शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनविद्या’च्या समग्र तत्त्वज्ञानाचे प्रसारक वामनराव पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:26 IST

‘विश्वातील प्रत्येक माणूस हा एखाद्या हारात गुंफलेल्या फुलाप्रमाणे एकमेकांशी जोडलेला असून, एका व्यक्तीच्या सुख किंवा दु:खाचा परिणाम सर्व जगावर होतो

‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर ते ते सर्व मला मिळावे’, अशी धारणा तर प्रत्येक मनुष्याची असते. मात्र, हे ‘सर्वांना’ मिळावे अशी धारणा असलेला ‘खरा माणूस’ निर्माण करण्याचे काम वामनराव पै यांनी केले आहे. आज (शुक्रवार) त्यांचा आठवा स्मृतिदिन त्यांचे सर्व साधक ‘पुण्यस्मरण दिवस’ म्हणून साजरा करीत आहेत.

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य संदेशासाठी सर्व समाज त्यांना ओळखतो. त्यांच्या ह्या एका वाक्यातून अनेकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली; पण हे वाक्य सांगून न राहता त्यामागे वामनराव यांनी ‘जीवनविद्या’ नावाचे समग्र तत्त्वज्ञान उभे केले व संपूर्ण हयात ग्रंथ व प्रवचनातून लोकांपर्यंत पोहोचविले. आज समाजमनाचे चांगले पोषण होण्यासाठी हे तत्त्वज्ञान शाळा, महाविद्यालयांतून तरुणांना दिले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या विकासाला विवेकाची जोड मिळेल अन्यथा हा विकास हा भकास झाल्याशिवाय राहणार नाही.

हा अध्यात्माचा प्रांत, हा विज्ञानाचा प्रांत अशा सीमा न आखता वामनराव पै यांनी अध्यात्मातील विज्ञानच जगासमोर आणले. येथे अखिल मानवजातीचा विचार असल्याने जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन विश्वमानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ह्या ज्ञानात आहे. त्यांनी आपल्या लेखनातून व प्रवचनातून अध्यात्मासारखा अत्यंत बोजड विषय सोपा करून सांगितला. परिणामी त्यांचे विचार तरुणांना विशेष आकर्षित करू लागले. म्हणूनच ‘अध्यात्मविद्या विद्यानाम’ या गीतेतील उक्तीप्रमाणे श्रेष्ठ असणारे अध्यात्म शिकावे ते वामनरावांकडूनच.व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या प्रत्येक स्तरावर विचार करून लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथात मानवजातीच्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे.

‘विश्वातील प्रत्येक माणूस हा एखाद्या हारात गुंफलेल्या फुलाप्रमाणे एकमेकांशी जोडलेला असून, एका व्यक्तीच्या सुख किंवा दु:खाचा परिणाम सर्व जगावर होतो’ ह्या त्यांच्या सिद्धांताचा अनुभव आज संपूर्ण मानवजातीला येत आहे. ‘कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारताने जागतिक पातळीवर बजाविलेली भूमिका आणि त्यानंतर ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्याची पंतप्रधानांची घोषणा यातून वामनराव पै यांच्या ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे!’ हा दिव्य संकल्प साकार होतानाचे चित्र उभे करतो आहे.’ म्हणून विश्वकल्याणाचा ध्यास घेऊन ‘विश्वप्रार्थना’ निर्माण करणारे वामनराव पै हे खºया अर्थाने ‘विश्वसंत’ होते. त्यांची संकल्पना मग ती धर्माची असो किंवा परमेश्वराची, त्याला एक व्यापक व वैज्ञानिक अधिष्ठान आहे. ह्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास व्हायला हवा. समाजातील सर्व विचारवंतांनी हे ‘अमृत’ मंथनासाठी घ्यायला हवे, अन्यथा मराठीतील हा अनमोल ठेवा इतर संतसाहित्याप्रमाणे केवळ कीर्तन, प्रवचनाचा विषय बनून राहील. मात्र, वामनरावांची ह्या विचारांची ताकद केवळ वाचनाने किंवा चिंतनाने कळणार नाही, तर त्यासाठी त्यांचा अनुभवच घ्यायला हवा. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे त्यांच्या विचारांचाच आरसा आहे.

निरपेक्ष भावना हाही एक वामनराव पै यांचा विशेष पैलू होता. एका व्यक्तीने सद्गुरूंना घरी येण्याची विनंती केली. त्याला सद्गुरू लगेच हो म्हणाले. त्यानंतर त्या माणसाने तेथील सचिवाकडे चौकशी केली की, बोलीचे पैसे किती? पण त्याला ज्यावेळी समजले की, सद्गुरू पैसे घेतच नाहीत आणि जीवनविद्येमध्ये बोली हा प्रकारच नाही, तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

दर्शनासाठी, समुपदेशनासाठी पैसे नाहीत, यावर त्याचा विश्वास बसेना. ते नेहमी म्हणत की, हे पै तुम्हाला जे करायला सांगतात, त्यासाठी ‘पै’चाही खर्च नाही. शिवाय या सर्वांतून काही प्रसिद्धी मिळवायची, संप्रदाय वाढवायचाय, शिष्यगण वाढवायचे आहेत, यातील एकही उद्देश नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी’- ते देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नाही. काही मिळावे म्हणून नाही तर सर्वकाही मिळाले आहे म्हणून. विशेष म्हणजे ते उत्तम क्रिकेट खेळायचे. अर्थात ते अष्टपैलू होते. बुद्धिबळामध्ये तर त्यांचे विशेष प्रावीण्य होते; पण ही सगळी वलयांकित क्षेत्रे सोडून ते समाजसेवेच्या क्षेत्रात आले. केवढा हा त्यांचा त्याग. सेवा जर निरपेक्ष भावनेने केली, तरच ती सेवा असे ते म्हणायचे. त्यांच्या ते आचरणातून दिसून येते.

अशा आदरणीय आणि आचरणीय युगपुरुषाचे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण हेच खºया अर्थाने ‘पुण्यस्मरण’ आहे असे म्हणायला हवे.