शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते?

By shrimant mane | Updated: June 24, 2023 08:47 IST

जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो?

- श्रीमंत माने(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)

मृत्यू म्हणजे काय, तो होतो म्हणजे नेमके काय होते, आपले धर्मग्रंथ व मिथके सांगतात तसे आत्मा शरीर बदलत राहतो का, प्रवचनकार सांगतात किंवा सिनेमात दाखवतात तसे खरेच दिव्याच्या स्वरूपात कुडीतून निघून जाणारा प्राण स्वत:चा चेहरा, निचेष्ट पडलेले शरीर पाहत आकाशाकडे जातो का? 

- माणसाला जन्मापेक्षा मरणाचे कुतूहल जास्त आहे हे खरेच. कारण, मृत्यूनंतर जिवाचे काय होते किंवा स्वर्ग, नरक खरेच अस्तित्वात आहेत का हे सांगायला कुणी परत येत नाही. अमूक एक असे असे होते म्हणजे नुसत्या कल्पनाच. त्यामुळेच विज्ञानापुढे हे मृत्यूचे गूढ उकलविण्याचे आव्हान मानले गेले. जे जे अज्ञात, गूढ त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न विज्ञान करते. म्हणून मृत्यूचे गूढ जाणून घेण्यासाठी होणारे प्रयोगही खूप. संशोधकांना मृत्यूचे कुतूहल, तर सामान्यांना अमरत्वाचे आकर्षण. अमर व्हायचे असेल तर मृत्यूची प्रक्रिया समजायला हवी. तरच ती थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील ना!  मेसोपोटेमियातील उरूकचा राजा गिल्गामेशच्या अनेक दंतकथांपैकी जगप्रसिद्ध कथा मृत्यूवर विजय मिळविण्यात आलेल्या अपयशाची आहे. आपण चक्रवर्ती सम्राट असूनही जीवलग मित्राचे प्राण वाचवू शकलो नाही, अमरत्व मिळाले नाही, ही त्याची निराशा. हिंदू संस्कृतीत अमरत्वासाठी केलेल्या तपश्चर्येच्या कितीतरी कथा आहेतच.

सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रेस्यूसिटेशनचा शोध लागेपर्यंत म्हणजे १९५९ पर्यंत असे मानले जायचे की हृदय बंद पडले म्हणजे मृत्यू झाला. सीपीआरमुळे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्याचे तंत्र गवसले. अनेकांचे जीव वाचू लागले. अगदी वीस मिनिटांपर्यंत बंद हृदय सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. हृदय बंद पडणे म्हणजे मृत्यू नसल्याने असा पुनर्जन्म झालेल्यांचे अनुभव मृत्यूचे गूढ जाणून घेताना कामी येऊ लागले. त्या अवधीत काय झाले हे ते सांगू लागले. मेंदूतील काही पेशी मृत्यूनंतरही बराच वेळ कार्यरत राहतात, ते वेगळेच. 

त्याशिवाय अल्झायमर, डिमेन्शिया, स्क्रिझोफ्रेनिया यांसारख्या मेंदूशी संबंधित आजाराच्या रुग्णांचे अनुभव याबाबत लक्ष्यवेधी आहेत. न्यूयॉर्क लँगोन हेल्थचे फिजिशियन सॅम पर्निया, तसेच सेंटर फॉर हॉस्पाइन अँड पॅलियाटिव्ह केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफर केर यांनी केलेल्या स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या अंतिम क्षणांच्या अभ्यासात आढळून आले, की मृत्यूच्या दारात पाेहोचल्यानंतर या रुग्णांची स्मरणशक्ती अचानक उसळी मारते. आप्तस्वकीय व मित्रमंडळींची नावेच नव्हे, तर अगदी लहानपणीच्या गोष्टी, नावे-गावे सारे काही चमत्कार वाटावे असे आठवायला लागते. ते चांगले बोलायला, खायला-प्यायला लागतात. हे मृत्यूच्या काही तासच नव्हे तर काही दिवस, काही महिनेही आधी होते. अवतीभोवती जमलेल्या नातेवाइकांच्या आशा पल्लवित होतात. त्यांना वाटते, की रुग्ण बरा झाला. प्रत्यक्षात तसे नसते. म्हणतात ना दिवा विझताना मोठा होतो. तसे हृदय कमकुवत होताच त्यांच्या मेंदूने दिलेला तो प्रतिसाद असतो. मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाला की तो मिळविण्यासाठी मेंदू अधिक कार्यशील होतो. वैद्यक विज्ञान त्याला होमिओस्टॅटिक मेकॅनिझम म्हणते. हा ‘लास्ट डिच एफर्ट’ असतो. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास वाढतो. रुग्ण मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करीत असताे.

यासोबतच स्मृतिभ्रंशाचा आजार नसलेल्यांच्या अंतिम क्षणी मेंदूतील क्रियांविषयीचे काही अभ्यास अमेरिकेतील प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने केले आहेत. त्यांचे निष्कर्ष गेल्या मे महिन्यात जाहीर करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी याच संस्थेने उंदरांच्या मेंदूची सक्रियता मोजली होती. या दोन्ही अभ्यासांमध्ये सहभागी, मिशिगन विद्यापीठातील श्रीमती जिमो बोर्जिगिन यांच्या मते, या सगळ्यांच्या मुळाशी हृदयाची स्पंदने आहेत. हृदयविकारानंतर काही मिनिटांत मेंदूतील गॅमा लहरींची सक्रियता वाढते. त्यामुळे मेंदू अधिक ताजातवाना, अधिक सचेतन होतो. सारे काही आठवायला लागते. या अकस्मात सक्रियतेचे केंद्र कवटीच्या मागच्या बाजूला, पोस्टेरिअर कॉर्टिकल हॉटझोनमध्ये असते. आपण त्याला लहान मेंदू म्हणतो व शरीराचा सगळा तोल त्यावर अवलंबून आहे, असे मानतो. नाना पाटेकरांच्या भाषेत छोटा दिमाग!

याविषयीचे धार्मिक समज, श्रद्धा बाजूला ठेवून अभ्यासक वर्षानुवर्षे निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस अर्थात एनडीईचे संकलन करीत आले आहेत. अलीकडे अशा ६२५ जणांचे अनुभव नोंदले गेले. अर्थातच, ते भन्नाट आहेत. शरीर सोडून जात असतानाच्या संवेदना कोणत्या असतात, तर स्वत:चा चेहरा व अचेतन शरीर पाहत आपण दूर निघून जात असल्याचे, अगदी आनंदाने अंधारलेल्या बोगद्यातून चालत प्रकाशाकडे निघाल्याचे जाणवते. म्हणजे जीव स्वत:च प्रकाश बनतो किंवा तो प्रकाशाकडे चालू लागतो. पण, हे स्वप्न अथवा भ्रम नसतो. वास्तवातच तसे घडल्याचा अनुभव येतो. - पण, याबाबत थोडे सावध राहायला हवे. कारण, मादक द्रव्यांचे सेवन करणाऱ्यांचेही अनुभवही असेच आहेत. नैसर्गिकरीत्या मृत्यू समीप आलेल्यांच्या अनुभवांशी त्याचे कमालीचे साधर्म्य आहे. विविध प्रकारच्या १६५ मादक द्रव्यांच्या परिणामांचा अभ्यास केला असता, विशेषत: केटामाइन हे मादक द्रव्य सेवन करणाऱ्यास मृत्यूला स्पर्श केल्याची अवस्था प्राप्त होते. स्वत:चे अचेतन शरीर, शांत चेहरा पाहत आपण अनंताच्या प्रवासाला निघालो आहोत, ही ती अवस्था असते. 

टॅग्स :Deathमृत्यू