शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

वंदे भारत! प्रवासाचा राजेशाही थाट; आकर्षक रचना, वेगवान प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 06:54 IST

अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय उपखंडाला जोडणारी, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक असलेली भारतीय रेल्वे ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब. दीड- एक शतकापूर्वी सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास आता राजेशाही थाटापर्यंत येऊन पोहोचला आहे. वंदे भारत हा बदलत्या भारताचा चेहरा आहे...

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक  

शाळेत असताना हिंदी वा मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंधासाठी हमखास एक विषय असायचा, तो म्हणजे ‘रेल्वे स्टेशन पर एक घंटा’ किंवा ‘माझा रेल्वे प्रवास’. प्रवासवर्णनाच्या या दोन्ही विषयांवर निबंध लिहिताना रेल्वे स्टेशनवर मला काय चित्र दिसले किंवा रेल्वे प्रवासात मला काय अनुभव आले, यावर शब्दांचे मळे फुलवावे लागत असत. मग, त्यात रेल्वेचा प्रवास कुठून कुठपर्यंत होता, डब्यातील रंगसंगती, बसण्याची जागा, खिडक्या, दरवाजे, प्रवासी, वाटेत लागलेली स्टेशन्स इत्यादींचे वर्णन हटकून या निबंधात असायचे. तसा सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच छापाचा हा निबंध असायचा. याला कारण रेल्वे प्रवासातील रटाळपणा. त्यात तथ्यांशही असायचे, कारण एरवी रेल्वेप्रवास तसा रटाळच. फक्त त्याची लांबी तुमच्या प्रवासाच्या कालावधीनुसार कमी- अधिक होते इतकेच.  

रेल्वे प्रवासाचे हे चित्र गेल्या दशकात झपाट्याने बदलले. आता तर विमान प्रवासाची अनुभूती देणाऱ्या गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. त्यातले अगदी अलीकडचे नाव म्हणजे वं...दे...भा...र...त... काय आहे असे या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये?

वेगवान प्रवासप्रत्येकाला वेगाचे आकर्षण असते. त्यामुळे कोणत्याही वेगवान वस्तूकडे मानवी मन चटकन लक्ष वेधून घेते. वंदे भारत इतर गाड्यांपेक्षा वेगाने धावू शकते.  वंदे भारत मालिकेतील एक्स्प्रेस गाड्या प्रसंगी १८० किमी प्रतितास एवढा वेग गाठण्याची क्षमता राखतात. 

आकर्षक रचना 

वंदे भारतचा यूएसपी (युनिक सेलिंग पॉइंट) म्हणजे तिची आकर्षक रचना. इंजिनापासूनच त्याची सुरुवात होते. इंजिनाचे तोंड जेवढे निमुळते तेवढी त्याची वारा कापण्याची क्षमता जास्त, हा वायुगतिशास्त्राचा नियम आहे. हा विचार करूनच वंदे भारतच्या इंजिनाचा आकार बदलण्यात आला आहे. डब्यांची नवीन रचना, हवेशीर मोकळे डबे, शिवाय त्या जोडीला मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता, खानपान सेवेसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग, स्वच्छतागृहांची पाश्चिमात्य रचना असा सर्व जामानिमा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनुभवायला मिळतो. 

चार वर्षे पूर्णवंदे भारतची चाचणी २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस रुळांवर धावली. त्यास नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. आता देशभरात १० वंदे भारत गाड्या धावत आहेत. नजीकच्या काळात ४०० वंदे भारत गाड्या चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्धार आहे. 

काटेकोर वेळभारतीय रेल्वे आणि घड्याळ यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असा समज आता इतिहासजमा झाला आहे. बहुतांश रेल्वेगाड्या आता त्यांच्या पूर्वनिर्धारित वेळेनुसारच गंतव्या ठिकाणावर पोहोचतात. वंदे भारतही त्यास अपवाद नाही. 

व्हीबी १ आणि व्हीबी २ : या दोन्ही सीरिजमधील वंदे भारत गाड्या ५४ सेकंदात १०० किमी प्रतितास हा वेग गाठू शकतात.

व्हीबी ३ : या मालिकेतील वंदे भारतचा स्पीड १८० ते २०० किमी प्रतितास एवढा असेल.

व्हीबी ४ : या गाडीचा वेग २०० किमी प्रतितास याहून अधिक असेल. 

मेक इन इंडिया या अभियानांतर्गत चेन्नईतील आयसीएफमध्ये वंदे भारतची निर्मिती सुरू झाली. सद्य:स्थितीत देशभरात १० वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. दिल्ली-वाराणसी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस १७ फेब्रुवारी २०१९ रोजी धावली. वंदे भारतची चाचणी प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाली.  सुरुवातीला या गाडीचे नाव ‘ट्रेन १८’ होते. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस