शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे? नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:33 IST

जेव्हा परवानग्यांची वाट किचकट होती, तेव्हाही पळवाटा शोधून वने नष्ट होतच होती. नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले आहे.

- मिलिंद थत्ते, वनहक्क विषयातील अभ्यासक

गेल्या आठवड्यात संसदेत वन संवर्धन कायदा दुरुस्ती विधेयक संमत झाले आणि १९८० च्या कायद्यातील अनेक तरतुदी बदलून व नावही बदलून “वन संवर्धन एवं संरक्षण अधिनियम २०२३” अशा नावाचा कायदा लागू झाला. हे विधेयक विनाचर्चा पास झाले. विरोधाचा एकही सूर उमटला नाही. 

वन क्षेत्राचा वापर  वनेतर कामांसाठी होऊ लागल्याने वने घटतील या काळजीने १९८० साली हा कायदा झाला. वन जमिनीचा वापर वनेतर कामासाठी (शेती, उद्योग, शहर, हायवे, धरण इ.) करायचा झाल्यास केंद्र सरकारची परवानगी बंधनकारक झाली. १९९५ साली गोदावर्मन वि. केंद्र सरकार आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ वि. केंद्र सरकार असे दोन खटले सर्वोच्च न्यायालयात सुरू झाले. पहिल्या खटल्यात न्यायालयाने जंगलाची व्याख्या विस्तारली. जे जंगल ‘वन’ म्हणून सरकारने घोषित केलेले नाही ते जंगलही वन संवर्धन कायद्याच्या कक्षेखाली आणले. दुसऱ्या खटल्यात न्यायालयाने स्वतःच एक समिती नेमून या समितीची परवानगी बंधनकारक केली. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची परवानगीही अनिवार्य झाली. १९९६ पासून पुढे  प्रकल्पासाठी वनजमीन घेताना या तीन परवानग्या बंधनकारक झाल्या.  हळूहळू राज्य सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांनी, मोठ्या उद्योगांनी या इतक्या परवानग्या पटापट मिळवण्याचा राजमार्ग तयार केला. जंगलतोडीवर भरपाई वनीकरण (कंपेन्सेटरी अफारेस्टेशन) चा उतारा होताच. जेवढे जंगल तोडाल, त्याच्या दुप्पट जमिनीवर वनीकरण करायचे. म्हणजे तेवढे पैसे सरकारात भरायचे. ज्या ज्या राज्यात वनीकरणासाठी वनेतर जमीन सरकार उपलब्ध करून देईल, तिथे हा पैसा केंद्र सरकारकडून दिला जातो. त्यातून होणारे वनीकरण जगले नाही तरी कोणाचीही नोकरी वगैरे जात नाही. अतिरिक्त जमीन आणि पैसा आपल्या हातात आल्यामुळे वनविभाग खुश असतो.

वन‘क्षेत्र’ वाढले असे दाखवता येते. पैसे देऊन आपली सुटका झाली म्हणून प्रकल्प यंत्रणाही खूश असते. २०२१ साली ४८,६०६ कोटी रुपये केंद्राने ३२ राज्यांना वाटले होते. या निधीपैकी ६० टक्के निधी खर्चच न झाल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने ५ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केले होते. म्हणजे ‘भरपाई वनीकरण’ ही धूळफेक आहे, हे सांगणे न लगे.इंग्रजांच्या काळात १८६४ पासून सरकारची मक्तेदारी जंगलांवर आली. देशाच्या प्रती हजारो आदिवासी या मक्तेदारीविरुद्ध लढले. पण तरीही इंग्रज कायदे आपण स्वतंत्र भारतात, तसेच ठेवले. इमारती लाकडाचे मक्तेदारी शोषण करण्यासाठी जी वनविभाग नावाची व्यवस्था इंग्रजांनी रचली, तीही तशीच ठेवली. जंगलात राहणारे वननिवासी हे जंगलांमधली अडचण आहेत, यांना बाहेर काढा - हेच देशाचे धोरण बनले. 

१९७२, १९८० साली झालेल्या कायद्यांनीही लोक जंगलात सुखाने आणि पिढ्यानपिढ्या राहतात, हे मान्यच केले नाही. १९८८ साली राष्ट्रीय वन नीतीमध्ये प्रथमच त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे हा वन धोरणाचा एक उद्देश म्हणून मान्य झाला. प्रत्यक्षात शेतीचे, वस्तीचे, गुरे चारण्याचे, सरपणाचे, वनोपज गोळा करण्याचे हक्क मान्य व्हायला २००६ सालचा वन हक्क कायदा आणावा लागला. पण आज १५ वर्षांनंतरही वन हक्काची अंमलबजावणी १० टक्केच झाल्याचे केंद्रीय जनजाती मंत्रालयानेच म्हटले आहे.या कायद्याने  वनवासीयांचे हक्क मान्य झाल्याशिवाय वनांचा वनेतर उपयोग करता येणार नाही, अशी अट आली. सन २०१४ व २०१७ च्या वन संवर्धन नियमांमध्ये तशी स्पष्ट तरतूद होती. वनहक्क क्लिअरन्स झाल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला प्राथमिक मान्यता मिळणार नाही. पण २०२२ साली वन संवर्धन नियम बदलले. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने हे नियम मागे घेण्याची सूचना वन मंत्रालयाला केली. आयोगाच्या पत्रात म्हटले होते, “गेल्या १० वर्षात १२८ खाणींनी वन मंत्रालयाकडे परवानगी मागितली. त्यातले फक्त ९ प्रकल्प अडले.

पण त्यापैकी एकही ग्रामसभेच्या मान्यतेसाठी अडले नव्हते. उलट अनेक प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्क क्लिअरन्स ग्रामसभा न घेताच दिले होते. आता नवीन नियमांनुसार वनहक्क क्लिअरन्सशिवाय प्राथमिक मान्यता मिळणार आहे. प्राथमिक मान्यतेनंतर राज्य सरकारांनी वनहक्क क्लिअरन्स व ग्रामसभा ठराव जमवून द्यायचे आहेत. हे म्हणजे वनहक्कांना निरर्थक करण्यासारखे आहे.”

 

- या पत्रानंतरही नियम बदलले नाहीत. उलट आयोगाच्या अध्यक्षांनाच राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. २०१८ साली आदिवासी मंत्रालयाच्या अधिकृत पत्रात वन संवर्धन नियमांमुळे आदिवासींचे वन हक्क तुडवले जातील, असा आक्षेप घेतलेला आहे. पण २०२२ साली संसदेत मात्र आदिवासी मंत्र्यांनी घूमजाव करून “वन हक्क मान्यता व वनेतर वापराची परवानगी या दोन्ही प्रक्रिया समांतर चालतील” असे उत्तर दिले. - म्हणजे काय? हक्क देण्याची आणि काढून घेण्याची प्रक्रिया एकाच वेळी?लोकसभेत हे विधेयक मांडताना केंद्रीय वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, “हा कायदा लागू झाल्यामुळे झारखंडमधल्या एखाद्या गावात मुलींसाठी शौचालय बांधता येईल, छत्तीसगडमधल्या दुर्गम गावात रस्ता जाऊ शकेल.”- खरे तर अशा कामांसाठी वनहक्क कायद्यात आधीच तरतूद आहे. मग ही मखलाशी कशाला?आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किलोमीटरपर्यंतचे सर्व प्रकल्प, रेल्वे आणि राजमार्गांच्या जवळच्या वनजमिनी, नक्षलग्रस्त भागात सुरक्षेसाठी लागणारी वनजमीन, पर्यटनासाठी लागणाऱ्या सुविधांचे बांधकाम, झू सफारी वगैरे - या ठिकाणी वने नष्ट करायला आता परवानगीची गरज नाही. जेव्हा परवानग्या लागत तेव्हाही वने नष्ट होतच होती. आता पळवाटेलाच राजमार्ग केले आहे. हा कायदा आणण्यामागची पार्श्वभूमी पाहता सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे, असा प्रश्न पडतो.        milindthatte@gmail.com

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग