शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

बेपर्वाईचे बळी! औद्योगिक वसाहतींमधून मध्यवर्ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित व्हायला हवी, तरच अशा दुर्घटना टाळता  येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:02 IST

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत हँडग्लोव्ह्ज बनविणाऱ्या एका कंपनीत आग लागून सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे एकाच महिन्यातील ही तीन उदाहरणे ठळकपणे समोर आली. 

राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये आग आणि स्फोटाच्या घटना होऊन कामगारांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सोलर इंडस्ट्रीज या स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन नऊ कामगारांचा बळी गेला.  त्याआधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये  तळवडे येथे फटाका गुदामाला आग लागून सहा जणांचा कोळसा झाला. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत हँडग्लोव्ह्ज बनविणाऱ्या एका कंपनीत आग लागून सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे एकाच महिन्यातील ही तीन उदाहरणे ठळकपणे समोर आली. 

वाळूजमधील औद्योगिक वसाहतीत रात्री दीड वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली. चार कामगार कसेबसे झाडावरून उड्या घेत सुखरूप बाहेर पडले. इतर सहा जणांना मात्र आग आणि धूर यामध्ये कोंडी होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला. औद्योगिक वसाहतींमधील अशा घटनांमध्ये सामान्यपणे गरीब कामगारांचा बळी जातो आणि त्यावर तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त होते. यापलीकडे जाऊन राज्याचा उद्योग विभाग आणि एमआयडीसी, औद्योगिक संघटना आणि कामगार युनियन यांच्याकडून औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याबाबत गांभीर्याने चर्चा होत आहे, असे चित्र नाही. औद्योगिक कंपन्यांत स्फोट आणि आग लागण्याच्या घटनांमुळे अनेक कामगार-कर्मचारी जखमी होत असतात. 

मानवी चुकांमुळे काही घटना घडतात, हे मान्य केले तरी अनेक कंपन्यांत सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याकडे झालेले दुर्लक्षही अशा घटनांना कारणीभूत ठरते. कामगार उपायुक्त कार्यालय, एमआयडीसी आणि औद्योगिक सुरक्षा यांचे दुर्लक्ष अशा गोष्टींना कारणीभूत ठरते. औद्योगिक वसाहतींमधील आगीचे किंवा स्फोटाचे प्रमाण पाहता त्याची टक्केवारी कमीच असल्याचे दिसून येईल. सरकार आणि औद्योगिक संघटनाही तो आकडा समोर ठेवतील. मात्र, अशा घटनांमधील भीषणता पाहिल्यास अशा घटना घडू नयेत म्हणून आणखी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. २०१६ साली शासनाने औद्योगिक वसाहतींमधील इन्स्पेक्टर राज संपविण्याच्या दृष्टीने कंपन्यांना होणारा अनावश्यक त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपन्यांचा हा त्रास कमी करण्याच्या प्रयोगात उद्योगांची औद्योगिक सुरक्षा पणाला (प्राणाला) लावली जात नाही ना, याचाही विचार करणे आवश्यक आहे. मुळात आपल्या औद्योगिक कल्चरमध्ये सुरक्षेचे महत्त्व नाही. 

औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी लहान कंपन्या खर्च परवडत नाही म्हणून दुर्लक्ष करतात. औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा ‘व्हिजिलन्स’ अशा ठिकाणी कमी पडल्यास अशा दुर्घटना होण्याची शक्यता असते. वाळूजमधील सनशाईन कंपनीकडे फायर सेफ्टी किंवा इमारत भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचे दिसत आहे. इमारतीला एकच एन्ट्री व तेच ‘एक्झिट’ होते. त्यामुळे अशा ठिकाणी कामगार अडकून सहा जणांना जीव गमवावा लागला. कंपनी मालकाचा निष्काळजीपणा कामगारांच्या जिवावर बेतला. राज्यातील जवळपास सर्वच मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये परराज्यातून आलेले कामगार काम करत असतात. त्यांच्या मेहनतीचा हातभार आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीला लागलेला असतो. 

त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. शिवाय अशा औद्योगिक अपघातात मृत्यूंची संख्या वाढत चालल्यास राज्याच्या औद्योगिक क्षेत्राची ती बदनामीच ठरू शकेल. औद्योगिक सुरक्षा आणि कामगार प्रशिक्षण या विषयावर कामगार युनियनही आग्रही राहत नसल्याची परिस्थिती आहे. औद्योगिक क्षेत्रातील मृत्यू रोखायचे असतील सुरक्षा यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर घेणे आवश्यक आहे. 

२० पेक्षा कमी कामगार आहेत, असे सांगून अनेक कंपन्या तपास यंत्रणांच्या तपासापासून आपला बचाव करू पाहतात. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे सर्वच कंपन्यांना लागू असलेल्या सेफ्टी नाॅर्म्सचाही विचार करण्याची गरज आहे. कंपन्यांच्या उत्पादनानुसार त्याची विभागणी करून त्यासाठी कॅटेगरी तयार करण्याची गरज औद्योगिक संघटनांकडून व्यक्त होत आहे. ‘१० किलोमीटरवर ‘यू-टर्न’ दिल्यास लोक दुभाजक फोडणारच’ अशीच स्थिती औद्योगिक सुरक्षेबाबत झाली आहे. बड्या कंपन्यांना सर्व प्रकारच्या औद्योगिक सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात काही अडचणी येत नाहीत. मात्र, छोट्या कंपन्यांना ही अडचण येऊ शकते. यासाठी औद्योगिक वसाहतींमधून मध्यवर्ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित व्हायला पाहिजे. तरच अशा दुर्घटना टाळता  येतील. 

टॅग्स :fireआगMIDCएमआयडीसी