शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांवर निशाणा साधणारं नानांचं बंड अन् पुढे काय?

By यदू जोशी | Updated: September 2, 2017 17:02 IST

भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे.

ठळक मुद्देपटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहेपक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही, आज ते पटोले यांना कळत नाहीय.

मुंबई - भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. थेट मोदी-फडणवीस यांना अंगावर घेऊन पटोले यांनी मोठी हिंमत दाखविली पण स्वत:च्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्हही लाऊन घेतले.पटोले काँग्रेसमधून भाजपात आले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला हरवून लोकसभेत पोहोचल्याने चर्चेत आले. पटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहे. शिवाय मोदी लाट हा महत्त्वाचा फॅक्टर होता. त्यामुळे पटोेले केवळ स्वत:च्या भरवश्यवार जिंकले असे कुणीही म्हणणणार नाही. तसे असेल तर २०१९ मध्ये तेही दिसेलच.आधी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याविषयी आणि आता मोदी, फडणवीसांविषयी पटोलेंची वक्तव्ये बघता ते भाजपात फार दिवस राहतील, असे वाटत नाही. एकेकाळी बनवारीलाल पुरोहित यांनी त्यावेळचे भाजपातील सर्वेसर्वा प्रमोद महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आणि पुढे त्यांना भाजपातून जावे लागले. वर्तूळ पूर्ण करुन बनवारीलालजी भाजपात परतले. आता ते गुवाहाटीच्या राजभवनात आहेत.काँग्रेसमध्ये पक्षातील एखाद्या नेत्यावर टीका करणे कधीकधी फायद्याचे असते. राज्यातील एका नेत्याने दुसऱ्याला लक्ष्य केलेले कधीकधी दिल्लीला देखील आवडत असते. भाजपात तसे नाही. पक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही. पुरोहित यांना तेव्हा हे कळले नव्हते आज ते पटोले यांना कळत नाहीय.पटोेले वेगळ्या धाटणीचे राजकारणी आहेत. बहुजन राजकारण करीत आले आहेत. खैरलांजीच्या प्रकरणात त्यांची भूमिका त्यावेळी ते जिथे होते त्या काँग्रेस पक्षाला परवडणारी नव्हती. पुढे स्थानिक राजकारणाचा विचार करून अन् प्रफुल्ल पटेलांना अंगावर घेण्याच्या दृष्टीने ते भाजपात गेले. भाजपातील त्यांचा मुक्काम आता फार दिवस राहील, असे वाटत नाही. ते पुढे बहुजन आंदोलनाची मोट बांधतील, असा अंदाज आहे.ते स्वत: तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी, शेकापचे आ.जयंत पाटील, अपक्ष आ.बच्चू कडू, जदयूचे आ. कपिल पाटील अशा नेत्यांनी एकत्र येऊन पक्षविरहित बहुजन मंच स्थापन करावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने आणि छगन भुजबळ तुरुंगात असल्याने राज्यात बहुजन दबाव गट आज दिसत नाही. ती उणीव भरून काढण्याचा पटोले यांच्या प्रयत्न असेल.सामाजिक आंदोलन एक वेगळा विषय आहे. राजकारणात टिकायचे तर पटोलेंना निवडणूक लढावीच लागेल. २०१९ मध्ये त्यांची खरी परीक्षा असेल. आज काँग्रेस हे बुडते जहाज आहे. कदाचित २०१९ मध्ये या पक्षाला बरे दिवस येताना दिसले तर नानाभाऊ आधीच्या घरट्यात परततील. तसेही राजकारणात स्थायी काही नसते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस