शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:39 IST

सर्वच शहरे आणि ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या अवाढव्य आकाराच्या जाहिरात फलकांवर यापुढे खरंच नियंत्रण ठेवले जाईल? कारवाई होईल?

संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

गेल्यावर्षी १४ मे रोजी मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एक अवाढव्य जाहिरात फलक खाली कोसळून १७ जण ठार आणि ७० लोक जखमी झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने न्या. दिलीप भोसले  यांची समिती नेमली होती. या समितीने मुंबईसह राज्यभरातील जाहिरात फलकांचा (होर्डिंग्ज) आकार ४० बाय ४० फूट आकारापेक्षा मोठा असता कामा नये, अशी शिफारस केली असून, तो अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. 

समिती नेमली हे चांगलेच झाले, पण मुंबई वा कोणत्याही शहरात काय आकाराचे जाहिरात फलक असावेत, हे त्या-त्या ठिकाणच्या महापालिका, रेल्वे प्रशासन यांनी आधीच ठरवायला हवे. त्या बाबतीत महापालिका व रेल्वे यांचे काहीच धोरण नसल्याने आणि आपापसात सुसूत्रता नसल्याने २५० टन वजनाचा जाहिरात फलक लावला गेला. पाऊस व जोरदार हवा यामुळे तो कोसळला. मग अशा फलकांचा आकार किती असावा, याविषयी चर्चा सुरू झाली. मुंबईत कोसळलेल्या फलकाचा काही भाग रेल्वेच्या आणि काही भाग मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात होता आणि तो लावण्याबाबत दोन्ही यंत्रणांत संवादच नव्हता. या फलकाबद्दल काहींनी तक्रार केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष केले वा झाले. तो कोसळून लोक मेल्यावरही एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू झाले. न्या. भोसले समितीच्या अहवालाची नीट अंमलबजावणी होईल आणि सातत्याने शहरभर लागणाऱ्या जाहिरात फलकांवर लक्ष ठेवले जाईल, अशी खात्री सरकारी यंत्रणांनी द्यायला हवी. 

केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरे आणि आता अगदी ग्रामीण भागातही या अवाढव्य आकाराच्या (बेकायदा) फलकांचे पेव फुटले आहे.  हे जाहिरात फलक यापुढे इमारतीच्या गच्चीवर आणि भिंतीवर लावले जाऊ नयेत, असे न्या. भोसले समितीने नमूद केले आहे. ते लावले जाणार नाहीत. पण वांद्रे पूर्व व पश्चिम फ्लायओव्हर, सी लिंक, अंधेरी, ताडदेव व ग्रॅण्ट रोड, अंधेरी व जुहू या परिसरात जे जाहिरात फलक लागले आहेत, ते पाहूनही भीती वाटते. शिवाय दर १०-१५ फुटांच्या अंतराने जाहिरात फलक कशासाठी? अनेक फलकांवर वेगवेगळ्या प्रकारे जो उजेड केलेला असतो, तो वाहन चालकांच्या डोळ्याला त्रास देतो. जाहिरातीतून पैसे मिळवण्याच्या आणि मिळवून देण्याच्या नादात अधिकारी व जाहिरात कंपन्या इतरांच्या जीवाशी खेळतात. रात्री अशा डिजिटल फलकांवर पूर्णपणे बंदी हवी होती. पण आता रात्री ११ वाजल्यानंतर डिजिटल फलक सुरू राहिल्यास कारवाईची शक्यता आहे. 

प्रशासनातील मंडळींना लोकांच्या जगण्याची जणू फिकीरच नसते. ते स्वतःहून लोकहिताचा निर्णय घेत नाहीत. लोकहिताचा विचार मनात डोकावू नये, यासाठीही अधिकाऱ्यांच्या खिशात काही पडत असतेच. अन्यथा २५० टन वजनाच्या जाहिरात फलकाला कोण आणि का परवानगी देईल? जाहिरात फलक ४० बाय ४०  फुटापेक्षा अधिक उंच व रुंद असू नयेत, अशी न्या. दिलीप भोसले समितीची शिफारस आहे. त्यात अर्थातच काही नवे नाही. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर फलकांची उंची व रुंदी ४० बाय ४० फुटांहून मोठी असता कामा नये, असे आदेश काढले होते. पण त्याआधी मुंबईत १२० फूट उंच व १२० फूट रुंद म्हणजे एखाद्या इमारतीच्या आकाराचे जाहिरात फलक दिसत असत. त्यांना कोणी परवानगी दिली होती? नियम ठरलेले नाहीत, म्हणून कितीही आकाराचे फलक लावू द्यायचे? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि तेथील टोलनाक्याच्या वर जे फलक लागतात, त्याचे काय? ते कोसळले तर किती मोठा अनर्थ होईल? राज्यात सर्वत्र अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट आहे. तक्रार येईपर्यंत त्यावर कारवाई केलीच जात नाही. आता तर वाढदिवसाबरोबर विवाह व बारसे अशा निमित्तानेही फलक लागतात. त्यांच्यावर कारवाई होणारच नाही का? की ते सांगण्यासाठी वेगळी समिती हवी?    sanjeevsabade1@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Wake up before illegal hoardings collapse across Maharashtra cities!

Web Summary : Following the Ghatkopar tragedy, a committee recommended size restrictions for hoardings. Concerns remain about unauthorized hoardings state-wide, posing risks to public safety. Urgent action and strict enforcement are needed.
टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका