शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

शेती जगविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:30 IST

येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर(संगणक साक्षरता प्रसारक)येत्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची, नवनिर्मितीशी संलग्न असलेली, अर्थक्रांती (इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी) होणार आहे. म्हणजेच शेती, पर्यावरण व व्यावसायिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचे अभिनव मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड घालून पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमीतकमी कसा करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण या ऊर्जास्रोतांचे साठे कमी होत आहेत. सर्वच देशांमध्ये पर्यावरणपूरक चळवळी जोर धरू लागल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ ऊर्फ हरित-माहिती तंत्रज्ञान असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचा पहिला परिणाम शेतीवर होतो हे आपणाला माहीतच आहे. बरे शेतीला पाणी तर द्यावेच लागते. परंतु या पाणीवापराचे प्रमाण आवश्यक तितकेच ठेवणे, पाणी वाया जाणे टाळणे, विजेचे बिल मर्यादेत ठेवणे आणि तरीही दुष्काळ, पूर आणि एकंदर लहरी हवामानाला तोंड देणे या बाबी शेतकºयाच्या आवाक्यात आल्या आहेत.माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणाºया ‘डेटा गॅदरिंग टेक्नॉलॉजीमुळे’ हे शक्य झाले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया संस्थानातल्या शेतकºयांना गेली काही वर्षे सतत अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे (होय, अमेरिकेत देखील शेतकºयाचे प्राण कंठाशी येतील असा दुष्काळ पडतो. निसर्गापुढे सगळे सारखेच!). त्यांच्या मदतीसाठी जॉर्जिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली बनवली आहे. यासाठी त्यांनी कमी खर्चाचे, मर्यादित क्षमतेचे सेन्सर आणि जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम)चा वापर केला आहे.पीव्हीसी पाइपमध्ये बसवलेले हे सेन्सर संबंधित शेतजमिनीत विविध ठिकाणी वेगवेगळ््या खोलीवर पुरून ठेवले जातात. ते तिथे बसून मातीचे तापमान आणि तीमधील आर्द्रतेच्या प्रमाणाची माहिती गोळा करतात आणि पाइपमधील एँटेनाच्या साहाय्याने संगणकाकडे प्रक्षेपित करतात. संगणकाच्या पडद्यासमोर बसलेले शेतीतज्ज्ञ या माहितीचे विश्लेषण करून त्या जमिनीला केव्हा व किती पाणी द्यावे हे सांगतात.त्यामुळे तेथील शेतकºयांचे दोन-तीन फायदे होतात. पाणी, तसेच ते पुरवणाºया मोटरला पुरवावी लागणारी वीज वाचते हा फायदा तर उघड आहे. दुसरे असे की त्यांना घरापासून शेताच्या प्रत्येक कोपºयात जाऊन मोटर चालू वा बंद करावी लागत नाही. परिणामी वेळ व इंधनखर्च वाचतो. शिवाय पिकाला जरुरीइतकेच पाणी मिळाल्याने अति-किंवा कमी-पाण्यामुळे त्यावर होणारे दुष्परिणाम टळून धान्य वाया जाण्याचे प्रमाण घटते.जॉर्जिया विद्यापीठाने यापूर्वी अशा इतरही प्रणाली विकसित केल्या आहेत - उदा. कमी दाबावर चालणारी तरीही जास्त अंतरावर पाणी फेकणारी ‘स्प्रिंकलर सिस्टीम’ ऊर्फ तुषार-सिंचन पद्धत (यामुळे वाºयामुळे तसेच बाष्पीभवनाने पाणी वाया जाणे कमी होते), किंवा पाणी नक्की कोठे पडते आहे हे तपासणारे संवेदक (हे प्रत्येक तोटीवर लावता येतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तोटी वळवून हवे तिथेच पाणी फवारले जाते). या नव्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्या पद्धतींसोबत केला जात आहे. जॉर्जिया, कान्सास आणि नेब्रास्का या तीन दुष्काळप्रवण संस्थानांमध्ये या प्रणालीचा यशस्वी वापर होतो आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी