शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

बहुत जाहले संशोधक त्यावर गुरूंची करामत

By सुधीर महाजन | Published: January 09, 2020 9:01 AM

पीएच. डी. च्या गोरखधंद्याला कुलगुरूंची वेसण

- सुधीर महाजन

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठा तेथे होणारे संशोधन आणि प्रसिद्ध होणारे प्रबंध यावर ठरतो. पीएच.डी. होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या विद्यापीठाची गुणवत्ता दर्शविते, असा तुमचा समज असेल, तर तो गैरसमज ठरतो. कारण या पदवीचाही गोरखधंदा जोरात आहे आणि याच पीएच.डी. प्रकरणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. नव्यानेच आलेले कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांनी या पदवीची गुणवत्ता वाढविण्यासाठी पीएच.डी. संशोधक मार्गदर्शकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि हेच प्राध्यापकांमधील अस्वस्थेचे कारण ठरले आणि त्यामुळेच कुलगुरू आणि संघटना यांच्यात संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन केंद्रात दोन पूर्ण वेळ प्राध्यापक, तसेच अद्ययावत ग्रंथालय, संदर्भाच्या सुविधा, प्रयोगशाळा आवश्यक आहेत. आता हा नियम मराठवाड्यात लागू करायचा, तर अनेकांची ‘गाईडशिप’ रद्द होते. त्यातूनच ही अस्वस्थता निर्माण झाली. कारण असे निकष पूर्ण करण्याऱ्या महाविद्यालयांची आणि संशेधक मार्गदर्शक प्राध्यापकांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहे.

पीएच.डी.च्या बाबतीत या विद्यापीठातील वास्तवावर प्रकाश टाकला, तर अनागोंदीच्या कारभार दिसतो. पीएच.डी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा असते, जी की विद्यापीठाने वर्षातून दोन वेळा घ्यायला हवी; परंतु गेल्या चार वर्षांपासून अशी परीक्षाच झालेली नाही. २०१६ साली जाहिरात देऊन परीक्षा घेतली; पण तिचा निकाल अजून लागायचा आहे आणि ती प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. शेजारच्याच नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठात ही पूर्ण प्रक्रिया दीड महिन्यात मार्गी लावली जाते; पण या विद्यापीठाने चार वर्षांतही ती पूर्ण न करण्याचा विक्रम केला. हा गोंधळ येथेच संपत नाही, तर विद्यापीठात नेमके किती संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक आहेत, किती विद्यार्थी संशोधन करीत आहेत याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

एक मार्गदर्शक प्राध्यापक जास्तीत जास्त आठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असू शकतो; पण एकाच वेळी पंचवीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा विक्रम करणारे प्राध्यापक येथे आहेत. एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ७० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळविण्यासारख्या सुरस कथा आहेत. उदंड झाले संशोधक, अशी अवस्था असल्याने पीएच.डी. पदवी जी खिरापतीसारखी वाटल्याने तिचे महत्त्वच कमी झाले. याशिवाय संशोधनाचा दर्जाही सुमार झाला. ‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ याप्रमाणे पीएच.डी. कोणीही मिळवतो. त्यातून असे पीएच.डी. करवून देणाऱ्यांची टोळीच कार्यरत असून, जी ‘सुपारी’ घेऊन तुम्हाला पदवी मिळवून देते. अगदी शेवटी परीक्षकही मॅनेज करते. म्हणजे पीएच.डी.चे मॅनेजमेंट असे नवेच अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र या विद्यापीठात जन्माला आले. 

नव्यानेच आलेल्या कुलगुरूंनी नेमकी ही दुखती नस आवळली आली आणि गटातटांत विभागले गेलेले प्राध्यापक ‘समान ध्येयाने’ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वी विद्यापीठाने नियमावली तयार केली होती; परंतु प्राध्यापक संघटनांनी दबाव आणून त्यात बदल करून घेतला. इकडे कुलगुरू नियमांच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी