शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

पैसा निर्माण करणारे पाणी वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:17 IST

महाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपल्या वाट्याचे पाणी वाया जात आहे.

- वसंत भोसलेमहाराष्ट्रातील असे काही विषय आहेत की, ते सोडविले पाहिजेत म्हणून लेखणी झिजवत पत्रकारांची एक पिढी संपली. शेती आणि सिंचन हा त्यांपैकीच एक विषय आहे. कृष्णा, नर्मदा, गोदावरी, आदी नद्यांच्या खो-यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वापर योग्यरीत्या होत नाही. महाराष्ट्रासमोर सिंचनाची समस्या ही मोठी आव्हानात्मक बाब ठरलेली असतानाही त्यावर गांभीर्याने काम होत नाही. या उलट सिंचन प्रकल्पाद्वारे सर्वांत मोठा गैरव्यवहार याच महाराष्ट्राने पाहिला आहे. परिणामी आजही महाराष्ट्राची ८० टक्के जमीन सिंचनाखाली आलेली नाही. ती बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे.महाराष्ट्रातील एकाही सिंचन प्रकल्पाचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यापैकीच कृष्णा खो-यातील टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या भल्यामोठ्या उपसा जलसिंचन योजना आहेत. या तिन्ही योजनांवर आजवर (तीन दशकांत) पाच हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र योजना पूर्ण नाहीत आणि जितके क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते, त्याच्या निम्मेही क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. तरीसुद्धा या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न जवळपास दरवर्षी हजारो रुपये कोटींनीे वाढले आहे. द्राक्षबागा, ऊसशेती, भाजीपाला आणि अन्य पिके घेतली जात आहेत. तातडीने दरवर्षी एक हजार कोटी रुपये खर्च करून आगामी पाच वर्षांत या योजना पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत खात्रीचे पाणी देण्याचे नियोजन केले तर सुमारे दीड लाखाहून अधिक एकर क्षेत्रात उत्पादन दहा पटींनी वाढेल. त्याची किंमत किमान २० हजार कोटी रुपये असेल.दुर्दैव इतके वाईट की, कृष्णा खोºयातील बहुतांश धरणे पूर्ण झाली आहेत. तरीही पाणी उचलण्याची सोय नसल्याने कृष्णा लवादानुसार राज्याच्या वाट्याला आलेले सर्व पाणी आजही आपण वापरू शकत नाही. ते वाया जात आहे. कोयना, उरमोडी आणि वारणा, आदी धरणांतील पाणी पूर्णत: वापरलेच जात नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या तीन योजनांपैकी म्हैशाळच्या सुमारे तीन हजार एकर क्षेत्राला पाणी देणारी महाकाय योजना चालू वर्षी मार्च उजाडला तरी सुरूच केली नाही. पाणी बिलाच्या थकबाकीपोटी ती बंद आहे. ती सुरू करावी यासाठी शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. या योजनेतील शेतीतून दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे शेती उत्पादन होते आहे. सांगलीची द्राक्षशेती आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेली बेदाणा बाजारपेठ याच योजनेच्या बळावर नावारूपाला आली. मात्र ही योजना नीट चालविली जात नाही. पाणीपट्टी वसुलीचे नियोजन नाही. गेली चार वर्षे विजेचे बिल, टंचाईतून शासनाने भरले. कॉँगेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातही ते टंचाईतूनच भरले जात होते. आताही शेतक-यांची तीच मागणी आहे.वास्तविक शेती आणि शेतीवर आधारित व्यापारातील वाढीने केवळ या योजनेवर होणा-या व्यापारातून सरकारला ५०० कोटींपेक्षा अधिक कररूपाने मिळत आहेत. वास्तविक कमीत कमी पाणीपट्टीत या योजना सुरू कराव्यात. पाणी आहे, ते पैसा निर्माण करू शकते. ते वाया कशासाठी घालवायचे? भाजप सरकार प्रतिष्ठेचा प्रश्न करून आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नेहमीच वाकड्या नजरेने पाहते. या योजनाच बंद पाडण्याचे कारस्थान तर शिजविले जात नाही ना? दरवर्षी १०० कोटी विजेवर खर्च करा. शेती व त्यावरील व्यापाराने किमान हजार कोटी रुपयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर सरकारला मिळेल. पैसा देणारे पाणी वाया का घालविता?

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र