शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठोस कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 11:26 IST

- मिलिंद कुलकर्णीनाशिकमध्ये महाराष्ट, मध्य प्रदेश व गुजराथ राज्यातील सीमेवरील जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक गुरुवारी होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही बैठक होत असल्याने या बैठकीविषयी मोठ्या अपेक्षा आहेत. परप्रांतीय टोळ्यांचा खान्देशसह नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेला धुमाकूळ, अवैध शस्त्र विक्रीचा मोठा व्यापार, याच शस्त्रांचा वापर करीत होणारी गुन्हेगारी कृत्ये ...

- मिलिंद कुलकर्णीनाशिकमध्ये महाराष्ट, मध्य प्रदेश व गुजराथ राज्यातील सीमेवरील जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक गुरुवारी होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही बैठक होत असल्याने या बैठकीविषयी मोठ्या अपेक्षा आहेत. परप्रांतीय टोळ्यांचा खान्देशसह नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेला धुमाकूळ, अवैध शस्त्र विक्रीचा मोठा व्यापार, याच शस्त्रांचा वापर करीत होणारी गुन्हेगारी कृत्ये यामुळे पोलीस दल जेरीस आले आहे. अमळनेरातील प्रा.दीपक पाटील व पेट्रोलपंपचालक बाबा बोहरी यांच्या लागोपाठ घडलेल्या खुनाच्या घटनांनंतर जनमानसात पोलीस दलाविषयी तीव्र नाराजी दिसून आली. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरत पोलीस दलाच्या निष्क्रियतेचा कडाडून निषेध केला. अवैध शस्त्रांचा वापर करीत गुन्हेगारी कृत्ये करायची आणि सीमापार करुन स्थानिक पोलिसांना गुंगारा देण्याची कार्यपध्दती गुन्हेगारी विश्वात प्रचलित झाली आहे. नेमकी ही बाब हेरुन विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी परप्रांतीय टोळ्या आणि त्यांच्या नाशिक विभागातील कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त होत आहे. तलवारी, गावठी पिस्तुले यांचा जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात समावेश आहे. याचा पुढील टप्पा म्हणून चौबे यांनी नाशिक विभागाच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजराथमधील जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची सीमा परिषद नाशिक येथे आयोजित केली आहे. या परिषदेचे आयोजन हे स्वागतार्ह पाऊल आहे. परराज्यातील शेजारील जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुुखांपुढे किमान हा प्रश्न मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. त्याविषयी साधकबाधक चर्चा होऊन किमान मार्ग निघू शकेल. शेजारील जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या अडचणी, समस्यांची कल्पना येऊ शकेल. या परिषदेकडून तात्काळ परिणामांची अपेक्षा नसली तरी या समस्येवर कृतीबध्द कार्यक्रम आखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सीमेवरील पोलीस दलांमध्ये संपर्क व संवादाचे जाळे अधिक मजबूत करणे, माहितीचे तात्काळ अदान प्रदान करणे, गुन्हेगारी टोळ्यांची माहिती गोळा करुन त्यावर सातत्याने लक्ष ठेवणे या गोष्टींना प्राधान्य देता येईल. सातपुड्याचे जंगल, तेथील वनजमिनी याकडे गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष वळलेले आहे. पोलीस दलासोबतच वनविभागाला त्याचा त्रास होत आहे. उमर्टी हे मध्य प्रदेशातील गाव तर अवैध शस्त्र निर्मितीचे मोठे केंद्र आहे. परंतु त्यावर कठोर कारवाई अद्याप झालेली नाही. या परिषदेच्या माध्यमातून या प्रश्नांचा उहापोह होईल आणि किमान सुरुवात होईल, अशी अपेक्षा करायला हवी. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सीमा परिषदांच्या आयोजनांमध्ये सातत्य असायला हवे. गुन्हेगारी कृत्ये वाढली म्हणजे परिषद घ्या; इतर वेळी त्याचा विसर पडणे हे महागात पडणारे ठरु शकते.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव