शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?

By संदीप प्रधान | Updated: May 27, 2024 06:21 IST

ठाणेकरांचे पाणी मुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले.

-संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

देशात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी झपाट्याने वाढत असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढे तसेच समाजापुढे काही आव्हाने उभी आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईने ही दरी वेगळ्या अर्थाने पुसून टाकली आहे. शहापूर-आसनगाव किंवा मुरबाड यासारख्या परिसरातील छोट्या गावांमध्ये टंचाईमुळे महिला, मुली यांना किमान पाच किलोमीटर पायपीट करून डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहावे लागत आहेत तर ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक कोटी रुपये खर्च करून टू बीएचके खरेदी केलेल्या उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायट्यांना दरमहा टँकरपोटी किमान सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. ठाणेकरांचेपाणीमुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले.

ब्रिटिशांनी मुंबई शहर हे समुद्रालगत असल्याने बंदर म्हणून विकसित केले. मात्र, या मुंबई शहरात स्वत:ची तहान भागविण्याची क्षमता नाही. ठाणे व नाशिक जिल्ह्यांतून गुरूत्वाकर्षणाने पाणी मुंबईकडे आणून मुंबईकरांची तहान भागविण्याचा मार्ग सव्वाशे वर्षांपूर्वी स्वीकारला गेला. त्यावेळी भविष्यात ठाणे, नाशिक ही मोठी शहरे विकसित होतील, असा विचारही मनाला शिवला नसेल. त्यामुळे शहापूर, आसनगावच्या आदिवासी पाड्यांच्या तोंडचे पाणी काढून मुंबईतील मलबार हिल, कफ परेडमधील धनिक ढोसत आहेत. मुंबईत जेव्हा पाण्याचा अर्धा प्याला पिऊन मुंबईकर पाणी टाकून उठतो तेव्हा त्याच्या मनाला ही भावना शिवत नाही की, जेथून हे पाणी आले तेथील एक लहान मुलगी शाळेत जायचे टाळून आईच्या मदतीसाठी अशा घोटभर पाण्यासाठी उन्हात कळशी घेऊन पायाला चटके बसत असताना वणवण फिरत असेल.

शहापूर, आसनगाव येथील डोंगराळ भागात अनेक गावे आहेत. येथे सुरू केलेल्या नळ योजना ४० वर्षे जुन्या आहेत. अनेक भागात नळांना पाणी येत नाही. उंचावर पाणी नेण्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिल कुणी भरायचे, पाणीपट्टी कुणी भरायची? असे असंख्य प्रश्न आहेत. येथील खर्डी, बिरवाडी पाणी योजनांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याने हंडे, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणे अपरिहार्य आहे. येथील साजिवली व सावरशेत ही दोन गावे ७०० ते ८०० लोकवस्तीची. नदीच्या अगदी जवळ असूनही तेथे आतापर्यंत नळ योजना नाही. नदीपात्रात महिला, मुली पाणी भरायला जातात आणि पावसाळ्यात प्रवाहात वाहून दरवर्षी दुर्घटना घडते. 

येथील गावांत मोबाइल टॉवर आहेत, स्मार्टफोन मिळतात, राष्ट्रीयीकृत बँका आहेत, मर्सिडीज मोटारी गावात येतात; पण घरात नळ नाही. असले तरी त्यांना पाणी येत नाही. आसनगाव, कसारा वगैरे भागात मोठ्या संख्येने रिसॉर्ट उभे राहिलेत. येथे मुंबई, ठाण्यातील लब्धप्रतिष्ठित मौजमजेकरिता येतात. त्या रिसॉर्टला बेकायदा बोअरवेल किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा होतो. मात्र, गाव-पाडे तहानलेले आहेत. मुरबाडमध्येही तीच परिस्थिती आहे. येथील १२५ ग्रामपंचायतींनी तब्बल १८९ पाणी योजना राबविल्या. कंत्राटदारांना पैसे दिले. मात्र, टँकर सुरू आणि बायका-पोरींच्या डोक्यावरील हंडे-कळशा काही उतरत नाहीत.

घोडबंदर रोड हा ठाण्यातील सुशिक्षित, लब्धप्रतिष्ठितांचा परिसर. येथे मुंबईतील अनेक नामांकित बिल्डर्सनी टॉवर उभारलेत. येथे किमान ६५ ते ७० लाखांना वन बीएचके फ्लॅट मिळतो. या परिसरात कायम पाणीटंचाई आहे. सोसायटीला महिन्याकाठी पाच ते सहा लाख रुपये टँकरवर खर्च करावे लागतात.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणेMumbaiमुंबईWaterपाणी