शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

विदर्भवाद्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:00 IST

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकºयांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे अखेर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आज सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आले आहे, अशी सबळ कारणे देऊन विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. परंतु काँग्रेस असो वा भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भाचा केवळ निवडणुकीपुरता उपयोग करून नंतर यापासून फारकत घेत असल्याने व सातत्याने प्रयत्न करूनही स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला स्थानिकांचा जनाधार लाभत नसल्याने स्वतंत्र विदर्भाचे समर्थक थोडे निराश झाले आहेत. परवा नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांनी ही निराशा थेट मंचावरून अनुभवली. विशेष म्हणजे, ज्यांच्या बोलण्यातून ही निराशा व्यक्त झाली ती काही साधी नावे नव्हती. यातले एक नाव अ‍ॅड. श्रीहरी अणे तर दुसरे नाव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे होते. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आला नाही तर पुढे तो येणे शक्य नाही, असे विधान अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ज्या भाजपाने एकेकाळी स्वतंत्र विदर्भासाठी रान उठवले होते ती भाजपा आता मात्र कशी मूग गिळून बसलीय याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातला टीकेचा भाग सोडला तर पुढे काय याचे उत्तर अणे आपल्या भाषणातून देऊ शकले नाहीत. स्वतंत्र विदर्भासाठी लढणाºया संघटनांनी आता राजकीय व्हावे व त्यांचे नेतृत्व कल्पनेतल्या संयुक्त रिपब्लिकन पक्षाने करावे, इतका एक सोयीचा संदेश देऊन त्यांनी आपले भाषण आटोपले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तर अणेंपेक्षाही जास्त निराश दिसले. वेगळा विदर्भ कसा फायद्याचा आहे, या विषयावर मी लेख लिहिणेच बंद करून टाकले आहे. कारण, वेगळा विदर्भ येथील जनतेलाच हवा की नको याबाबत मी साशंक आहे, अशा शब्दात त्यांनी आपली निराशा जाहीर केली आणि पुढचे सर्व भाषण मुंबईच्या इन्फास्ट्रक्चरला समर्पित करून टाकले. विदर्भवाद्यांची ही निराशा फारच बोलकी आहे. त्यामुळे या नेत्यांकडे नेतृत्वाच्यादृष्टीने आशाळभूत नजरेने पाहणाºया वैदर्भीयांना विदर्भ वेगळा हवा या जुन्या मागणीसाठी नव्याने चैतन्य निर्माण करण्याकरिता पुन्हा नवा पर्याय शोधावा लागेल, असेच चित्र दिसत आहे.

टॅग्स :newsबातम्या