शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

पैसा निर्माण करणारे पाणी वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:17 IST

महाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपल्या वाट्याचे पाणी वाया जात आहे.

- वसंत भोसलेमहाराष्ट्रातील असे काही विषय आहेत की, ते सोडविले पाहिजेत म्हणून लेखणी झिजवत पत्रकारांची एक पिढी संपली. शेती आणि सिंचन हा त्यांपैकीच एक विषय आहे. कृष्णा, नर्मदा, गोदावरी, आदी नद्यांच्या खो-यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वापर योग्यरीत्या होत नाही. महाराष्ट्रासमोर सिंचनाची समस्या ही मोठी आव्हानात्मक बाब ठरलेली असतानाही त्यावर गांभीर्याने काम होत नाही. या उलट सिंचन प्रकल्पाद्वारे सर्वांत मोठा गैरव्यवहार याच महाराष्ट्राने पाहिला आहे. परिणामी आजही महाराष्ट्राची ८० टक्के जमीन सिंचनाखाली आलेली नाही. ती बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे.महाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यापैकीच कृष्णा खो-यातील टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या भल्यामोठ्या उपसा जलसिंचन योजना आहेत. या तिन्ही योजनांवर आजवर (तीन दशकांत) पाच हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र योजना पूर्ण नाहीत आणि जितके क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते, त्याच्या निम्मेही क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. तरीसुद्धा या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न जवळपास दरवर्षी हजारो रुपये कोटींनीे वाढले आहे. द्राक्षबागा, ऊसशेती, भाजीपाला आणि अन्य पिके घेतली जात आहेत. तातडीने दरवर्षी एक हजार कोटी रुपये खर्च करून आगामी पाच वर्षांत या योजना पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत खात्रीचे पाणी देण्याचे नियोजन केले तर सुमारे दीड लाखाहून अधिक एकर क्षेत्रात उत्पादन दहा पटींनी वाढेल. त्याची किंमत किमान २० हजार कोटी रुपये असेल.दुर्दैव इतके वाईट की, कृष्णा खोºयातील बहुतांश धरणे पूर्ण झाली आहेत. तरीही पाणी उचलण्याची सोय नसल्याने कृष्णा लवादानुसार राज्याच्या वाट्याला आलेले सर्व पाणी आजही आपण वापरू शकत नाही. ते वाया जात आहे. कोयना, उरमोडी आणि वारणा, आदी धरणांतील पाणी पूर्णत: वापरलेच जात नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या तीन योजनांपैकी म्हैशाळच्या सुमारे तीन हजार एकर क्षेत्राला पाणी देणारी महाकाय योजना चालू वर्षी मार्च उजाडला तरी सुरूच केली नाही. पाणी बिलाच्या थकबाकीपोटी ती बंद आहे. ती सुरू करावी यासाठी शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. या योजनेतील शेतीतून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे शेती उत्पादन होते आहे. सांगलीची द्राक्षशेती आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेली बेदाणा बाजारपेठ याच योजनेच्या बळावर नावारूपाला आली. मात्र ही योजना नीट चालविली जात नाही. पाणीपट्टी वसुलीचे नियोजन नाही. गेली चार वर्षे विजेचे बिल, टंचाईतून शासनाने भरले. कॉँगेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातही ते टंचाईतूनच भरले जात होते. आताही शेतक-यांची तीच मागणी आहे.वास्तविक शेती आणि शेतीवर आधारित व्यापारातील वाढीने केवळ या योजनेवर होणा-या व्यापारातून सरकारला ५०० कोटींपेक्षा अधिक कररूपाने मिळत आहेत. वास्तविक कमीत कमी पाणीपट्टीत या योजना सुरू कराव्यात. पाणी आहे, ते पैसा निर्माण करू शकते. ते वाया कशासाठी घालवायचे? भाजप सरकार प्रतिष्ठेचा प्रश्न करून आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नेहमीच वाकड्या नजरेने पाहते. या योजनाच बंद पाडण्याचे कारस्थान तर शिजविले जात नाही ना? दरवर्षी १०० कोटी विजेवर खर्च करा. शेती व त्यावरील व्यापाराने किमान हजार कोटी रुपयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर सरकारला मिळेल. पैसा देणारे पाणी वाया का घालविता?

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र