शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

बाटलीबंद पाणी, वाळूचे काय?

By admin | Published: April 30, 2016 4:13 AM

कारखान्यांची पन्नास टक्के पाणीकपात करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर नगर जिल्ह्यातील या दहा कारखान्यांची पाणीकपात सुरू झाली

मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांची पन्नास टक्के पाणीकपात करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर नगर जिल्ह्यातील या दहा कारखान्यांची पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे आमचे उत्पादन व सरकारचा महसूल घटेल, तसेच दारूची तूट भरून काढण्यासाठी कदाचित बनावट दारूचे पेव फुटेल, असे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे म्हणणे आहे.दुष्काळी महाराष्ट्राला ‘आयपीएल’ तसेच मद्यासाठी पाणी दवडणे परवडणारे नाही, अशी टीका झाली. पण, पाण्याची नासाडी केवळ या दोन ठिकाणी होते आहे असे नव्हे. कुठल्याही शहरात अथवा खुर्द-बुद्रूकमध्ये गेल्यास तेथे आता बाटलीबंद पाण्याचे पेव फुटले आहे. सर्रास आता जारचे पाणी वापरले जाते. नगर जिल्ह्यातील कर्जत हे तालुक्याचे शहर शतप्रतिशत जारच्या पाण्यावर अवलंबून आहे. या गावात आत्तापर्यंत ७ पाणी योजना राबविल्या गेल्या. उद्भव आटल्याने या सर्व योजना सध्या बंद आहेत. या सातही पाणी योजनेत प्रशासनाने जल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला नाही. त्यामुळे शुद्ध पाण्यासाठी सगळे गाव जारवर अवलंबून आहे. एक कुटुंब यासाठी महिन्याकाठी अंदाजे सहाशे रुपये खर्च करते. एवढ्याशा गावात जारच्या पाण्याचे सात कारखाने आहेत. गावात सकाळी दूध पोहोचवावे तसे हे जार घरोघर पोेहोचविले जातात. पण या कारखान्यांपैकी किती कारखान्यांना परवानगी आहे, ते किती कर भरतात, पाण्याची शुद्धता किती, हा संशोधनाचा विषय आहे. पाण्याचा हा व्यापार सध्या जोरात आहे. शुद्ध पाणी हा जनतेचा अधिकार असताना ते विकत घेण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या मते मिनरल वॉटरची निर्मिती करणारे तीस तरी कारखाने जिल्ह्यात आहेत. अर्थात या सर्वच कारखान्यांची नोंदणी मात्र एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे हे कारखाने नेमके किती पाणी वापरतात याचे आॅडिट समोर येत नाही. या कारखान्यांच्या पाण्याबाबत शासकीय दरबारी धोरण ठरलेले नसल्याने ते बिनदिक्कत सुरू आहेत व दुष्काळामुळे त्यांचे पाणी अधिक विकले जातेय. सर्व सार्वजनिक पाणवठे बंद पडून त्याची जागा आता बाटलीबंद पाण्याने घेतल्याचे पहावयास मिळतेय. किंबहुना लोकांना या पाण्याची ‘नशा’ लागली आहे.वाळूही गेली अन् पाणीही...जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात शिरेगाव व घोगरगाव येथे ग्रामस्थांनी गत आठवड्यात वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पेटवून दिले. वाळू उपसा थांबविण्याबाबत या ग्रामस्थांनी ठराव केला होता. पोलिसात तक्रारही दिली. मात्र, पोलिसांनी गावाच्या बाजूने उभे राहण्याऐवजी तुम्हीही ट्रॅक्टर खरेदी करून वाळू उपसा करा, असा उफराटा सल्ला दिला. नाईलाज झाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत तस्करांना अडवून त्यांचे ट्रॅक्टर पेटविले. याप्रकरणी आता ग्रामस्थांवरच गुन्हा दाखल झाला आहे. ही दोन्ही गावे मुळा नदीच्या काठावर आहेत. मात्र, वाळू उपशामुळे नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. वाळूमुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो. वाळू पाणी धरून ठेवते. मात्र, नदीपात्रात वाळूच नसल्याने पाणी वाहून गेले. परिणामी नदी व आसपासच्या विहिरीही आटल्या. गत ४०-४५ वर्षात प्रथमच अशी परिस्थिती उद्भवली आहे. मुळा, प्रवरा अशा सर्वच नद्यांचे नदीकाठ सध्या कोरडेठाक आहेत. याला केवळ वाळू उपसा जबाबदार आहे. मद्यसम्राटांपेक्षाही या वाळू सम्राटांनी गावांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षी वाळूचे ७३ साठे लिलावासाठी काढले होते. यातील वीसच साठ्यांचे लिलाव झाले. अन्य लिलावांसाठी वाळू ठेकेदारांकडून निविदाच भरल्या गेल्या नाहीत. सरकारी लिलाव न झाल्यास महसूल बुडविता येतो व या साठ्यांची चोरीही करता येते, असा हा ‘फॉर्म्युला’ आहे. दुर्दैवाने याबाबत लोकप्रतिनिधीही ‘ब्र’ काढत नाहीत. कारण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी वाळू चोरीचे धंदे कधीच ‘बुक’ केलेले आहेत. जलयुक्तसोबतच ‘वाळूयुक्त नदी’ हे अभियान हवे आहे.- सुधीर लंके