शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वंदे भारत! प्रवासाचा राजेशाही थाट; आकर्षक रचना, वेगवान प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 06:54 IST

अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय उपखंडाला जोडणारी, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक असलेली भारतीय रेल्वे ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब. दीड- एक शतकापूर्वी सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास आता राजेशाही थाटापर्यंत येऊन पोहोचला आहे. वंदे भारत हा बदलत्या भारताचा चेहरा आहे...

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक  

शाळेत असताना हिंदी वा मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंधासाठी हमखास एक विषय असायचा, तो म्हणजे ‘रेल्वे स्टेशन पर एक घंटा’ किंवा ‘माझा रेल्वे प्रवास’. प्रवासवर्णनाच्या या दोन्ही विषयांवर निबंध लिहिताना रेल्वे स्टेशनवर मला काय चित्र दिसले किंवा रेल्वे प्रवासात मला काय अनुभव आले, यावर शब्दांचे मळे फुलवावे लागत असत. मग, त्यात रेल्वेचा प्रवास कुठून कुठपर्यंत होता, डब्यातील रंगसंगती, बसण्याची जागा, खिडक्या, दरवाजे, प्रवासी, वाटेत लागलेली स्टेशन्स इत्यादींचे वर्णन हटकून या निबंधात असायचे. तसा सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच छापाचा हा निबंध असायचा. याला कारण रेल्वे प्रवासातील रटाळपणा. त्यात तथ्यांशही असायचे, कारण एरवी रेल्वेप्रवास तसा रटाळच. फक्त त्याची लांबी तुमच्या प्रवासाच्या कालावधीनुसार कमी- अधिक होते इतकेच.  

रेल्वे प्रवासाचे हे चित्र गेल्या दशकात झपाट्याने बदलले. आता तर विमान प्रवासाची अनुभूती देणाऱ्या गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. त्यातले अगदी अलीकडचे नाव म्हणजे वं...दे...भा...र...त... काय आहे असे या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये?

वेगवान प्रवासप्रत्येकाला वेगाचे आकर्षण असते. त्यामुळे कोणत्याही वेगवान वस्तूकडे मानवी मन चटकन लक्ष वेधून घेते. वंदे भारत इतर गाड्यांपेक्षा वेगाने धावू शकते.  वंदे भारत मालिकेतील एक्स्प्रेस गाड्या प्रसंगी १८० किमी प्रतितास एवढा वेग गाठण्याची क्षमता राखतात. 

आकर्षक रचना 

वंदे भारतचा यूएसपी (युनिक सेलिंग पॉइंट) म्हणजे तिची आकर्षक रचना. इंजिनापासूनच त्याची सुरुवात होते. इंजिनाचे तोंड जेवढे निमुळते तेवढी त्याची वारा कापण्याची क्षमता जास्त, हा वायुगतिशास्त्राचा नियम आहे. हा विचार करूनच वंदे भारतच्या इंजिनाचा आकार बदलण्यात आला आहे. डब्यांची नवीन रचना, हवेशीर मोकळे डबे, शिवाय त्या जोडीला मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता, खानपान सेवेसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग, स्वच्छतागृहांची पाश्चिमात्य रचना असा सर्व जामानिमा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनुभवायला मिळतो. 

चार वर्षे पूर्णवंदे भारतची चाचणी २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस रुळांवर धावली. त्यास नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. आता देशभरात १० वंदे भारत गाड्या धावत आहेत. नजीकच्या काळात ४०० वंदे भारत गाड्या चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्धार आहे. 

काटेकोर वेळभारतीय रेल्वे आणि घड्याळ यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असा समज आता इतिहासजमा झाला आहे. बहुतांश रेल्वेगाड्या आता त्यांच्या पूर्वनिर्धारित वेळेनुसारच गंतव्या ठिकाणावर पोहोचतात. वंदे भारतही त्यास अपवाद नाही. 

व्हीबी १ आणि व्हीबी २ : या दोन्ही सीरिजमधील वंदे भारत गाड्या ५४ सेकंदात १०० किमी प्रतितास हा वेग गाठू शकतात.

व्हीबी ३ : या मालिकेतील वंदे भारतचा स्पीड १८० ते २०० किमी प्रतितास एवढा असेल.

व्हीबी ४ : या गाडीचा वेग २०० किमी प्रतितास याहून अधिक असेल. 

मेक इन इंडिया या अभियानांतर्गत चेन्नईतील आयसीएफमध्ये वंदे भारतची निर्मिती सुरू झाली. सद्य:स्थितीत देशभरात १० वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. दिल्ली-वाराणसी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस १७ फेब्रुवारी २०१९ रोजी धावली. वंदे भारतची चाचणी प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाली.  सुरुवातीला या गाडीचे नाव ‘ट्रेन १८’ होते. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस