शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना पोटनिवडणुकांचा निकाल संदेश देणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 08:31 IST

महाराष्ट्रासह सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला.

महाराष्ट्रासह सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. प्रत्येक राज्यातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना ‘केला इशारा जाता जाता,’ अशा प्रकारचा संदेश देणारा हा निकाल आहे. सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाची निवडणूक होण्यापूर्वीच गाजत राहिली. प्रमुख  विरोधी पक्ष भाजपने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या घेतला आणि त्या निवडणुकीच्या रंगाचा बेरंग झाला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. त्यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने अचानकपणे एप्रिलमध्ये झाले. पोटनिवडणूक जाहीर होईपर्यंत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट भाजपशी युती करून सत्तेत आला. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके ठाकरेप्रेमी असल्याने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी ही पोटनिवडणूक शिवसेनेकडून लढविण्याचे ठरविले.

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. ही निवडणूक भाजपने लढविण्याचे निश्चित झाले. मात्र मराठी माणसांच्या अस्मितेची लढत म्हणून शिवसेना मैदानात उतरली असती आणि ठाकरेंची शिवसेनाच ही निवडणूक जिंकण्याचीही शक्यता अधिक होती. त्या  निकालाचा परिणाम आगामी मुंबई महापालिकेवर होऊ नये, म्हणून भाजपने राज ठाकरे यांचा वापर करीत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला. भाजपने माघार घेतली; पण काही अपक्षांचे अर्ज राहिल्याने मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. चुरस नसल्याने केवळ बत्तीस टक्के मतदान झाले.

अपक्षांना किरकोळ मात्र ‘नोटा’ला १२ हजार मते पडली. ऋतुजा लटके यांनी ‘नोटा’ या नजीकच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करीत निवडणूक जिंकली.  शिवसेनेच्या रूपात असलेल्या मुंबईतील मराठी माणसांच्या अस्मितेला भाजप प्रचंड घाबरून आहे. शिवसेनेत फूट पडली, तेव्हा आठ-दहा दिवस भाजपचे नेते माध्यमांशी एक शब्द बोलले नाहीत. दररोज सकाळ-दुपार-संध्याकाळ माध्यमांच्या घोळक्यात असणारे भाजपचे नेते मूग गिळून गप्प होते. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजपची रसद होती, हे काही लपून राहिले नाही. या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याने ते अधिकच अधोरेखित झाले. महाराष्ट्राशिवाय हरयाणातील अदमपूर, उत्तरप्रदेशातील गोला गोकरनाथ, ओडिशामध्ये धामनगर, तेलंगणाच्या मुनुगोडे आणि बिहारच्या गोपालगंज तसेच मोक्कामा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका झाल्या. यांपैकी भाजपने हरयाणाना, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील गोपालगंज या तीन जागा  राखल्या. बिहारमधील दुसरी मोक्कामाची जागा राष्ट्रीय जनता दलाने जिंकली. ती त्याच  पक्षाकडे होती.

थोडा बदल आणि इशारा देणारी निवडणूक ओडिशा आणि तेलंगणामध्ये झाली. या राज्यात अनुक्रमे बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे वर्चस्व आहे. त्यांचे सरकारही आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस होता. या निवडणुकीत ती जागा भाजपने घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपविरोधी राष्ट्रीय पातळीवर आघाडी करीत असताना त्यांच्या राज्यात मुनुगोडे विधानसभा पोटनिवडणूक जिंकून भाजपने घाम फोडला. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये मताधिक्य मिळाल्याने तेलंगणा राष्ट्र समितीचे के. प्रभाकर रेड्डी यांचा विजय झाला. काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. ओडिशामध्येही भाजपने ही पोटनिवडणूक जिंकून सलग पाच वेळा बहुमत मिळवणाऱ्या बिजू जनता दलास सूचक इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेश हा भाजपचाच गड आहे. गोला गोकरनाथमध्ये त्यांनी विजय मिळविला. हरयाणाच्या हिस्सारमधील अदमपूर हा मतदारसंघ गेली पाच दशके माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबीयांकडे आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या पुढच्या पिढीने भाजपला जवळ करीत त्यांचे नातू भव्य बिष्णोई यांनी ही जागा जिंकली. काँग्रेसने चांगली लढत दिली. ‘आप’ तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. सर्वच राजकीय पक्षांना इशारा देत भाजपचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही, हे दाखवून दिले आहे. विरोधकांचा मार्ग सरळसोपा, स्पष्ट दिसत नाही. पोटनिवडणुकांचा प्रभाव मर्यादित असतो. तरीही तो एक इशारा समजायला हरकत नाही.