शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

आरबीआयचा इशारा डावलून केलेल्या नोटाबंदीनं काय साधलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:26 IST

नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही.

नोटाबंदीचा गोंधळ अडीच वर्षे झाली, तरी संपताना दिसत नाही. व्यंकटेश नायक यांनी माहिती अधिकाराच्या कायद्यात मिळविलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाचा ५०० व १००० च्या नोटा बंद करण्यास विरोध होता. त्याचे दूरगामी परिणाम होऊन अर्थव्यवस्था मंदावेल, असा इशारा मंडळाने ८ नोव्हेंबर २०१६ ला सरकारला दिल्याचे उघड झाले आहे. यानंतर केवळ दोन तासांत नोटाबंदीची घोषणा झाली. सरकार असे का वागले, याचे एकमेव उत्तर हे सरकारकडे कुठलेही आर्थिक धोरण नसण्यात आहे. नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही.बाजारातील ८६ टक्के चलन बाद झाल्याने लघुउद्योगांचे कंबरडे मोडले, कोट्यवधी कामगार आणि रोजंदारी मजूर एका फटक्यात बेरोजगार झाले. हाती रोकड नाही, म्हणून बँकांत असलेल्या सामान्यांच्या ठेवी अडकून पडल्या. आपलाच पैसा लग्न, आजारपणासाठीही काढता येत नसल्याच्या अगतिकतेमुळे १६८ जणांचे बळी नोटाबंदीच्या काळात गेले. सरकारकडे निश्चित आर्थिक धोरण नाही. कधी सरकार स्वदेशीचा आग्रह धरते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना हद्दपार करण्याची भाषा करते, तर लगेच मेक इन इंडियाची घोषणा करून बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी लाल गालीचा अंथरण्याची कृती करते. सरकारच्या अशाच विरोधाभासी धोरणांमुळे गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे.जीडीपीचा दर दरवर्षी सात टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत असेल तर बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षांतील नीचांकी म्हणजे ६.१० टक्क्यांवर का गेले याचे उत्तर सरकारजवळ नाही. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर बाजारात म्हणजे जनतेच्या हातात जास्त रोकड आहे ती कमी करण्यासाठी कॅशलेस ईकॉनॉमीचे (रोकडविरहित अर्थव्यवस्था) पिल्लूही सोडण्यात आले. युरोप अमेरिकेत जीडीपीच्या ६ ते ७ टक्के रोख बाजारात असते. भारतात ती १२ टक्के आहे; म्हणून रोकड कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय समोर आला. जपानमध्ये आजही जीडीपीच्या १७ टक्के रोख चलनात आहे, हे सोईस्करपणे लपविले गेले. त्यातूनच एटीएममध्ये रोकड भरू नका, म्हणजे नागरिक सक्तीने डिजिटल पेमेंटकडे वळतील, असाही प्रचार झाला. देशभरातील १० लाख कार्ड स्वॅपिंग मशिन्स व २.३० लाख एटीएमद्वारे सरकार हे साध्य करू शकले नाही. याचे मुख्य कारण या दोन्ही पद्धतीची यंत्रे फक्त जिल्हास्तराच्या शहरांतच उपलब्ध आहेत. शिवाय जुन्या आणि नव्या नोटांच्या आकारातील बदलामुळे काही काळ एटीएम असूनही बँकांत जाऊन रोख चलन स्वीकारण्याची वेळ आली.आजही खेड्यांमध्ये ना रोकड आहे ना रोजगार आहे, अशी परिस्थिती आहे. नोटाबंदी पूर्णत: फसल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे ५०० व १००० च्या १५.४१ लाख कोटींच्या नोटांपैकी १५.३१ लाख कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत, हे आहे. जर फक्त १०,००० कोटींच्या नोटा परत आल्या नसतील, तर देशात काळा पैसा ५०० व १००० च्या नोटांमध्ये दडवलेला नव्हता हे सरकारला मान्य करावे लागेल; पण सरकार ते मान्य करीत नाही. यातही विविध जिल्हा बँकांकडे असलेल्या आणि बुडीत खात्यात टाकावे म्हणून आग्रह धरल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या रकमेचा समावेश नाही. देशाच्या चलनातील १७.९७ लाख कोटींपैकी १५.४१ लाख कोटी रद्द करण्याचा तुघलकी निर्णय सरकारने लादला. परंतु कुठलाही शहाणा माणूस काळा पैसा रोकड स्वरूपात ठेवत नसतो, तर तो सोने व स्थावर मालमत्ता यातच मुख्यत्वे दडवलेला असतो हे सरकारला कळले नाही, याचे आश्चर्य वाटते. आजही तो पैसा तिथे सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँकेच्या गेल्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, सध्या २१.२७ लाख कोटींच्या नोटा चलनात आहेत. नोटाबंदीपूर्वीपेक्षा हा आकडा ३.३० लाख कोटींनी जास्त आहे, या रोकड सुलभतेवरून नोटाबंदी पूर्णत: फसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे वेगवेगळे इशारे डावलूनही राबवलेल्या या नोटाबंदीने साधले काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक