शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आणि शेअर बाजाराचे नाते काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 11:29 IST

१९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुढील तीन महिन्यात सात टक्क्यांनी उंचावला होता.

विनायक कुळकर्णीगुंतवणूक समुपदेशक

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्या शुक्रवारी पार पडला. एकीकडे जगातल्या मोठ्या लोकशाही देशात होत असलेली ही निवडणूक कायम लक्ष वेधून घेत असते. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी लक्षात घेता विद्यमान सरकारची आर्थिक धोरणे आणि देशांतर्गत सामाजिक तसेच राजकीय वाटचाल बघत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणुकीस प्राधान्य देत आले आहेत. भारतातील शेअर बाजार राजकीय भावना आणि आर्थिक सुस्थिरता या दोन घटकांना मध्यवर्ती ठेवून हिंदोळे देत असतो असे म्हटले तर गैर ठरणार नाही. एकाच राजकीय पक्षाचे सरकार असेल तर असणारी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरणे अधिक सुसंगत आणि परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल निर्देशांकात दिसून येत असते.

१९८९ पासून युती आणि आघाड्यांचे सरकार आल्याने आर्थिक सुधारणा करण्यास विविध पक्षांचा अडसर ठरला होता. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर आलेले पी.व्ही. नरसिंहरावांचे सरकार शेअर बाजारात उत्साह आणणारे असले तरीही त्यानंतर १९९६ आणि १९९८ या काळात भारतातील राजकीय अस्थिरता आणि आशिया खंडातील देशांत निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे शेअर बाजारात मंदी आली होती. १९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुढील तीन महिन्यात सात टक्क्यांनी उंचावला होता.

त्याच दरम्यान देशाचा सकल उत्पन्न वृद्धी दर ६ -७ टक्क्यांदरम्यान पोहोचला होता. बहुसंख्य क्षेत्रात सुधारणा राबवत, परदेशी गुंतवणुकीस वाव देत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अमेरिकेतील ९/११ हल्ला आणि देशातील अन्य घटकांमुळे शेअर बाजार निर्देशांक पन्नास टक्क्यांनी घसरला होता. २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले. त्याची परिणीती पहिल्याच दोन-तीन सत्रात निर्देशांकात पंधरा टक्के घसरण झाली. त्यानंतर २००७ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात झालेली आठ टक्क्यांची वृद्धी आणि विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा विक्रमी ३४ बिलियन डॉलर्सचा ओघ शेअर बाजारात तेजी आणून गेला.

एका दिवसात १७ टक्के झेप २००८ मध्ये जागतिक मंदीचा परिणाम होऊन शेअर बाजार मंदीत गेला असला तरीही २००९ च्या लोकसभा निवडणूक पूर्व काळात पुन्हा रुळावर आला होता. निवडणूक निकालानंतर पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार मनमोहनसिंग यांच्याच नेतृत्वाखाली आले अन् एका दिवसात निर्देशांकाने १७ टक्के झेप घेतली. त्यानंतरच्या तीन वर्षांत १५.५ टक्के वाढ दर्शवली होती.

कोविडचा धक्का पचवून विक्रमी उंची २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार अधिक स्थिरता दर्शवत निवडून आले. मेक इन इंडियाच्या नाऱ्याने आणि धोरणात्मक कर संरचनेतील बदलाने सकारात्मक असलेला शेअर निर्देशांक कोविडचा धक्का पचवून विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. 

२०२४ नंतर काय?भारतीय उद्योगांत होत असणारी परदेशी गुंतवणूक आणि शेअर बाजारात केली जाणारी गुंतवणूक यांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता विद्यमान सरकारची आर्थिक धोरणे योग्य दिशेने पडलेली आहेत, असा अंदाज घेता येतो. २०२४ च्या जून महिन्यात निकालानंतर कोणाचे सरकार येईल, त्यावरून निर्देशांकाची उसळी कुठपर्यंत जाईल याचा अंदाज गुंतवणूकदार बांधत आहेत.

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४