शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मतदारांनी मोदींकडे पाहून भरघोस मते दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 4:50 AM

युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाऱ्या योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने, काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.

माझ्या मते यावेळची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती व तिच्याविरुद्ध एकवटलेले सर्व विरोधक यांच्यातील लढाई होती. मला वाटते की, उमेदवार कोण आहे हे न पाहता, मतदारांनी मोदींना भरभरून मते दिली आहेत. मोदींवर संपूर्ण देशाने व्यक्त केलेला हा दृढविश्वास ही विकासाभिमुख राजकारणास दिलेली पसंतीची थाप आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रबळ होईल व जगात ताठ मानेने उभा राहील, याविषयी त्यांनी व्यक्त केलेली खात्रीही यातून दिसते. जनतेने दहशतवाद व भ्रष्टाचार यांच्या विरोधात दिलेला हा कौल आहे. संपूर्ण देशात ‘जीएसटी’सारखा एकच कर व नोटाबंदीवर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. मोदींच्या या दोन्ही निर्णयांविरुद्ध विरोधकांनी केलेला विरोध सपशेल फोेल ठरला.

भारताच्या युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व आपल्या आकांक्षा तेच पूर्ण करतील, या खात्रीने त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाºया योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.गेली ७० वर्षे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही मतदारांनी या निकालाने पाठिंबा दिला आहे. नेहमीच शत्रुत्व बाळगणाºया पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची व दहशतवाद्यांची यापुढे जराही गय केली जाणार नाही, हे बालाकोट येथील हवाई हल्ल्यांतून ठणकावून सांगण्याचे हे यश आहे. चीन या दुसºया शेजाºयाने कुरापती काढल्या, तेव्हा मोदींनी आपल्या ५६ इंची छातीने दमदार मुकाबला केला, हे डोकलाम तिढ्याच्या वेळी पाहणाºया लोकांनी या मतदानातून त्याबद्दल दमदार समर्थन दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदींच्या स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यावर देशवासी लुब्ध झाल्याचे हे प्रतीक आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार पूर्णपणे वेगळी गणिते मांडून मतदान करतात, हेही या निकालांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. ओडिशामध्ये हे स्पष्ट दिसले. विधानसभेसाठी तेथील मतदारांनी नवीन पटनाईक यांना पसंती दिली, पण लोकसभेसाठी मात्र त्यांच्या बिजू जनता दलाला तेवढी मते दिली नाहीत. मोदींनी ज्याला ‘महामिलावट’ म्हटले, त्या विरोधी पक्षांच्या तत्त्वशून्य युतीला या निवडणुकांनी जोरदार थप्पड दिली आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण निवडणूक जिंकण्याची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडणारे मोदी हे या देशाने पूर्वी कधीही न पाहिलेले नवे, अनोखे नेतृत्व आहे. विरोधकांनी धोरणे व कार्यक्रम सोडून व्यक्तिश: मोदींचा दुस्वास केला. विरोधाचे राजकारण कसे करू नये, याचाही धडा या निवडणुकीने दिला आहे.

भविष्यात अनेक वर्षे देशाचे अशाच एकनिष्ठेने नेतृत्व करण्यासाठी मोदींना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.- मुकुल रोहटगी(माजी अ‍ॅटर्नी जनरल )