शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

विदर्भवाद्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:00 IST

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकºयांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे अखेर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आज सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आले आहे, अशी सबळ कारणे देऊन विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. परंतु काँग्रेस असो वा भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भाचा केवळ निवडणुकीपुरता उपयोग करून नंतर यापासून फारकत घेत असल्याने व सातत्याने प्रयत्न करूनही स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला स्थानिकांचा जनाधार लाभत नसल्याने स्वतंत्र विदर्भाचे समर्थक थोडे निराश झाले आहेत. परवा नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांनी ही निराशा थेट मंचावरून अनुभवली. विशेष म्हणजे, ज्यांच्या बोलण्यातून ही निराशा व्यक्त झाली ती काही साधी नावे नव्हती. यातले एक नाव अ‍ॅड. श्रीहरी अणे तर दुसरे नाव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे होते. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आला नाही तर पुढे तो येणे शक्य नाही, असे विधान अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ज्या भाजपाने एकेकाळी स्वतंत्र विदर्भासाठी रान उठवले होते ती भाजपा आता मात्र कशी मूग गिळून बसलीय याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातला टीकेचा भाग सोडला तर पुढे काय याचे उत्तर अणे आपल्या भाषणातून देऊ शकले नाहीत. स्वतंत्र विदर्भासाठी लढणाºया संघटनांनी आता राजकीय व्हावे व त्यांचे नेतृत्व कल्पनेतल्या संयुक्त रिपब्लिकन पक्षाने करावे, इतका एक सोयीचा संदेश देऊन त्यांनी आपले भाषण आटोपले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तर अणेंपेक्षाही जास्त निराश दिसले. वेगळा विदर्भ कसा फायद्याचा आहे, या विषयावर मी लेख लिहिणेच बंद करून टाकले आहे. कारण, वेगळा विदर्भ येथील जनतेलाच हवा की नको याबाबत मी साशंक आहे, अशा शब्दात त्यांनी आपली निराशा जाहीर केली आणि पुढचे सर्व भाषण मुंबईच्या इन्फास्ट्रक्चरला समर्पित करून टाकले. विदर्भवाद्यांची ही निराशा फारच बोलकी आहे. त्यामुळे या नेत्यांकडे नेतृत्वाच्यादृष्टीने आशाळभूत नजरेने पाहणाºया वैदर्भीयांना विदर्भ वेगळा हवा या जुन्या मागणीसाठी नव्याने चैतन्य निर्माण करण्याकरिता पुन्हा नवा पर्याय शोधावा लागेल, असेच चित्र दिसत आहे.

टॅग्स :newsबातम्या