शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:10 IST

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही.

- विनायक पात्रुडकर

पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी करते. रेंगाळलेला मान्सून, तलावात कमी झालेला जलसाठा, अशी अनेक कारणे महापालिका देते. नागरिक ते मान्य करतात. पाणी कपातीपेक्षा नियम पाळणे कधीकधी सोयीचे असते. हा दरवर्षी ठरलेला क्रम कधी थांबेल हे सांगता येणार नाही. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. मध्यंतरी शिवाजी पार्क येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक प्रयोग झाला होता. पुढे त्यात सातत्य राहिले की नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती नसेल. असो विषय पाणी वाचवण्याचा आहे.भविष्यात एकतर मुंबई पाण्यात बुडेल किंवा पाण्यावाचून तिला प्राण सोडावे लागतील, अशी परिस्थिती सध्या आहे. किमान पुढच्या पिढीची चिंता करून तरी पाण्यासाठी योग्य नियोजन करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, याचे तरी भान पालिकेची सत्ता हाकणाऱ्यांनी ठेवायला हवे. प्रशासनाला मुंबईची काळजी नसली तरी काही सामाजिक संघटना या शहरासाठी योगदान देत आहेत. एका सामजिक संघटनेने दहिसर नदीवर बंधारा बांधला आहे. याद्वारे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठवले जाईल. हे पाणी सार्वजनिक शौचालयासाठी तसेच अग्निशमन दल आग विझवण्यासाठी वापरणार आहे. असे अजून काही बंधारे बांधले जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करायला हवा व असे आणखी मार्ग शोधायला हवेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात एवढे पाणी समुद्रात वाहून गेले की त्यात दोन धरणे भरली असती. हे पाणी वाचवले असत तर मुंबईकरांना किमान धुणीभांडी करण्यासाठी तरी पाणी मिळाले असते. मुंबईत पाच नद्या आहेत. त्यातील मिठी नदीला मुंबईकर आणि प्रशासनाने ठार केले आहे. उर्वरित नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. या नद्या वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तिच पालिका प्रशासनाकडे नाही. त्याचे परिणाम शहराला व येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.जगभरात अशी अनेक शहरे आहेत, जेथे मुंबईसारखी अतिवृष्टी होते. तेथील प्रशासनांनी अशाप्रकारे नियोजन केले आहे की, पाऊस कितीही पडला तरी जनजीवन विस्कळीत होत नाही. पाणी गटारात वाया जात नाही. आपले लोकप्रतिनिधी परदेश दौरे करतात. शहर नियोजनाचे सूत्र शिकून घेतात. मात्र त्याची अंमलबजावणी कासव गतीने होते. ही गती वाढली नाही तर हे शहर नक्कीच पाण्याखाली जाईल. तेव्हा पाण्याचे नियोजन आता तरी गांभीर्याने करायला हवे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट