शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

जनतेच्या विशेषाधिकाराचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:43 IST

विशेषाधिकार. शब्दातूनच अर्थाचा दबदबा अभिव्यक्त होतो इतका तो विशिष्ट आहे. विशेषाधिकार म्हणजे सरकार, विशेषाधिकार म्हणजे सत्तेने दिलेले विशेषत्व. भारतीय संविधान लोकशाहीवादी असले तरी विशिष्ट व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांच्यावरील जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्याकरिता कायद्याने हा अधिकार प्रदान केला आहे.

विशेषाधिकार. शब्दातूनच अर्थाचा दबदबा अभिव्यक्त होतो इतका तो विशिष्ट आहे. विशेषाधिकार म्हणजे सरकार, विशेषाधिकार म्हणजे सत्तेने दिलेले विशेषत्व. भारतीय संविधान लोकशाहीवादी असले तरी विशिष्ट व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांच्यावरील जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्याकरिता कायद्याने हा अधिकार प्रदान केला आहे. पण, हा अधिकार म्हणजे कसेही वागण्याचा अमर्याद परवाना किंवा एखाद्या उत्तरदायित्वापासून मिळालेली मुक्तता असे अजिबात नाही. असलाच तर तो त्या अधिकारात वंचित-शोषितांच्या हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे. पण, दुर्दैवाने या विशेषाधिकाराचा वापर प्रत्येकवेळी केवळ ‘स्व’च्या वलयाला जगापुढे अधोरेखित करण्यासाठी केला गेला आहे. याच क्रमातले नवे उदाहरण परवा विधानसभेत पाहायला मिळाले. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ऐरवी ‘राजकीय मतभेद’ असा परवलीचा शब्द समोर करून लोकहिताच्या विषयावरही परस्परांचे कपडे फाडणारे सर्वपक्षीय आमदार विशेषाधिकाराच्या मुद्यावर सरकारला गुद्दे द्यायला अध्यक्षांपुढे उभे ठाकले. विशेषाधिकाराच्या हक्कासाठी यावेळची सर्वपक्षीय आमदारांची ही एकजूट नाशिक जिल्ह्यातील एका तहसीलदाराच्या हक्कभंगावरून निर्माण झाली. या तहसीलदाराने म्हणे, राकाँच्या सदस्य दीपिका चव्हाण यांना असभ्य वागणूक दिली होती. यावरून सत्ताधीश-विरोधकांची ही एकजूट इतकी घट्ट होती की त्यांच्या निर्धारापुढे आधी सभागृह तहकूब झाले व नंतर तर संबंधित खात्याच्या मंत्र्याला त्या तहसीलदाराला पार निलंबितच करावे लागले. विधानसभेतला हा घटनाक्रम नियोजित नव्हता. पण, गोष्ट विशेषाधिकाराची आहे म्हटल्यावर आधी एक आमदार, नंतर दुसरा व नंतर तिसरा असे अनेकांना त्यांच्या अवमाननेच्या आठवणी अस्वस्थ करू लागल्या आणि विशेषाधिकाराच्या सुरेक्षसाठी पाहता-पाहता आमदारांची एक मोठी साखळी निर्माण झाली. विशेषाधिकाराची सुरक्षा ही योग्यच गोष्ट आहे व ती तसा अधिकार लाभलेल्या प्रत्येकाने केलीही पाहिजे. परंतु ज्या लक्षावधी मतदारांनी आपल्या हिताच्या रक्षणासाठी आमदारांना विजयाचा विशेषाधिकार प्रदान करून राज्याच्या विधिमंडळात पाठवले त्या जनतेच्या विशेषाधिकाराचे काय याचे उत्तरही या आमदारांनी शोधायला हवे. शेतकरी सातत्याने नागवला जातोय, बेरोजगारांची फौज दिवसागणिक वाढतेय, गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले नाही, भ्रष्टाचाराची वाळवी थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलीय. याच्या बंदोबस्तासाठीही सर्वपक्षीय आमदारांनी, जनतेने त्यांना दिलेला विशेषाधिकार वापराला पाहिजे. नाही तर एक दिवस जनता तो स्वत:च काढून घेईल.

टॅग्स :Courtन्यायालय