शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मार्केटदेखील उद्ध्वस्त करायचे आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:39 IST

निवडणुकीत दिलेली अभिवचने पूर्ण करायला सरकार बांधील असते.

कलम ३७० रद्द करण्याचे भाजपचे उद्दिष्ट अनेक वर्षांपासून जाहीर झालेले आहे. बहुमताने निवडून आल्यावर त्या पक्षाला ते साध्य करता आले. भाजपने जी काही कृती केली ती लोकशाही परंपरांना धरून केली, असा युक्तिवाद काही जणांकडून करण्यात येतो, त्यात तथ्य जरूर आहे. कारण एखादे उद्दिष्ट जाहीर करणे, आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ते समाविष्ट करणे, त्याआधारे लोकांचे मत प्राप्त करणे आणि मग त्या उद्दिष्टाची अंमलबजावणी करणे हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरूनच झालेले आहे. लोकशाहीत सरकारची कोणतीही कृती ही चौकशीस पात्र ठरत असते. त्यामुळे ज्या प्रकारे हे उद्दिष्ट अमलात आणण्यात आले, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण हे कलम रद्द करणे ही लोकशाहीविरोधी कृती होती का? लोकांचा पाठिंबा असलेली एखादी कृती ही हुकूमशाही पद्धतीची असू शकते, मूर्खपणाची, कायद्यावर न टिकणारी, धोकादायक असू शकते, पण त्यामुळे लोकशाहीचा खून झाला, असा जो युक्तिवाद काहींनी केला आहे तो कितपत योग्य आहे?

निवडणुकीत दिलेली अभिवचने पूर्ण करायला सरकार बांधील असते. घटनेने जे हक्क लोकांना प्रदान करण्यात आले आहेत, त्यांचे उल्लंघन तर केले जात नाही ना हे पाहण्यासाठी न्यायसंस्था असते. तसे उल्लंघन होत असेल तर न्यायसंस्था त्यात हस्तक्षेप करू शकते. नोकरशाही आणि प्रशासकीय व्यवस्था ही सरकारच्या आदेशानुसार काम करीत असते. सरकारला नियंत्रणात ठेवण्याचे काम विरोधकांकडून केले जाते. या सर्वात वॉच डॉग या नात्याने मीडियाकडून त्याची भूमिका पार पाडण्यात येते. या सरकारच्या कार्यकाळातही लोकशाही व्यवस्था प्रभावीपणे नि:शस्त्र करण्याचे काम करण्यात आले़ हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी लोकशाहीला दंतविहीन करण्यात आले होते. पण या वेळी लष्कर मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्टीने पक्षपाती झाल्याचे पाहावयास मिळाले. सध्याची कृती घडत असताना न्यायव्यवस्था अकार्यक्षम झाल्याचे पाहावयास मिळाले. अलीकडे न्याय व्यवस्थेत भ्याडपणा शिरल्याचे दिसून आले.विरोधकांना एक तर संपविण्यात येत आहे किंवा त्यांना पक्षांतर करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. त्यामुळे त्यांचा वचक उरला नाही. मीडियाने वॉचडॉग या भूमिकेचा त्याग केला असून ती चीअरलीडरच्या भूमिकेत गेली आहे. काश्मीरच्या प्रश्नावर मीडियाने सरकारची भूमिका उचलून धरली. तिच्यातील आक्रमकता संपली आहे.

या सरकारने महत्त्वाच्या संस्थांवर स्वत:ची पकड घट्ट केली आहे. त्यामुळे लोकशाहीकडून जेवढी स्वतंत्रता मिळते त्याहून अधिक स्वातंत्र्य सरकारला मिळाले आहे. सरकारच्या कृतीवर आक्षेप घेण्याची शक्यता असणाऱ्या सगळ्या संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सरकारला निर्धोकपणे कृती करणे शक्य झाले आहे आणि हे सर्व लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळवून करण्यात येत आहे! सरकारच्या काश्मीरवरील कृतीला संपूर्ण देशातील जनतेने पाठिंबा दिला आहे़ निव्वळ लोकप्रियता असणे ही काही शहाणपणाची किंवा औचित्याची हमी असू शकत नाही. याचा अर्थ ज्या संस्था मोडकळीस आल्या, त्या कार्यक्षम असत्या तर त्यांनी सरकारचा विरोध केला असता असे होत नाही; पण जेव्हा कुणी लाल रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यावर आक्षेप घेण्याचे तरी नक्कीच काम केले असते.

आता एकच संस्था अस्तित्वात आहे जी प्रत्यक्षपणे आवाज उठवीत आहे आणि ती आहे मार्केट. अन्य संस्थांप्रमाणे उपभोक्ता आणि आर्थिक बाजारपेठ यांच्यावर सरकारला नियंत्रण ठेवता येत नाही. मार्केटमध्ये स्वत:चे अवगुण आहेत, तसेच ते विस्कळीत असते आणि पसरलेले असते. त्याला सरकारची तळी उचलण्याची गरज वाटत नाही. आकडेवारी मनासारखी तयार करता येते, व्यावसायिकांना प्रशंसोद्गार काढण्यास भाग पाडले जाऊ शकते़ पण जेव्हा मोटारींची विक्री होणे बंद होते, तेव्हा कारखाने बंद पडतात आणि लोक बेरोजगारीचा सामना करू लागतात. अशा वेळी मुखवटे धारण करणे शक्य होत नाही. स्टॉक मार्केटला अनेक मार्गांनी मॅनेज केले जाऊ शकत असले तरी त्याच्याकडून ताबडतोब निर्भीड, विश्वासार्ह व तत्काळ फीडबॅक मिळू शकतो. मार्केट ही अशी संस्था आहे जिच्याकडे लक्ष देणे सरकारला भाग पडते.

लोकशाहीच्या नावाने कृती करण्याचे अधिकार जेव्हा काही संस्थांच्या (जसे नोकरशाही, न्यायव्यवस्था, मीडिया) हातात एकवटलेले असतात, तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. तेव्हा काही मूठभर लोकांच्या शहाणपणावर विसंबून राहण्याऐवजी अनेकांच्या शहाणपणाच्या शक्तीची एकजूट कशाप्रकारे करता येईल, याचे मार्ग शोधण्याची गरज आहे. त्यासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरू शकतो, पण सध्या त्याची जी अवस्था आहे, तो त्या प्रकारे काही लोकांच्या हातातील साधन होऊन बसला आहे, त्या अवस्थेत तो निरुपयोगीच ठरण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या स्वरूपाच्या विकेंद्रित संस्थांची गरज वाटू लागली आहे. सध्या आपण ज्या नव्या जगात वावरत आहोत त्या जगात अशा संस्था प्रभावीपणे कार्य करू शकतील असे वाटते.- संतोष देसाईमाजी सीईओ फ्यूचर ब्रॅण्ड्स