शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

आरबीआयचा इशारा डावलून केलेल्या नोटाबंदीनं काय साधलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:25 AM

नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही.

नोटाबंदीचा गोंधळ अडीच वर्षे झाली, तरी संपताना दिसत नाही. व्यंकटेश नायक यांनी माहिती अधिकाराच्या कायद्यात मिळविलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाचा ५०० व १००० च्या नोटा बंद करण्यास विरोध होता. त्याचे दूरगामी परिणाम होऊन अर्थव्यवस्था मंदावेल, असा इशारा मंडळाने ८ नोव्हेंबर २०१६ ला सरकारला दिल्याचे उघड झाले आहे. यानंतर केवळ दोन तासांत नोटाबंदीची घोषणा झाली. सरकार असे का वागले, याचे एकमेव उत्तर हे सरकारकडे कुठलेही आर्थिक धोरण नसण्यात आहे. नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही.बाजारातील ८६ टक्के चलन बाद झाल्याने लघुउद्योगांचे कंबरडे मोडले, कोट्यवधी कामगार आणि रोजंदारी मजूर एका फटक्यात बेरोजगार झाले. हाती रोकड नाही, म्हणून बँकांत असलेल्या सामान्यांच्या ठेवी अडकून पडल्या. आपलाच पैसा लग्न, आजारपणासाठीही काढता येत नसल्याच्या अगतिकतेमुळे १६८ जणांचे बळी नोटाबंदीच्या काळात गेले. सरकारकडे निश्चित आर्थिक धोरण नाही. कधी सरकार स्वदेशीचा आग्रह धरते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना हद्दपार करण्याची भाषा करते, तर लगेच मेक इन इंडियाची घोषणा करून बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी लाल गालीचा अंथरण्याची कृती करते. सरकारच्या अशाच विरोधाभासी धोरणांमुळे गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे.जीडीपीचा दर दरवर्षी सात टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत असेल तर बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षांतील नीचांकी म्हणजे ६.१० टक्क्यांवर का गेले याचे उत्तर सरकारजवळ नाही. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर बाजारात म्हणजे जनतेच्या हातात जास्त रोकड आहे ती कमी करण्यासाठी कॅशलेस ईकॉनॉमीचे (रोकडविरहित अर्थव्यवस्था) पिल्लूही सोडण्यात आले. युरोप अमेरिकेत जीडीपीच्या ६ ते ७ टक्के रोख बाजारात असते. भारतात ती १२ टक्के आहे; म्हणून रोकड कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय समोर आला. जपानमध्ये आजही जीडीपीच्या १७ टक्के रोख चलनात आहे, हे सोईस्करपणे लपविले गेले. त्यातूनच एटीएममध्ये रोकड भरू नका, म्हणजे नागरिक सक्तीने डिजिटल पेमेंटकडे वळतील, असाही प्रचार झाला. देशभरातील १० लाख कार्ड स्वॅपिंग मशिन्स व २.३० लाख एटीएमद्वारे सरकार हे साध्य करू शकले नाही. याचे मुख्य कारण या दोन्ही पद्धतीची यंत्रे फक्त जिल्हास्तराच्या शहरांतच उपलब्ध आहेत. शिवाय जुन्या आणि नव्या नोटांच्या आकारातील बदलामुळे काही काळ एटीएम असूनही बँकांत जाऊन रोख चलन स्वीकारण्याची वेळ आली.आजही खेड्यांमध्ये ना रोकड आहे ना रोजगार आहे, अशी परिस्थिती आहे. नोटाबंदी पूर्णत: फसल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे ५०० व १००० च्या १५.४१ लाख कोटींच्या नोटांपैकी १५.३१ लाख कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत, हे आहे. जर फक्त १०,००० कोटींच्या नोटा परत आल्या नसतील, तर देशात काळा पैसा ५०० व १००० च्या नोटांमध्ये दडवलेला नव्हता हे सरकारला मान्य करावे लागेल; पण सरकार ते मान्य करीत नाही. यातही विविध जिल्हा बँकांकडे असलेल्या आणि बुडीत खात्यात टाकावे म्हणून आग्रह धरल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या रकमेचा समावेश नाही. देशाच्या चलनातील १७.९७ लाख कोटींपैकी १५.४१ लाख कोटी रद्द करण्याचा तुघलकी निर्णय सरकारने लादला. परंतु कुठलाही शहाणा माणूस काळा पैसा रोकड स्वरूपात ठेवत नसतो, तर तो सोने व स्थावर मालमत्ता यातच मुख्यत्वे दडवलेला असतो हे सरकारला कळले नाही, याचे आश्चर्य वाटते. आजही तो पैसा तिथे सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँकेच्या गेल्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, सध्या २१.२७ लाख कोटींच्या नोटा चलनात आहेत. नोटाबंदीपूर्वीपेक्षा हा आकडा ३.३० लाख कोटींनी जास्त आहे, या रोकड सुलभतेवरून नोटाबंदी पूर्णत: फसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे वेगवेगळे इशारे डावलूनही राबवलेल्या या नोटाबंदीने साधले काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक