शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आम्ही डांबर खातो... तुम्ही ?

By सचिन जवळकोटे | Updated: July 12, 2018 00:49 IST

पुणेकर जेवढे ‘हेल्थ’च्या बाबतीत अलर्ट, तेवढेच ‘फूड’च्या बाबतीतही क्रेझी. दिवसभर अरबट-चरबट खाऊन संध्याकाळी ‘बालगंधर्व’च्या कट्ट्यावर ‘लिंबू-आलं-पादलोण’ची रसभरीत चर्चा करणारे लेले काका जेवढे ग्रेट; तेवढेच सणाला नाजूक पुरणपोळीवर साजूक तूप ओतून घेऊन रात्री ‘अर्धोपवास’ करणारे नेने पंतही महान.

पुणेकर जेवढे ‘हेल्थ’च्या बाबतीत अलर्ट, तेवढेच ‘फूड’च्या बाबतीतही क्रेझी. दिवसभर अरबट-चरबट खाऊन संध्याकाळी ‘बालगंधर्व’च्या कट्ट्यावर ‘लिंबू-आलं-पादलोण’ची रसभरीत चर्चा करणारे लेले काका जेवढे ग्रेट; तेवढेच सणाला नाजूक पुरणपोळीवर साजूक तूप ओतून घेऊन रात्री ‘अर्धोपवास’ करणारे नेने पंतही महान.त्यामुळेच नेहमी पंत, नाना अन् काकांच्या टोळक्यात खाण्या-पिण्याचा ऊहापोह होत आलेला. आजही ही सारी हौशी खवय्ये मंडळी पेठेतल्या एका राजकीय नेत्याच्या घरातील विवाह सोहळ्याला जमलेली. या ठिकाणी सर्व पक्षांचे नेतेही आवर्जून आलेले. यावेळी नेत्यांच्या ‘खाण्या-पिण्या’ची चर्चा सुरू झाली, तेव्हा उडालेली गम्माडी गंमत जश्शीच्या तश्शीऽऽ.बासुंदीत बुडविलेली गरमागरम जिलेबी रायगडच्या तटकरेभाऊंसमोर धरत लेले काका म्हणाले, ‘घ्याऽऽ खास तुमच्यासाठी आणलीय. सिंचनाच्या पाण्यात भिजवलेल्या पिठाची जिलेबी आहे हीऽऽ’ सुनीलभाऊंना ठसका लागताच नेने पंत मदतीला धावले, ‘राहू द्या होऽऽ एवढं काय मनाला लावून घेताय तुम्ही. सिमेंट खाणाऱ्यांच्या टापूत राहणाºयांना सारंच पचवता आलं पाहिजे.’हे ऐकून बीडच्या पंकजाताई तोंडावर हात ठेवून हळूच म्हणाल्या, ‘काय म्हणताऽऽ काय.. माझ्या चिक्कीपेक्षाही गोड आहे की काय ही जिलेबी?’ हे ऐकताच दानवेंनी थेट अमितभार्इंना मोबाईल कॉल लावला, तेव्हा जानकरांच्या म्हादूभाऊंनी तत्काळ त्यांच्या पदस्पर्शांची अनुभूती घेत त्यांना गोड बोलून हळूच बाजूला नेलं. आयुष्यभर माईकसमोर घसा बसेपर्यंत ओरडूनही जेवढं काही मिळत नसतं, तेवढं केवळ एकदा पाया पडण्यानं झटकन गवसतं, याचा साक्षात्कार झाल्यापासून म्हणे ‘चळवळीतला कार्यकर्ता’ आता ‘अस्सल राजकारणी’ बनला होता.असो... जेवता-जेवता घोळक्यात प्रत्येकाच्याच आवडी-निवडी चर्चेत आल्या. ‘मुंबईतली आदर्श डीश’ कितीही चांगली असली तरी पचायला अत्यंत जड असते, हे अशोकरावांनी कळवळून सांगितलं. ‘भूखंडाचे लाडू’ पूर्वी मनोहरपंतांना चविष्ट लागले तरी आपल्यासाठी किती कडवट ठरले, हे कथन करताना जळगावच्या नाथाभाऊंचंही तोंड भलतंच वेडवाकडं झालं. एवढ्यात चंद्रकांतदादांच्या प्लेटमधल्या काळ्याकुट्ट पदार्थाकडं कुणाचंतरी लक्ष गेलं. ‘अरे बापरेऽऽ पार डांबरासारखा काळा पडलाय की तुमचा पकोडा. खाऊ नका तो. आणा इकडं.’ गोडबोले नानांच्या या सल्ल्यावर दादा गडबडले, ‘अहोऽऽ ही प्लेट मी आत्ताच घेतलीय. पूर्वी विजयदादा अन् छगनरावांच्या हातात होती ही डांबराची प्लेट,’ असं त्यांनी सांगताच अजितदादांना आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटल्या.दादांनी उगाचंच सर्वांचं लक्ष वेधून घेत ‘उद्धों’ना एका स्वीटडीशची आॅर्डर केली, ‘घ्याऽऽ घ्याऽ दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातला खास गुलाबजामून घ्या. नाशिकच्या अस्सल तुपात घोळलाय. इन्कम टॅक्सवाल्यांनाही दोन-तीन वर्षे खूप आवडला होता.’ मात्र, याचवेळी थोरले काका बारामतीकरांनी उत्साही अजितदादांना कोपºयात हळूच ढोसलं, ‘उगाच इतरांच्या खाण्याचा जादा कालवा करू नका. तुमच्या कालव्याचा विषय निघाला तर छगनरावांशेजारील त्यावेळच्या जुन्या खोल्या झटक्यात बुक होऊन जातील.’ 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र