शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती तऱ्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:55 IST

 वर्तमानात स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती त-हा? संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती हीच आहे का? ही परंपरा लोकशाहीचेच नव्हे, तर भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे.

दिवंगतांवर टीका करणे हे आपल्या परंपरेत सभ्यतेचे लक्षण मानले जात नाही. अगदीच सडकछाप भांडण असेल तर ते क्वचित कधी आई-बहिणींपर्यंत (बापापर्यंत सहसा नाही) जाते. पण त्यापलीकडे आजा-आजी, त्याअगोदरच्या पितरांपर्यंत ही टीका वा शिवीगाळ जात नाही. मात्र आपल्या सध्याच्या राजकीय व्यवहाराने ही परंपरा मोडून थेट इतिहासात गडप झालेल्या पितरांपर्यंत पोहोचण्याचे व त्यांना शिवीगाळ करण्याचे मनावर घेतले आहे. राहुल गांधींवरची मोदींची टीका समजण्याजोगी आहे. सोनिया गांधींवरही त्या राजकारणात असल्याने ते टीका करू शकतात. पण राजीव गांधी, त्याआधी इंदिरा गांधी व त्याही आधी पं. जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहचून त्यांना नावे ठेवण्याचे त्यांचे व त्यांचे सारथी अमित शहा यांचे वर्तन परंपरेएवढेच सभ्यतेतही न बसणारे आहे.

वर्तमानात अनेक प्रश्न आहेत आणि त्यातले अनेक मोदींच्या सरकारने उभे केले आहेत. बेरोजगारीत वाढ, नोटबंदी, जीएसटी, भाववाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक ताण व राजकीय खून हे प्रश्न आताचे आहेत. त्यातल्या काहींना इतिहासही आहे. परंतु कोणत्याही लोकशाही देशात सत्तेवरचे सरकार आपल्या चुकांसाठी व प्रश्नांसाठी पूर्वीच्या सरकारांना दोषी धरत नाही. ती फक्त आपली व त्यातही संघाच्या सरकारांनी नव्याने सुरू केलेली तºहा आहे. पं. नेहरूंना जाऊन आता पंचावन्न वर्षे झाली. इंदिरा गांधींची हत्या पस्तीस वर्षांपूर्वी झाली. राजीव गांधींच्या स्फोटक खुनालाही पंचवीस वर्षांचा काळ लोटला. राहुल आणि प्रियंका ही त्यांची आताची पिढी त्यांचा पक्ष व विचारधारेला पुढे नेत आहेत. त्यांच्यावर कोणताही आरोप नाही किंवा त्यांच्यावर कोणती टीका करता येत नाही. त्यामुळे ‘तुम्ही नाहीतर तुमचे आईवडील, आजोबा-पणजोबा’ असा विचार करून मोदी व शहा यांची सध्याची सडकछाप शिवीगाळ सुरू आहे. त्यांचा या शिवीगाळीतला उत्साह एवढा दांडगा की ते प्रसंगी त्याही मागे ते थेट म. गांधींपर्यंत जातात.
ज्यांच्या पावलांच्या धुळीची बरोबरी आपण करू शकत नाही त्या महात्म्यांना आणि महापुरुषांना नावे ठेवण्याची त्यांची तयारी पाहिली, की संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती ही आहे की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. अशी शिवीगाळ फारसे काही न शिकलेल्या स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गिरीराज किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली, तर ते त्यांच्या पोरकटपणापायी एकदा समजून तरी घेता येईल. पण पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष नेहरू व महात्मा गांधींना आजच्या राजकारणात ओढू लागले, तर ते कसे समजायचे? संघाने स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही. त्यापासून दूर राहून त्याला नावे ठेवण्याचेच काम त्याने केले.त्यांच्या या टीकेनंतरही काँग्रेसच्या नेतृत्वात देश स्वतंत्र झाला. त्यासाठी प्रथम गांधींना मारले गेले. आता ते मारणारे म्हणतात, ‘गांधींऐवजी नेहरूंना मारले असते तर अधिक बरे झाले असते.’ त्या माणसांशी मोदी व शहा यांचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी त्यांच्यात एक वैचारिक अनुबंध आहेच. ही असभ्यता व हा ओंगळपणा थांबविण्यासाठी आपली जरब वापरण्याऐवजी मोदी त्यांच्या सुरात सूर मिसळून स्वत:च नेहरू व गांधींपर्यंत शिवीगाळ करायला पोहचत असतील; तर त्यांना हीच परंपरा जिवंत ठेवायची आहे, असा अर्थ काढता येतो. टीका अंगलट येत असूनही अशा दिवंगत व्यक्तींच्या चारित्र्याबाबत चर्चा घडविणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे; एवढेच नव्हेतर, पुरावे नसतानाही त्यांच्या नावे यंत्रणेच्या दुरुपयोगाचा आरोप करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.सामान्य माणसे, जनता, देश व एकूणच जागतिक लोकमत यांना हे न पचणारे आहे. मात्र तीच परंपरा डोक्यात घट्ट बसवून घेतलेल्यांना तसल्या घाण शिवीगाळीवरही टाळ्या वाजवता येतात आणि ती शिवीगाळ हाच आपल्या परंपरेचा पराक्रम वाटू लागतो. दु:ख, अशी परंपरा जगवण्याचे नाही. ही परंपरा लोकशाहीचेच नव्हेतर, भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे, हे आहे. यातून ही निर्ढावलेली माणसे काही शिकतील अशी अपेक्षा बाळगण्यात फारसा अर्थ नाही. मात्र ही लोकशाही कधीतरी निकोप व स्वच्छ व्हावी, यासाठी ही सफाई लवकर व्हावी एवढेच येथे म्हणायचे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक