शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 13:23 IST

- मिलिंद कुलकर्णी वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला ...

- मिलिंद कुलकर्णी

वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला जातो. काय झाले आणि काय राहून गेले, याचा आढावा घेतला जातो. काही ठरवूनदेखील शक्य झाले नसेल, ते नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचे असे मनोमन ठरविले जाते. हे ठरवले जाते, यालाच संकल्प म्हटले जाते. नव्या वर्षाचा असा संकल्प प्रत्येक जण करीत असतो, पण ‘नव्याचे नऊ दिवस’ या नियमानुसार आठवडाभरात नव्या वर्षाचा संकल्प मागे पडतो, विसरला जातो आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे गेल्या वर्षीसारखे आपण बेबंदपणे जगू लागतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची ही कथा आणि व्यथा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या संचारबंदीचा अंमल राहणार आहे. हा निर्णय तर नवा संकल्प केलेल्या नागरिकांच्या पथ्यावर पडला. समाज माध्यमावर एक मार्मिक संदेश या मंडळींकडून फिरवला गेला. तो असा होता, उद्यापासून चांगलं ठरवलं होतं पहाटे ४ वाजता चालायला जायचे...आणि नेमकी रात्रीची संचारबंदी लागू झाली...आता पाच जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार...१ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उपक्रम गेला, म्हणजे एकंदर २०२१ पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक...अवघड आहे...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असे म्हणतात, तसे आरंभशूर मंडळींचे होत असते. काही तरी बहाणा करुन संकल्प पुढे ढकलायचा प्रयत्न केला जातो, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे.

कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे आपल्याला आरोग्याचे महत्त्व कळले. प्रतिकारशक्ती मजबूत असणे किती आवश्यक आहे, हे ध्यानात आले. असे असताना दैनंदिन व्यायामाचा संकल्प सगळ्यांनी करणे आवश्यक होते, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते, आणि स्वाभाविकपणे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा केला जातो. ‘लवकर निजे, लवकर उठे’ ही शिकवण आपल्याला कालबाह्य, जुनाट वाटते. पण त्याचे महत्त्व अबाधित आहे, हे विसरुन चालणार नाही.संकल्प करुन ते सिध्दीस नेणारेदेखील अनेक जण आहे. भले, त्यांचे प्रमाण कमी असेल. पण त्यांची चिकाटी, सातत्य वाखाणण्याजोगे आहे. रनर्स ग्रुप, सायकलिस्ट ग्रुप, योग वर्ग, बॅडमिंटन, जीम या वेगवेगळ्या माध्यमातून नियमितपणे व्यायाम करणाऱ्या धडपड्या लोकांचे कौतुक करायला हवे. कोणताही ऋतू असला तरी त्यांच्या दैनंदिनीत खंड पडत नाही. आळसाला ते अजिबात जवळ फिरकू देत नाही. त्यांच्या या निश्चयामुळे केवळ आरोग्यासाठी लाभ होतो, असे नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक शिस्त लागते. घरी, कार्यालय वा व्यवसायातदेखील ते त्याच निश्चयाने, दृढतेने काम करताना दिसतात.त्याचा परिणाम व्यवसायवृध्दीत होते.

काहींना दैनंदिनी लिहायची सवय असते. त्यामाध्यमातून आपले रोजचे जगणे ते शब्दबध्द करतात. स्वत:च्या वागण्याचे, स्वभावाचे रोज आत्मपरीक्षण, विश्लेषण करतात. अकारण वाद, चुका, संताप टाळण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलतात. स्वनियंत्रणासाठी प्रयत्नरत राहतात. भवतालाकडे त्रयस्थपणे पाहतात. घटना, व्यक्ती व प्रसंगाविषयी तारतम्य भावाने विचार करु लागतात. हेदेखील व्यक्तिमत्व विकासाच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे. काही जण रोज किमान एक पान वाचल्याशिवाय झोपायचे नाही, असा निश्चय करतात. तो बराचसा यशस्वी करतात. समाजमाध्यमांवरील वाचन वाढले तरी पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वाचनाचा अवधी कमी होत चालला आहे. समाजमाध्यमांवरील मजकुराच्या विश्वासार्हतेविषयी संशयाचे वातावरण असताना सिध्द झालेली पुस्तके न वाचले ही आत्मवंचना ठरणार आहे. ज्ञान, माहिती या बाबत आपण परिपूर्ण नसू तर स्वत:ची मते बनविण्याविषयी आपण साशंक राहतो. झुंडीतील एक घटक बनून होकाराला हो देण्यात धन्यता मानतो. विवेकाने प्रत्येक गोष्टीकडे बघणे, चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव आहे. त्याचा विसर पडता कामा नये. म्हणून नवीन वर्षासाठी संकल्प ठरविणे, त्याचे पालन करणे आणि संकल्पातून सिध्दी मिळविण्याचा आनंद घेणे हा वेगळाच अनुभव आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षJalgaonजळगाव