शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शेती जगविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:30 IST

येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर(संगणक साक्षरता प्रसारक)येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे. म्हणजेच शेती, पर्यावरण व व्यावसायिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचे अभिनव मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड घालून पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमीतकमी कसा करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण या ऊर्जास्रोतांचे साठे कमी होत आहेत. सर्वच देशांमध्ये पर्यावरणपूरक चळवळी जोर धरू लागल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ ऊर्फ हरित-माहिती तंत्रज्ञान असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा पहिला परिणाम शेतीवर होतो हे आपणाला माहीतच आहे. बरे शेतीला पाणी तर द्यावेच लागते. परंतु या पाणीवापराचे प्रमाण आवश्यक तितकेच ठेवणे, पाणी वाया जाणे टाळणे, विजेचे बिल मर्यादेत ठेवणे आणि तरीही दुष्काळ, पूर आणि एकंदर लहरी हवामानाला तोंड देणे या बाबी शेतकºयाच्या आवाक्यात आल्या आहेत.माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणाºया ‘डेटा गॅदरिंग टेक्नॉलॉजीमुळे’ हे शक्य झाले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया संस्थानातल्या शेतकºयांना गेली काही वर्षे सतत अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे (होय, अमेरिकेत देखील शेतकºयाचे प्राण कंठाशी येतील असा दुष्काळ पडतो. निसर्गापुढे सगळे सारखेच!). त्यांच्या मदतीसाठी जॉर्जिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली बनवली आहे. यासाठी त्यांनी कमी खर्चाचे, मर्यादित क्षमतेचे सेन्सर आणि जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम)चा वापर केला आहे.पीव्हीसी पाइपमध्ये बसवलेले हे सेन्सर संबंधित शेतजमिनीत विविध ठिकाणी वेगवेगळ््या खोलीवर पुरून ठेवले जातात. ते तिथे बसून मातीचे तापमान आणि तीमधील आर्द्रतेच्या प्रमाणाची माहिती गोळा करतात आणि पाइपमधील एँटेनाच्या साहाय्याने संगणकाकडे प्रक्षेपित करतात. संगणकाच्या पडद्यासमोर बसलेले शेतीतज्ज्ञ या माहितीचे विश्लेषण करून त्या जमिनीला केव्हा व किती पाणी द्यावे हे सांगतात.त्यामुळे तेथील शेतकºयांचे दोन-तीन फायदे होतात. पाणी, तसेच ते पुरवणाºया मोटरला पुरवावी लागणारी वीज वाचते हा फायदा तर उघड आहे. दुसरे असे की त्यांना घरापासून शेताच्या प्रत्येक कोपºयात जाऊन मोटर चालू वा बंद करावी लागत नाही. परिणामी वेळ व इंधनखर्च वाचतो. शिवाय पिकाला जरुरीइतकेच पाणी मिळाल्याने अति-किंवा कमी-पाण्यामुळे त्यावर होणारे दुष्परिणाम टळून धान्य वाया जाण्याचे प्रमाण घटते.जॉर्जिया विद्यापीठाने यापूर्वी अशा इतरही प्रणाली विकसित केल्या आहेत - उदा. कमी दाबावर चालणारी तरीही जास्त अंतरावर पाणी फेकणारी ‘स्प्रिंकलर सिस्टीम’ ऊर्फ तुषार-सिंचन पद्धत (यामुळे वाºयामुळे तसेच बाष्पीभवनाने पाणी वाया जाणे कमी होते), किंवा पाणी नक्की कोठे पडते आहे हे तपासणारे संवेदक (हे प्रत्येक तोटीवर लावता येतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तोटी वळवून हवे तिथेच पाणी फवारले जाते). या नव्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्या पद्धतींसोबत केला जात आहे. जॉर्जिया, कान्सास आणि नेब्रास्का या तीन दुष्काळप्रवण संस्थानांमध्ये या प्रणालीचा यशस्वी वापर होतो आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी