शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पुन्हा भाजपा-सेनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 6:01 AM

भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही.

नागपूर संघभूमी. भाजपासाठी खरी कर्मभूमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शहर असल्यामुळे येथे होणाऱ्या भाजपाच्या जय-पराजयाची चर्चा राज्यासह देशभरात ठरलेलीच. त्यामुळेच नागपुरात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असो भाजपा नेते ती तेवढ्याच सिरियसली घेतात. त्यामुळेच निवडणूक लहान असली तरी पालकमंत्र्यांपासून ते आमदार, जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सारेच तुटून पडतात. पक्ष संघटनाही एखाद्या मिशनवर असल्यासारखी राबताना दिसते. तर ताकदीने कमी असलेली शिवसेनाही निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावून लढते. भाजपा व सेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले की मतदारांचे तिसऱ्याकडे लक्षच जात नाही. असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या वानाडोंगरी व पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात पहायला मिळाले. वानाडोंगरीमध्ये कमळ फुलले तर पारशिवनीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण उंचावला. गेल्या दीड वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी शेतकºयांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांचा आगडोंब माजवत भाजपाविरोधात रोष तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वानाडोंगरीच्या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला. राष्ट्रवादीला जनाधार दिसत असतानाही निकाल पूर्णपणे विरोधात गेला. खरे तर भाजपा-सेनेला रोखून धरत आगामी निवडणुकीत आम्हीच बाजी मारू, असा संदेश देण्याची चांगली संधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. मात्र, पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचा फटका पक्षाला बसला. वानाडोंगरीत काँग्रेसशी आघाडी झाली खरी परंतु काही नेत्यांनी त्यात बिघाडी करण्याचेच काम जास्त केले. पारशिवनीत तर आघाडीचे प्रयत्नच अपयशी ठरले. काँग्रेसने रणनीती आखली खरी मात्र नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकांनी तिकीट न मिळण्याच्या भीतीने आधीच बंडखोरी केली. भाजपाने काँग्रेसमधील तोडीचे उमेदवार उचलले व कमळावर लढविले. याचा नेमका फायदा भाजपाला झाला. शिवसेना बºयापैकी जिवंत असलेल्या रामटेक विधानसभेअंतर्गत येणाºया या नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जात बाजी मारली. नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोकळे झाले. मात्र, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना मागे खेचण्यासाठी काय काय खेळ खेळल्या गेले यावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. लोकसभा आणि विधानसभेचे घोडामैदान जवळ आहे. फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भाजपाची फौज कंबर कसून तयार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच हेवेदावे बाजूला सारून गटापेक्षा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले नाही तर सर्वांवरच घरी बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक