शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?

By संदीप प्रधान | Updated: May 27, 2024 06:21 IST

ठाणेकरांचे पाणी मुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले.

-संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

देशात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी झपाट्याने वाढत असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढे तसेच समाजापुढे काही आव्हाने उभी आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईने ही दरी वेगळ्या अर्थाने पुसून टाकली आहे. शहापूर-आसनगाव किंवा मुरबाड यासारख्या परिसरातील छोट्या गावांमध्ये टंचाईमुळे महिला, मुली यांना किमान पाच किलोमीटर पायपीट करून डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहावे लागत आहेत तर ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक कोटी रुपये खर्च करून टू बीएचके खरेदी केलेल्या उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायट्यांना दरमहा टँकरपोटी किमान सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. ठाणेकरांचेपाणीमुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले.

ब्रिटिशांनी मुंबई शहर हे समुद्रालगत असल्याने बंदर म्हणून विकसित केले. मात्र, या मुंबई शहरात स्वत:ची तहान भागविण्याची क्षमता नाही. ठाणे व नाशिक जिल्ह्यांतून गुरूत्वाकर्षणाने पाणी मुंबईकडे आणून मुंबईकरांची तहान भागविण्याचा मार्ग सव्वाशे वर्षांपूर्वी स्वीकारला गेला. त्यावेळी भविष्यात ठाणे, नाशिक ही मोठी शहरे विकसित होतील, असा विचारही मनाला शिवला नसेल. त्यामुळे शहापूर, आसनगावच्या आदिवासी पाड्यांच्या तोंडचे पाणी काढून मुंबईतील मलबार हिल, कफ परेडमधील धनिक ढोसत आहेत. मुंबईत जेव्हा पाण्याचा अर्धा प्याला पिऊन मुंबईकर पाणी टाकून उठतो तेव्हा त्याच्या मनाला ही भावना शिवत नाही की, जेथून हे पाणी आले तेथील एक लहान मुलगी शाळेत जायचे टाळून आईच्या मदतीसाठी अशा घोटभर पाण्यासाठी उन्हात कळशी घेऊन पायाला चटके बसत असताना वणवण फिरत असेल.

शहापूर, आसनगाव येथील डोंगराळ भागात अनेक गावे आहेत. येथे सुरू केलेल्या नळ योजना ४० वर्षे जुन्या आहेत. अनेक भागात नळांना पाणी येत नाही. उंचावर पाणी नेण्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिल कुणी भरायचे, पाणीपट्टी कुणी भरायची? असे असंख्य प्रश्न आहेत. येथील खर्डी, बिरवाडी पाणी योजनांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याने हंडे, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणे अपरिहार्य आहे. येथील साजिवली व सावरशेत ही दोन गावे ७०० ते ८०० लोकवस्तीची. नदीच्या अगदी जवळ असूनही तेथे आतापर्यंत नळ योजना नाही. नदीपात्रात महिला, मुली पाणी भरायला जातात आणि पावसाळ्यात प्रवाहात वाहून दरवर्षी दुर्घटना घडते. 

येथील गावांत मोबाइल टॉवर आहेत, स्मार्टफोन मिळतात, राष्ट्रीयीकृत बँका आहेत, मर्सिडीज मोटारी गावात येतात; पण घरात नळ नाही. असले तरी त्यांना पाणी येत नाही. आसनगाव, कसारा वगैरे भागात मोठ्या संख्येने रिसॉर्ट उभे राहिलेत. येथे मुंबई, ठाण्यातील लब्धप्रतिष्ठित मौजमजेकरिता येतात. त्या रिसॉर्टला बेकायदा बोअरवेल किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा होतो. मात्र, गाव-पाडे तहानलेले आहेत. मुरबाडमध्येही तीच परिस्थिती आहे. येथील १२५ ग्रामपंचायतींनी तब्बल १८९ पाणी योजना राबविल्या. कंत्राटदारांना पैसे दिले. मात्र, टँकर सुरू आणि बायका-पोरींच्या डोक्यावरील हंडे-कळशा काही उतरत नाहीत.

घोडबंदर रोड हा ठाण्यातील सुशिक्षित, लब्धप्रतिष्ठितांचा परिसर. येथे मुंबईतील अनेक नामांकित बिल्डर्सनी टॉवर उभारलेत. येथे किमान ६५ ते ७० लाखांना वन बीएचके फ्लॅट मिळतो. या परिसरात कायम पाणीटंचाई आहे. सोसायटीला महिन्याकाठी पाच ते सहा लाख रुपये टँकरवर खर्च करावे लागतात.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणेMumbaiमुंबईWaterपाणी