शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:10 IST

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही.

- विनायक पात्रुडकर

पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी करते. रेंगाळलेला मान्सून, तलावात कमी झालेला जलसाठा, अशी अनेक कारणे महापालिका देते. नागरिक ते मान्य करतात. पाणी कपातीपेक्षा नियम पाळणे कधीकधी सोयीचे असते. हा दरवर्षी ठरलेला क्रम कधी थांबेल हे सांगता येणार नाही. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. मध्यंतरी शिवाजी पार्क येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक प्रयोग झाला होता. पुढे त्यात सातत्य राहिले की नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती नसेल. असो विषय पाणी वाचवण्याचा आहे.भविष्यात एकतर मुंबई पाण्यात बुडेल किंवा पाण्यावाचून तिला प्राण सोडावे लागतील, अशी परिस्थिती सध्या आहे. किमान पुढच्या पिढीची चिंता करून तरी पाण्यासाठी योग्य नियोजन करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, याचे तरी भान पालिकेची सत्ता हाकणाऱ्यांनी ठेवायला हवे. प्रशासनाला मुंबईची काळजी नसली तरी काही सामाजिक संघटना या शहरासाठी योगदान देत आहेत. एका सामजिक संघटनेने दहिसर नदीवर बंधारा बांधला आहे. याद्वारे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठवले जाईल. हे पाणी सार्वजनिक शौचालयासाठी तसेच अग्निशमन दल आग विझवण्यासाठी वापरणार आहे. असे अजून काही बंधारे बांधले जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करायला हवा व असे आणखी मार्ग शोधायला हवेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात एवढे पाणी समुद्रात वाहून गेले की त्यात दोन धरणे भरली असती. हे पाणी वाचवले असत तर मुंबईकरांना किमान धुणीभांडी करण्यासाठी तरी पाणी मिळाले असते. मुंबईत पाच नद्या आहेत. त्यातील मिठी नदीला मुंबईकर आणि प्रशासनाने ठार केले आहे. उर्वरित नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. या नद्या वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तिच पालिका प्रशासनाकडे नाही. त्याचे परिणाम शहराला व येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.जगभरात अशी अनेक शहरे आहेत, जेथे मुंबईसारखी अतिवृष्टी होते. तेथील प्रशासनांनी अशाप्रकारे नियोजन केले आहे की, पाऊस कितीही पडला तरी जनजीवन विस्कळीत होत नाही. पाणी गटारात वाया जात नाही. आपले लोकप्रतिनिधी परदेश दौरे करतात. शहर नियोजनाचे सूत्र शिकून घेतात. मात्र त्याची अंमलबजावणी कासव गतीने होते. ही गती वाढली नाही तर हे शहर नक्कीच पाण्याखाली जाईल. तेव्हा पाण्याचे नियोजन आता तरी गांभीर्याने करायला हवे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट