शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:29 IST

देशातील बँकांना हजारो कोटींनी गंडवून विदेशात पळालेली माणसे तेथे चैनीत कशी राहतात?

देशातील बँकांना हजारो कोटींनी गंडवून विदेशात पळालेली माणसे तेथे चैनीत कशी राहतात? विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, चोक्सी या साऱ्यांनी देशाला एक लाख कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यांच्या त्या कारवाया सरकारातील मंत्र्यांच्या डोळ्यासमोर होत होत्या. त्यातील काहींनी विदेशात पळताना मंत्र्यांची भेट घेऊन तशी परवानगीही मिळविली. मल्ल्याला जेटलींनी तर ललित मोदीला सुषमा स्वराज यांनी तशी परवानगी दिली. ही माणसे प्रचंड मालमत्ता व संपत्ती घेऊन भारतीय विमानांनी विदेशात गेली. त्यांना परत आणण्याच्या सरकारी वल्गना देश ऐकत आला आणि त्या ऐकून तो आता कंटाळलाही आहे. आपला दयाळू व विस्मरणशील समाज एक दिवस या बड्या चोरांना व त्यांना साथ देणाऱ्या साऱ्यांना विसरूनही जाईल आणि पुन्हा जैसे थे ही स्थिती उत्पन्न होईल.मल्ल्या इंग्लंडच्या राणीच्या यजमानांसोबत गोल्फ खेळत होता. ललित मोदी भारतीय पासपोर्टचा वापर करून जगभरच्या देशांना भेटी देतो. नीरव मोदी लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यापार करतो आणि भारताचे मजबूत सरकार त्यांना ‘कधीतरी पकडूच’ अशी आशाच काय ती लोकांना दाखविते. ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील, हा दयाळू प्रश्न आपल्यापैकी अनेकांना अशा वेळी पडेल. संरक्षण खात्यातील महत्त्वाची कागदपत्रे चोर पळवितात व पुन्हा जागच्या जागी आणून ठेवतात आणि सरकारला त्याचा अखेरपर्यंत पत्ता लागत नाही हे उदाहरण मोदींच्या डोळस सरकारचे आहे. राफेल विमानांबाबतची ही कागदपत्रे ‘चोरांनी नेली व त्यांनीच ती आणूनही ठेवली’ असे देशाचा अ‍ॅटर्नी जनरल सर्वोच्च न्यायालयात शपथेवर सांगत असेल तर त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती? प्रत्यक्ष संरक्षण खात्याचे रक्षण ज्यांना करता येत नाही, त्यांच्यावर देशाच्या संरक्षणासाठी तरी विश्वास कसा ठेवायचा? नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन यांच्याखेरीज कोणत्याही जाणकार व्यक्तीला त्या पदावर आणत नाहीत. या संवेदनशील मुद्द्यावर पर्रीकर गप्प राहतात, निर्मलाबाई प्रश्नांची नेमकी उत्तरे टाळतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या सवयीप्रमाणे काहीएक बोलत नाहीत. त्यांचे भक्त मात्र सोशल मीडियावर त्यांना प्रश्न विचारणाºयांची ‘आई-बहीण’ काढत असतात. आपल्या सुसंस्कृत व प्राचीन देशातील परंपराभिमानी पक्षाला हे चालतही असते. मल्ल्याला पकडत नाहीत ते दाभोलकरांच्या खुन्यांना कसे पकडणार? ज्यांना नीरव मोदीला देशात आणता येत नाही ते अझहर मसूदला हात कसे लावणार? पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी तर देशातच आहेत, तरी त्यांचा सुगावा सरकारला कसा लागत नाही? नीरव मोदी लंडनमध्ये दिसल्याचे मोठे फोटो आता वृत्तपत्रांनी छापले. पण ते सरकारला का गवसले नाही? की त्यांनी बाहेरच राहणे या सरकारला आवश्यक वाटते. तशीही त्यांच्यातील काहींनी ‘देशात आलो तर अनेकांची बिंगे बाहेर काढू’ अशी धमकी दिलीच आहे. त्यामुळे ‘तुम्ही पळण्याचे नाटक करा, आम्ही पकडण्याचे नाटक करतो’ असा हा देखावा आहे. ज्या देशात व समाजात मोठे गुन्हेगार मोकळे राहतात तो देश व समाज सुरक्षित कसा राहील? की आज जे राज्य करतात ते आपलेच आहेत म्हणूनच या गुन्हेगारांच्या कृत्यांकडे आपल्यातील अनेक जण सहानुभूतीने पाहतात? आधी घडले ते सारे पाप होते, आता होत आहे ते सारे पुण्य आहे अशी या कृत्यांची कालमानानुसार व पक्षनिहाय वर्गवारी करायची असते काय? जे या वर्गवारीत मग्न आहेत त्यांचे समाधान कुणालाही हिरावून घ्यायचे नाही. मात्र ते या देशाच्या हिताशी खेळत आहेत, एवढे तरी त्यांना सांगितलेच पाहिजे.सरकारला कोणताही अवघड प्रश्न विचारला की या प्रश्नाचा आरंभ पूर्वीच्या सरकारांच्या काळातच झाला आहे, असे कामचलाऊ उत्तर देण्याची सवय या सरकारातील मंत्र्यांना व त्यांच्या प्रवक्त्यांना आता जडली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात काय केले यापेक्षा पूर्वीच्या सरकारांनी काय केले, यावर हेच ऐकून घेण्याची वेळ देशावर येते आहे. त्यामुळे त्यांनी कधीतरी सत्याची कास धरावी, एवढेच येथे त्यांना नम्रपणे सांगायचे आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदीLalit Modiललित मोदीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेArun Jaitleyअरूण जेटलीSushma Swarajसुषमा स्वराज