शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचाराचा धर्म कोणता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 00:53 IST

मुंबईच्या वैभव राऊत या ‘हिंदूू अतिरेक्या’सह त्याच्या तीन साथीदारांना त्यांच्याजवळील बॉम्ब्ससकट ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या अतिरेकविरोधी पथकाने एका जुन्या व खुनी परंपरेचे आताचे पाईक उघड केले आहेत.

मुंबईच्या वैभव राऊत या ‘हिंदूू अतिरेक्या’सह त्याच्या तीन साथीदारांना त्यांच्याजवळील बॉम्ब्ससकट ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या अतिरेकविरोधी पथकाने एका जुन्या व खुनी परंपरेचे आताचे पाईक उघड केले आहेत. ऐन सणांच्या काळात स्फोट घडवून अनेकांचे (अर्थातच अल्पसंख्याकांचे) मृत्यू घडवून आणण्याचा त्या गुन्हेगारांचा इरादा त्यामुळे निकामी झाला आहे. हिंदुत्ववाद्यांच्या अतिरेकाचे नाव काही काळापूर्वी संसदेत घेतले गेले तेव्हा भाजपाच्या सभासदांनी त्याविरुद्ध गदारोळ केला होता. हेमंत करकरे यांनी मालेगावपासून समझोता एक्स्प्रेसपर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत एका तथाकथित साध्वीसह काही शस्त्राचाऱ्यांना पकडले तेव्हाही भाजपाने करकरे यांच्या घराभोवती निषेधाचे फलक लावले होते. अतिरेकाचा संबंध धर्माशी नसतो, तो वृत्तीशी असतो हे वास्तव या गदारोळवाल्यांना कधी समजले नाही वा समजूनही त्यांनी त्याकडे डोळेझाकच केली. ज्यू, मुसलमान, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, पारशी यासह सर्वच धर्मातल्या कडव्या वृत्ती गुन्हेगारीकडे प्रवृत्त होतात. त्यांचे नमुने केवळ आजच्या जगानेच नाही तर इतिहासानेही पाहिले आहेत. बुद्धाच्या तपश्चर्येत अडथळे आणणारे, शंकराचार्यांच्या आईच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार घालणारे, ज्ञानेश्वरांना जातीची प्रमाणपत्रे मागणारे, तुकोबाची गाथा इंद्रायणीत बुडविणारे, ज्योतिबांचा छळ करणारे, सावित्रीबार्इंवर शेण फेकणारे, आगरकरांच्या प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणीच काढणारे, गांधीजींवर गोळ्या झाडणारे आणि दाभोलकर- पानसरे- कलबुर्गी व गौरी लंकेशचा खून करणारे लोक डोळ्यासमोर आणले की हिंदुत्वातली कडवी व अतिरेकी परंपराही दिसू लागते. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने या लोकांची तुलना अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हत्या करणाºया कू क्लक्स क्लॅनच्या हिंसाचाºयांशी नुकतीच केली आहे. खुनी प्रवृत्तीचे लोक जगात सर्वत्र व सर्व धर्मात आहेत. त्यांचा देश, धर्म व माणुसकी यातील कशाशीही संबंध नाही. अपराध्यांना जात नसते, धर्म नसतो व देशही नसतो. त्यांचा विचार कायद्याच्या कक्षेत गुन्हेगार म्हणूनच करायचा असतो. वैभव राऊत व त्याचे साथीदार एकटेही नाहीत. त्यांचा अपराधही त्याचा एकट्याचा नाही. त्यामागे खुनाची चटक असलेल्या अतिरेकी संघटना आहेत. त्या शक्तिशाली तर आहेतच, शिवाय त्यांना हात लावायला सरकारही भिताना दिसले आहे. वैभव राऊत व त्याच्या सहकाºयांचा हिंदुत्ववाद्यांशी व सनातन या भयकारी संस्थेशी संबंध असल्याचेही राज्याच्या तपास यंत्रणांनी सांगितले आहे. त्यामुळे हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासात त्रुटी ठेवून त्यांनी पकडलेले आरोपी सोडण्यात पुढाकार घेतलेल्या पोलिसातील ‘छुप्या अतिरेक्यांची’ तोंडेही आता काळवंडली असतील. कोणताही गुन्हेगार हा देशाचा व समाजाचा अपराधी असतो. त्याचा विचार ‘आपला’ वा ‘परका’ म्हणून करता येत नाही. सारे जग सध्या या अतिरेक्यांच्या कारवायांनी हादरलेले व अनेक जागी रक्तबंबाळ झालेले दिसत असताना तरी अशा टोळक्यांना पकडून त्यांना अद्दल घडविणे ही केवळ राष्टÑीयच नाही तर जागतिक व नैतिक जबाबदारी बनली आहे. वैभव राऊतचे नाव गौरी लंकेशच्या खुनाशीही जुळले आहे. त्याचमुळे या प्रकरणाचा छडा पूर्ण तयारीनिशी व त्यात कोणतीही पळवाट राहणार नाही याची काळजी घेऊन झाला पाहिजे. या खुनी परंपरेने महाराष्टÑाला यापूर्वी अनेकवार बदनाम केले आहे. बदनामीचा हा कलंक धुवून टाकण्याची जबाबदारी व संधीही या वैभव नावाच्या अपराध्याने राज्य सरकार व त्याच्या तपास यंत्रणांना दिली आहे. ती त्यांनी त्यांच्या कायदेशीर टोकापर्यंत नेऊन ‘या देशात कायद्यासमोर सारे समान आहेत’ या सूत्राविषयीचा विश्वास समाजात नव्याने जागविला पाहिजे. अन्यथा या देशात फक्त अल्पसंख्याकांनाच गुन्हेगार धरले जाते व बहुसंख्याकांना अशा अपराधात मोकळे सोडले जाते हा आताचा समज कायम होईल.

टॅग्स :newsबातम्याTerrorismदहशतवाद