शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘जीवनविद्या’च्या समग्र तत्त्वज्ञानाचे प्रसारक वामनराव पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:26 IST

‘विश्वातील प्रत्येक माणूस हा एखाद्या हारात गुंफलेल्या फुलाप्रमाणे एकमेकांशी जोडलेला असून, एका व्यक्तीच्या सुख किंवा दु:खाचा परिणाम सर्व जगावर होतो

‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर ते ते सर्व मला मिळावे’, अशी धारणा तर प्रत्येक मनुष्याची असते. मात्र, हे ‘सर्वांना’ मिळावे अशी धारणा असलेला ‘खरा माणूस’ निर्माण करण्याचे काम वामनराव पै यांनी केले आहे. आज (शुक्रवार) त्यांचा आठवा स्मृतिदिन त्यांचे सर्व साधक ‘पुण्यस्मरण दिवस’ म्हणून साजरा करीत आहेत.

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य संदेशासाठी सर्व समाज त्यांना ओळखतो. त्यांच्या ह्या एका वाक्यातून अनेकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली; पण हे वाक्य सांगून न राहता त्यामागे वामनराव यांनी ‘जीवनविद्या’ नावाचे समग्र तत्त्वज्ञान उभे केले व संपूर्ण हयात ग्रंथ व प्रवचनातून लोकांपर्यंत पोहोचविले. आज समाजमनाचे चांगले पोषण होण्यासाठी हे तत्त्वज्ञान शाळा, महाविद्यालयांतून तरुणांना दिले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या विकासाला विवेकाची जोड मिळेल अन्यथा हा विकास हा भकास झाल्याशिवाय राहणार नाही.

हा अध्यात्माचा प्रांत, हा विज्ञानाचा प्रांत अशा सीमा न आखता वामनराव पै यांनी अध्यात्मातील विज्ञानच जगासमोर आणले. येथे अखिल मानवजातीचा विचार असल्याने जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन विश्वमानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ह्या ज्ञानात आहे. त्यांनी आपल्या लेखनातून व प्रवचनातून अध्यात्मासारखा अत्यंत बोजड विषय सोपा करून सांगितला. परिणामी त्यांचे विचार तरुणांना विशेष आकर्षित करू लागले. म्हणूनच ‘अध्यात्मविद्या विद्यानाम’ या गीतेतील उक्तीप्रमाणे श्रेष्ठ असणारे अध्यात्म शिकावे ते वामनरावांकडूनच.व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या प्रत्येक स्तरावर विचार करून लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथात मानवजातीच्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे.

‘विश्वातील प्रत्येक माणूस हा एखाद्या हारात गुंफलेल्या फुलाप्रमाणे एकमेकांशी जोडलेला असून, एका व्यक्तीच्या सुख किंवा दु:खाचा परिणाम सर्व जगावर होतो’ ह्या त्यांच्या सिद्धांताचा अनुभव आज संपूर्ण मानवजातीला येत आहे. ‘कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारताने जागतिक पातळीवर बजाविलेली भूमिका आणि त्यानंतर ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्याची पंतप्रधानांची घोषणा यातून वामनराव पै यांच्या ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे!’ हा दिव्य संकल्प साकार होतानाचे चित्र उभे करतो आहे.’ म्हणून विश्वकल्याणाचा ध्यास घेऊन ‘विश्वप्रार्थना’ निर्माण करणारे वामनराव पै हे खºया अर्थाने ‘विश्वसंत’ होते. त्यांची संकल्पना मग ती धर्माची असो किंवा परमेश्वराची, त्याला एक व्यापक व वैज्ञानिक अधिष्ठान आहे. ह्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास व्हायला हवा. समाजातील सर्व विचारवंतांनी हे ‘अमृत’ मंथनासाठी घ्यायला हवे, अन्यथा मराठीतील हा अनमोल ठेवा इतर संतसाहित्याप्रमाणे केवळ कीर्तन, प्रवचनाचा विषय बनून राहील. मात्र, वामनरावांची ह्या विचारांची ताकद केवळ वाचनाने किंवा चिंतनाने कळणार नाही, तर त्यासाठी त्यांचा अनुभवच घ्यायला हवा. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे त्यांच्या विचारांचाच आरसा आहे.

निरपेक्ष भावना हाही एक वामनराव पै यांचा विशेष पैलू होता. एका व्यक्तीने सद्गुरूंना घरी येण्याची विनंती केली. त्याला सद्गुरू लगेच हो म्हणाले. त्यानंतर त्या माणसाने तेथील सचिवाकडे चौकशी केली की, बोलीचे पैसे किती? पण त्याला ज्यावेळी समजले की, सद्गुरू पैसे घेतच नाहीत आणि जीवनविद्येमध्ये बोली हा प्रकारच नाही, तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

दर्शनासाठी, समुपदेशनासाठी पैसे नाहीत, यावर त्याचा विश्वास बसेना. ते नेहमी म्हणत की, हे पै तुम्हाला जे करायला सांगतात, त्यासाठी ‘पै’चाही खर्च नाही. शिवाय या सर्वांतून काही प्रसिद्धी मिळवायची, संप्रदाय वाढवायचाय, शिष्यगण वाढवायचे आहेत, यातील एकही उद्देश नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी’- ते देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नाही. काही मिळावे म्हणून नाही तर सर्वकाही मिळाले आहे म्हणून. विशेष म्हणजे ते उत्तम क्रिकेट खेळायचे. अर्थात ते अष्टपैलू होते. बुद्धिबळामध्ये तर त्यांचे विशेष प्रावीण्य होते; पण ही सगळी वलयांकित क्षेत्रे सोडून ते समाजसेवेच्या क्षेत्रात आले. केवढा हा त्यांचा त्याग. सेवा जर निरपेक्ष भावनेने केली, तरच ती सेवा असे ते म्हणायचे. त्यांच्या ते आचरणातून दिसून येते.

अशा आदरणीय आणि आचरणीय युगपुरुषाचे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण हेच खºया अर्थाने ‘पुण्यस्मरण’ आहे असे म्हणायला हवे.