शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:10 IST

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही.

- विनायक पात्रुडकर

पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी करते. रेंगाळलेला मान्सून, तलावात कमी झालेला जलसाठा, अशी अनेक कारणे महापालिका देते. नागरिक ते मान्य करतात. पाणी कपातीपेक्षा नियम पाळणे कधीकधी सोयीचे असते. हा दरवर्षी ठरलेला क्रम कधी थांबेल हे सांगता येणार नाही. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. मध्यंतरी शिवाजी पार्क येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक प्रयोग झाला होता. पुढे त्यात सातत्य राहिले की नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती नसेल. असो विषय पाणी वाचवण्याचा आहे.भविष्यात एकतर मुंबई पाण्यात बुडेल किंवा पाण्यावाचून तिला प्राण सोडावे लागतील, अशी परिस्थिती सध्या आहे. किमान पुढच्या पिढीची चिंता करून तरी पाण्यासाठी योग्य नियोजन करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, याचे तरी भान पालिकेची सत्ता हाकणाऱ्यांनी ठेवायला हवे. प्रशासनाला मुंबईची काळजी नसली तरी काही सामाजिक संघटना या शहरासाठी योगदान देत आहेत. एका सामजिक संघटनेने दहिसर नदीवर बंधारा बांधला आहे. याद्वारे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठवले जाईल. हे पाणी सार्वजनिक शौचालयासाठी तसेच अग्निशमन दल आग विझवण्यासाठी वापरणार आहे. असे अजून काही बंधारे बांधले जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करायला हवा व असे आणखी मार्ग शोधायला हवेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात एवढे पाणी समुद्रात वाहून गेले की त्यात दोन धरणे भरली असती. हे पाणी वाचवले असत तर मुंबईकरांना किमान धुणीभांडी करण्यासाठी तरी पाणी मिळाले असते. मुंबईत पाच नद्या आहेत. त्यातील मिठी नदीला मुंबईकर आणि प्रशासनाने ठार केले आहे. उर्वरित नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. या नद्या वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तिच पालिका प्रशासनाकडे नाही. त्याचे परिणाम शहराला व येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.जगभरात अशी अनेक शहरे आहेत, जेथे मुंबईसारखी अतिवृष्टी होते. तेथील प्रशासनांनी अशाप्रकारे नियोजन केले आहे की, पाऊस कितीही पडला तरी जनजीवन विस्कळीत होत नाही. पाणी गटारात वाया जात नाही. आपले लोकप्रतिनिधी परदेश दौरे करतात. शहर नियोजनाचे सूत्र शिकून घेतात. मात्र त्याची अंमलबजावणी कासव गतीने होते. ही गती वाढली नाही तर हे शहर नक्कीच पाण्याखाली जाईल. तेव्हा पाण्याचे नियोजन आता तरी गांभीर्याने करायला हवे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट