शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

विदर्भाची मागणी राजद्रोह कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:36 IST

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे.

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे. तसे पाहिले तर विदर्भाचा मुद्दा हा ज्वलंत आहे. त्यामुळे मात्र राजकीय इच्छाशक्तीपेक्षा समाजाचे पाठबळ अशा आंदोलनांमध्ये जास्त आवश्यक असते. विदर्भवाद्यांकडून आंदोलने तर करण्यात येत आहेत, मात्र अद्यापही त्याला हवे तसे जनसमर्थन प्राप्त होऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदा विदर्भवाद्यांसोबतच महाराष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. अगोदर विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वापरलेली थेट राजद्रोहाचीच भाषा यामुळे विदर्भावरून राजकारण तापले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एखादी गोष्ट राजद्रोह आहे की नाही, हे ठरविण्याची एक यंत्रणा असते. मात्र कुणी आपल्या भूमिकेच्या विरोधात मागणी करत आहे, म्हणून त्याला थेट राजद्रोही ठरविण्याची मानसिकता गेल्या काही काळात वाढीस लागली आहे. देशात वेळोवेळी यासंदर्भातील वक्तव्ये वाचाळवीर नेत्यांनी केली आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनीदेखील नेमकी तीच री ओढली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा पवित्रा जनसामान्यांनादेखील फारसा रुचलेला नाही. ‘सोशल मीडिया’वर येणाºया प्रतिक्रियांमधूनदेखील हे जाणवून येत आहे. मुळात लोकशाही पद्धतीत कुणालाही मागणी करण्याचा अधिकार आहे. संविधानानेच ते स्वातंत्र्य दिलेले आहे. वेगळे विदर्भ राज्य ही काही एका व्यक्तीची मागणी नाही, तर विविध समूहांची भावना आहे. त्यामुळे या भावनेचा सन्मान अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे विदर्भवादी वेगळ्या राज्याच्या निर्मितीची आवश्यकता का आहे हे सांगत आहे, त्याच धर्तीवर वेगळे राज्य का सोईचे नाही या प्रश्नाची ठोस उत्तरे महाराष्ट्रवाद्यांकडून येताना दिसून येत नाहीत. केवळ आक्रमक भाषा वापरली आणि टीकाटिप्पणी केली की जनतेच्या शंकांचे समाधान होत नसते. लोकशाहीत प्रत्येकाचा आदर करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. राजद्रोहाची भाषा वापरणाºयांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र