शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

भ्रष्टाचाराच्या वाढत्या संक्रमणात देश कुठाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 15:38 IST

- सविता देव हरकरेसर्वोच्च राष्ट्रभक्ती कुठली? राष्ट्रभक्त कुणाला म्हणायचे? देशभक्तीची नेमकी परिमाणे काय? हे अलीकडच्या काळात भारतवंशात चर्चिले जाणारे सर्वाधिक महत्त्वाचे विषय. देशभक्तीच्या या मोजमापांमध्ये आम्ही एवढं रमलोय की देशातील इतर कळीच्या मुद्यांची उकल करण्याची सवडच नाही. मग तो वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न असो वा आरोग्याचा. श्रीमंत-गरिबातील वाढत्या दरीचा अथवा भ्रष्टाचाराचा. आज ...

- सविता देव हरकरेसर्वोच्च राष्ट्रभक्ती कुठली? राष्ट्रभक्त कुणाला म्हणायचे? देशभक्तीची नेमकी परिमाणे काय? हे अलीकडच्या काळात भारतवंशात चर्चिले जाणारे सर्वाधिक महत्त्वाचे विषय. देशभक्तीच्या या मोजमापांमध्ये आम्ही एवढं रमलोय की देशातील इतर कळीच्या मुद्यांची उकल करण्याची सवडच नाही. मग तो वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न असो वा आरोग्याचा. श्रीमंत-गरिबातील वाढत्या दरीचा अथवा भ्रष्टाचाराचा. आज भ्रष्टाचाराच्या वाळवीने सारा देश पोखरला जातोय, नाही पोखरला गेलाय पण त्याचे कुणाला काय? या भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांना तर आपल्या मगरमीठीत एवढे घट्ट सामावून घेतलेय की त्यातून कधी सुटका होईल की नाही याबाबत साशंकता वाटावी. भारताने भ्रष्टाचारात आशियातील देशांनाही मागे टाकले असल्याचे वृत्त त्याचीच साक्ष देते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे जो निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यानुसार आपल्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे. शाळा प्रवेश, रुग्णालये, ओळखपत्रे, पोलीस आणि इतर सुविधांसाठी सरेआम लाच घेतली जाते. आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या या देशात आरोग्य सेवेतही एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावतो यातून काय समजायचे.भारतवंशात भ्रष्टाचाराचा इतिहास तसा जुनाच. फूट पाडा अन शासन करा हे धोरण गुलामगिरीच्या काळात इंग्रजांनी या देशात राबविले होते. त्या काळात बड्याबड्या राजेमहाराजांनीही सत्ता व संपत्तीच्या मोहापायी इंग्रजांना साथ देत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. हळूहळू भ्रष्टाचाराच्या या वृक्षाने एवढे अक्राळविक्राळ रूप धारण केले की त्यातून स्वत:ची सुटका करून घेणे येथील नागरिकांना अशक्य वाटू लागले. कालांतराने तो एक संस्कारच झाला. परंतु केंद्रात मोदी सरकार विराजमान झाले तेव्हा मात्र भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या देशवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्याचे कारण असे की या सरकारने सत्तेत येताच लोकांना भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखविले होते. त्यासाठी मग काही धाडसी निर्णयही घेतले. भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल म्हणून लोकांनीही प्रचंड त्रास सहन करून त्यांना साथ दिली. पण पदरी काय पडले? पुन्हा तोच भ्रष्टाचार! ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही मोदीगर्जनाही हवेतच विरली. लोकपालचे काय झाले ते कळलेच नाही. अर्थात भ्रष्टाचार निर्मूलन हे काही केवळ कायद्याने शक्य नाही. केवळ पैशानं सुख विकत घेता येतं असं मानणारे आणि त्याच्या लोभापायी भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्या व अडकविणाऱ्या लोकांनाही आपली मानसिकता बदलवावी लागणार आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत