शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

विदर्भाची मागणी राजद्रोह कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:36 IST

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे.

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे. तसे पाहिले तर विदर्भाचा मुद्दा हा ज्वलंत आहे. त्यामुळे मात्र राजकीय इच्छाशक्तीपेक्षा समाजाचे पाठबळ अशा आंदोलनांमध्ये जास्त आवश्यक असते. विदर्भवाद्यांकडून आंदोलने तर करण्यात येत आहेत, मात्र अद्यापही त्याला हवे तसे जनसमर्थन प्राप्त होऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदा विदर्भवाद्यांसोबतच महाराष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. अगोदर विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वापरलेली थेट राजद्रोहाचीच भाषा यामुळे विदर्भावरून राजकारण तापले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एखादी गोष्ट राजद्रोह आहे की नाही, हे ठरविण्याची एक यंत्रणा असते. मात्र कुणी आपल्या भूमिकेच्या विरोधात मागणी करत आहे, म्हणून त्याला थेट राजद्रोही ठरविण्याची मानसिकता गेल्या काही काळात वाढीस लागली आहे. देशात वेळोवेळी यासंदर्भातील वक्तव्ये वाचाळवीर नेत्यांनी केली आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनीदेखील नेमकी तीच री ओढली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा पवित्रा जनसामान्यांनादेखील फारसा रुचलेला नाही. ‘सोशल मीडिया’वर येणाºया प्रतिक्रियांमधूनदेखील हे जाणवून येत आहे. मुळात लोकशाही पद्धतीत कुणालाही मागणी करण्याचा अधिकार आहे. संविधानानेच ते स्वातंत्र्य दिलेले आहे. वेगळे विदर्भ राज्य ही काही एका व्यक्तीची मागणी नाही, तर विविध समूहांची भावना आहे. त्यामुळे या भावनेचा सन्मान अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे विदर्भवादी वेगळ्या राज्याच्या निर्मितीची आवश्यकता का आहे हे सांगत आहे, त्याच धर्तीवर वेगळे राज्य का सोईचे नाही या प्रश्नाची ठोस उत्तरे महाराष्ट्रवाद्यांकडून येताना दिसून येत नाहीत. केवळ आक्रमक भाषा वापरली आणि टीकाटिप्पणी केली की जनतेच्या शंकांचे समाधान होत नसते. लोकशाहीत प्रत्येकाचा आदर करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. राजद्रोहाची भाषा वापरणाºयांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र