्तित्व श्रोत्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न केला.

बहुस्वरता हे या साहित्य महोत्सवाचं मुख्य सूत्र होतं. साहित्य आणि बहुस्वरता यांच्यामधील संबंध उलगडून दाखवताना थरूर म्हणाले की, 'लोकशाही जीवनपद्धतीत तऱ्हेतऱ्हेच्या मतांचा स्वीकार आणि आदर करणं आणि साहित्यातही अशा विविधतेचा पुरस्कार करणं हे परस्परपूरक असून, त्यातून बहुस्वरता पुष्ट होते. समाजातील बहुस्वरतेची गळचेपी करावयाची असेल तर साहित्यातही मतभिन्नता दडपणं ओघानेच येतं; समाजातील आणि साहित्यातील बहुस्वरता अशी परस्परावलंबी असते.'

समाजाच्या धारणा घडवण्यात या डिजिटल माध्यमांची भूमिका कोणती, या प्रश्नावर ते म्हणाले, 'आपण या माध्यमात सुरुवातीला उतरलो तेव्हाच्या आणि आताच्या अवस्थेत फारच फरक पडला आहे. सुरुवातीला या माध्यमात डोकावणाऱ्या लोकांची संख्या अगदी मर्यादित होती. त्यांच्या विचारांवर प्रभाव पाहणं त्यावेळी अधिक प्रमाणात शक्य होतं. कारण त्यात खऱ्याखुऱ्या व्यक्ती खऱ्याखुऱ्या नावाने वावरत होत्या. आता संघटित जथ्थे तिथं गोळा झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले आयटी सेल्स बनवले आहेत. ते लोकांवर आपल्या राजकीय दृष्टिकोनाचा अखंड मारा करत आहेत. एका अक्षराचा फरक नसलेले शेकडो मेसेज एकाचवेळी अनेक खात्यांवरून सामान्य माणसाच्या डोळ्यांवर आदळत आहेत. त्यामुळे योग्य दृष्टिकोन घडवण्याचं काम कठीण बनलं आहे. हल्ली माणसं स्वतःच्या मताला पुष्टी देणारे संदेशच केवळ वाचतात. एकांगी बनलेली माध्यमं पूर्वग्रहांचं दृढीकरण करण्याचं साधन बनली आहेत. तथापि सार्वजनिक संवाद घडतो तिथं मतं प्रभावित होतातच. म्हणूनच ही माध्यमं सोडून द्यावीतसं वाटत नाही.' 

कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रश्न तयार केले आणि तिनेच बनवलेल्या त्यांच्या स्वत:च्याच प्रतिमेने त्यांना ते विचारले, हा अनुभव कसा वाटला, या प्रश्नावर थरूर म्हणाले, 'आपल्याला हवी ती उत्तरं शोधून देणारं इंटरनेट स्वतःच प्रश्न तयार करतं ही मोठी गमतीची गोष्ट वाटली. परंतु माझी प्रतिमा माझ्याच आवाजात ते प्रश्न विचारते यामुळे मात्र काहीशी धास्तीही वाटली. कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या दिसण्याची, आवाजाची तंतोतंत नक्कल करता येणं हे भयावह आहे. उद्या काहीही भयानक गोष्टी एखाद्याच्या तोंडी घातल्या जाऊ शकतील आणि त्याला गोत्यात आणलं जाऊ शकेल, काळजी तर वाटणारच'

ही सारी गंमत मानायची की आपण कुठल्यातरी धोकादायक गुहेचे दार उघडून आत जात आहोत, असा प्रश्न थरूर यांना पडला तसाच तो आपल्यालाही पडेल यात शंका नाही. आपल्याच बुद्धीने निर्माण केलेली ही करामत आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे, कुणास ठाऊक?

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर