शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांवर निशाणा साधणारं नानांचं बंड अन् पुढे काय?

By यदू जोशी | Updated: September 2, 2017 17:02 IST

भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे.

ठळक मुद्देपटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहेपक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही, आज ते पटोले यांना कळत नाहीय.

मुंबई - भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. थेट मोदी-फडणवीस यांना अंगावर घेऊन पटोले यांनी मोठी हिंमत दाखविली पण स्वत:च्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्हही लाऊन घेतले.पटोले काँग्रेसमधून भाजपात आले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला हरवून लोकसभेत पोहोचल्याने चर्चेत आले. पटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहे. शिवाय मोदी लाट हा महत्त्वाचा फॅक्टर होता. त्यामुळे पटोेले केवळ स्वत:च्या भरवश्यवार जिंकले असे कुणीही म्हणणणार नाही. तसे असेल तर २०१९ मध्ये तेही दिसेलच.आधी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याविषयी आणि आता मोदी, फडणवीसांविषयी पटोलेंची वक्तव्ये बघता ते भाजपात फार दिवस राहतील, असे वाटत नाही. एकेकाळी बनवारीलाल पुरोहित यांनी त्यावेळचे भाजपातील सर्वेसर्वा प्रमोद महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आणि पुढे त्यांना भाजपातून जावे लागले. वर्तूळ पूर्ण करुन बनवारीलालजी भाजपात परतले. आता ते गुवाहाटीच्या राजभवनात आहेत.काँग्रेसमध्ये पक्षातील एखाद्या नेत्यावर टीका करणे कधीकधी फायद्याचे असते. राज्यातील एका नेत्याने दुसऱ्याला लक्ष्य केलेले कधीकधी दिल्लीला देखील आवडत असते. भाजपात तसे नाही. पक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही. पुरोहित यांना तेव्हा हे कळले नव्हते आज ते पटोले यांना कळत नाहीय.पटोेले वेगळ्या धाटणीचे राजकारणी आहेत. बहुजन राजकारण करीत आले आहेत. खैरलांजीच्या प्रकरणात त्यांची भूमिका त्यावेळी ते जिथे होते त्या काँग्रेस पक्षाला परवडणारी नव्हती. पुढे स्थानिक राजकारणाचा विचार करून अन् प्रफुल्ल पटेलांना अंगावर घेण्याच्या दृष्टीने ते भाजपात गेले. भाजपातील त्यांचा मुक्काम आता फार दिवस राहील, असे वाटत नाही. ते पुढे बहुजन आंदोलनाची मोट बांधतील, असा अंदाज आहे.ते स्वत: तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी, शेकापचे आ.जयंत पाटील, अपक्ष आ.बच्चू कडू, जदयूचे आ. कपिल पाटील अशा नेत्यांनी एकत्र येऊन पक्षविरहित बहुजन मंच स्थापन करावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने आणि छगन भुजबळ तुरुंगात असल्याने राज्यात बहुजन दबाव गट आज दिसत नाही. ती उणीव भरून काढण्याचा पटोले यांच्या प्रयत्न असेल.सामाजिक आंदोलन एक वेगळा विषय आहे. राजकारणात टिकायचे तर पटोलेंना निवडणूक लढावीच लागेल. २०१९ मध्ये त्यांची खरी परीक्षा असेल. आज काँग्रेस हे बुडते जहाज आहे. कदाचित २०१९ मध्ये या पक्षाला बरे दिवस येताना दिसले तर नानाभाऊ आधीच्या घरट्यात परततील. तसेही राजकारणात स्थायी काही नसते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस