शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

साईबाबांच्या कुळाचा शोध कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:31 AM

साईशताब्दीचा प्रारंभ ध्वजस्तंभावर ‘ओम’ आणि ‘त्रिशूल’ बसवून झाला. साईबाबा एका जाती-धर्माचे नव्हते, तर विश्वस्तांनी हे ‘त्रिशूल’ का बाहेर काढले. साईबाबांचे जन्मगाव विकसित करण्याचे भाष्य राष्ट्रपतींनी केले. यातून नकळतपणे सार्इंचे कूळ शोधण्याचा तर प्रयत्न नाही ना?

साईशताब्दीचा प्रारंभ ध्वजस्तंभावर ‘ओम’ आणि ‘त्रिशूल’ बसवून झाला. साईबाबा एका जाती-धर्माचे नव्हते, तर विश्वस्तांनी हे ‘त्रिशूल’ का बाहेर काढले. साईबाबांचे जन्मगाव विकसित करण्याचे भाष्य राष्ट्रपतींनी केले. यातून नकळतपणे सार्इंचे कूळ शोधण्याचा तर प्रयत्न नाही ना?ऋषीचे मूळ आणि कूळ शोधू नये म्हणतात. मात्र, महामहीम राष्ट्रपतींनी साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ करताना केलेल्या विधानामुळे सार्इंचे कूळ शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रपतींच्या विधानामुळे नकळत एका वादालाही प्रारंभ होऊ शकतो. साईबाबांचे जन्मगाव असलेल्या परभणी तालुक्यातील पाथरीचा राज्य सरकारने विकास करायला हवा, असे विधान राष्ट्रपतींनी केले. राष्ट्रपतींनी कदाचित हे विधान कुठलाही हेतू न ठेवता केले असेल, पण त्यांच्या या विधानातून वेगवेगळे सामाजिक व राजकीय संदर्भ निघण्यास सुरुवात झाली आहे.खुद्द साईबाबा आपले गाव, आईवडील, जात-धर्म याबाबत काहीच बोलत नव्हते. शिर्डी संस्थानने प्रकाशित केलेल्या साईसतचरित्रात त्यांच्या कुळाचा आणि जातधर्माचा काहीच उल्लेख नाही. साईबाबा हिंदूंना हिंदू वाटायचे व मुस्लिमांना मुस्लीम. ‘जन्म बाबांचा कोण्यादेशी, अथवा कोण्या पवित्र वंशी, कोणा माता पितरांच्या कुशी, हे कोणाशी ना ठावे’ हे साईचरित्र सांगते. साईचरित्राला प्रमाण मानून शिर्डी संस्थानने आजवर सार्इंचे गाव व कूळ शोधण्याचा प्रयत्न केला नाही. भाविकांनाही ती गरज भासली नाही. त्यामुळेच शिर्डी हे धर्मनिरपेक्षतेचे सर्वात मोठे प्रतीक बनले. गावानेही हे प्रतीक जपले. पण, याच तत्त्वाला नख लावण्याचा प्रयत्न विद्यमान विश्वस्त मंडळाने सुरू केला की काय? ही शंकेची पाल चुकचुकली आहे. साईबाबांच्या समाधीला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सुरू झालेल्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ राष्टÑपतींनी ध्वजारोहणाने केला. कुंभमेळ्यात असेच ध्वजारोहण होते. कुंभमेळ्यातील धर्मध्वजावर ओम, त्रिशूल असते. साईसंस्थाननेही आपल्या ध्वजावर ‘ओम’, ‘त्रिशूल’ बसविले आहे. यातून संस्थानला नेमका काय संदेश द्यायचा आहे? संस्थान सध्या भाजपच्या अधिपत्याखाली आहे. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे संघनिष्ठ मानले जातात. इतर विश्वस्तही संघाच्या शाखेत गेलेले आहेत. त्यामुळे ही ध्वजवंदना साईबाबांना हिंदू ठरविण्यासाठी तर नाही ना? संघाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजपने शाळांतील पुस्तकांचे देखील भगवेकरण केल्याचा आरोप होतो. येथे तर मंदिरच आहे. मंदिराला भगवा रंग देणे सर्वात सोपे. हा भगवा रंग संस्थानने तेथील फलकांवर आणलाही आहे. त्याची पुढील पायरी पाथरी असावी. राष्ट्रपतींना पाथरीबद्दलची माहिती कुणीतरी जाणीवपूर्वक दिली असावी, असा आरोप झाला आहे. पाथरीत जाणे चूक नाही, पण पाथरीत गेले म्हणजे आपोआप साईबाबांचा वंश व त्यांचा जातीचा दाखलाही अलगद हाती येईल. एकीकडे शंकराचार्यांनी साईबाबा देव नाहीत, ही आरोळी ठोकायची अन् दुसरीकडे संघ स्वयंसेवकांनी त्यांचा वंश शोधायला सुरुवात करायची. याचा अन्वयार्थ काय काढायचा? साईबाबा धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहेत, ही ओळख कुणाला तरी खटकते आहे का? ही ओळख पुसण्यासाठी तर हा सगळा खटाटोप नसावा?