शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

सौरऊर्जेचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 04:00 IST

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दोन स्वतंत्र योजना आणल्या; एक सौरऊर्जायुक्त पंप आणि दुसरी सोलर फीडर्स.

-प्रो. प्रिया जाधवकाही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दोन स्वतंत्र योजना आणल्या; एक सौरऊर्जायुक्त पंप आणि दुसरी सोलर फीडर्स. पहिल्या योजनेत सौरऊर्जेवर चालणारे पंप शेतकºयांना सवलतीच्या दरात वितरित केले. या शेतकºयांना त्यामुळे वीजबिल येणार नाही आणि ते दिवसा आपले पंप चालवू शकतील. हा एक फायदा आहे कारण ग्रिडमधून वीजपुरवठा येणाºया शेतकºयांना आठवड्यातून काही दिवस रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जातो. याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळेचा वीजपुरवठा वीज वितरण कंपन्यांसाठी स्वस्त पडतो. परंतु रात्रीची वेळ शेतकºयांसाठी असुरक्षित आणि गैरसोयीचा आहे.हा सोडून आणखी एक आर्थिक मुद्दा महावितरणसाठी महत्त्वाचा ठरतो. प्रतियुनिट २ रुपये दराने शेतकºयांना वीजपुरवठा केला जातो. परंतु महावितरणला प्रतियुनिट ६ रुपयांचा खर्च येतो. सौरपंपांमुळे हे सबसिडीचे नुकसान कमी होईल. त्याऐवजी सरकारला आणि महावितरणला प्रति पंप ३ ते ७ लाख रुपये इतका एकरकमी खर्च येईल. मग पुढचा प्रश्न असा की, सगळेच पंप सोलारपंप का करत नाहीत?एकूण सर्व खर्चाचा विचार करता, सौरपंप ग्रिडपासून दूर असल्यास आणि वर्षभर सातत्याने वापरण्यात आल्यास, तो ग्रीडला जोडलेल्या पंपाच्या तुलनेत स्वस्त पडतो. महाराष्ट्रात सुमारे ४३ लाख इलेक्ट्रिक पंप आहेत आणि येथे ग्रिडचे नेटवर्क चांगल्या प्रकारे पसरले आहे. पुढे प्रांताच्या अनेक भागांमध्ये सिंचन वर्षातील काही विशिष्ट महिन्यांसाठीच ते आवश्यक आहेत. त्यामुळे सर्व सौरपंप लावणे खर्चीक ठरेल.२०१५ ते २०१७ साली मुख्यत: विदर्भासाठी सुमारे पाच लाख पंपांच्या एका योजनेची सरकारने घोषणा केली होती. नंतर मागणी कमी असल्यामुळे ७५०० पंपांवर ही योजना आणण्यात आली. त्याची काही कारणे आयआयटी बॉम्बेने केलेल्या एका संशोधनात आढळली. बुलडाणा आणि अकोल्यातील १० गावांमधील सौरपंप साइट्सवर सर्वेक्षण करण्यात आले आणि महावितरण अधिकारी, लाभार्थी आणि बिगर लाभार्थी शेतकºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या.पहिला मुद्दा म्हणजे ज्यांना पंप मिळाले होते ते आनंदात होते. पण अनेक शेतकºयांनी खालील कारणांमुळे अर्जच केला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे लाभार्थी शेतकºयांना दहा वर्षे वीज मंडळाकडून वीज जोडणी दिली जाणार नाही. ही अट बहुतेकांना खूपच जाचक वाटली. दुसरे म्हणजे या योजनेतून सौरपंपाची ५ वर्षांची देखरेख केली जाणार होती. पण त्यानंतर दुरुस्ती आणि देखरेखीसाठी स्थानिक स्तरावर माणसे मिळतील की नाही याची शेतकºयांना शंका होती. तिसरे म्हणजे, अनेक शेतकरी शेतांपासून दूर राहतात. पावसाळ्यात नासधूस होऊ नये, चोरीला जाऊ नये इत्यादी कारणांमुळे, शेतकरी बरेचदा पंप आणि इतर उपकरणे काढून घरी नेतात. सौरपंप दहा पट महागडे आहेत. शेतकºयांना जनावरे आणि पंपाचे नुकसान करणाºया किंवा चोरणाºया समाजकंटकांची भीती होती. चौथे म्हणजे काही शेतकºयांकडे सात-बारा स्वत:च्या नावाने नसल्यामुळे ते योजनेचा फायदा घेऊ शकले नाहीत. आजोबा किंवा वडिलांच्या नावाचा सात-बारा, कुटुंबातील अनेक समस्यांमुळे, शेतकºयाच्या नावावर केला नव्हता.या अभ्यासातून असाही निष्कर्ष काढण्यात आला की अनेक शेतकºयांना छोटे पंप चालले असते. या योजनेतील सर्वांत लहान पंप ३ एचपीचे होते. काही लाभार्थी शेतकरी दिवसातून फक्त ३० मिनिटे आपल्या यंत्रणा वापरत होते. विदर्भात पाण्याची कमी उपलब्धता लक्षात घेऊन, ५ एकर जमिनीसाठी, १ ते २ एचपीचे पंपसुद्धा उपयुक्त ठरू शकतात.महाराष्ट्रातील विजेचे वितरण मोठ्या प्रमाणावर असल्याचे लक्षात घेता सौरपंप अत्यंत दुर्गम ठिकाणीच उपयुक्त ठरतील. त्याऐवजी, सरकार आणि महावितरणने शेतकºयांसोबत काम करून ग्रिडपुरवठा आणि सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि दुसरीकडे शेतकºयांना बिले नियमितपणे भरण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.सोलर फीडर्स योजनेमध्ये कृषी फीडर्सला ३ मेगावॉट सोलार प्लांट जोडले जातात. कृषी फीडर मुख्यत्वे कृषी पंपांना वीजपुरवठा करतात. प्रत्येक फीडरमध्ये सुमारे ५०० ते ८०० पंप आहेत. अशा योजनेत शेतकºयांना होणारा फायदा म्हणजे सक्तीचा दिवसाचा पुरवठा होय. परंतु सर्व ८ हजार कृषी फीडर्ससाठी अनेक छोटे सोलार प्लांट ही प्रत्यक्षात येणारी उपाययोजना नाही. आणि हे खाली नमूद केल्याप्रमाणे काही मोठ्या वीज केंद्रांसोबत शक्य होईल.ग्रिड ही पाइपच्या नेटवर्कसारखी असून वीजकारखाने नेटवर्कला जोडलेल्या पाण्याच्या अनेक टाक्यांसारखे आहेत. नेटवर्कला जोडलेल्या नळातून पाणी घेतले जाते, तेव्हा ते कोणत्या टाकीतून येते हे माहीत नसते आणि ते महत्त्वाचेही नसते. तसेच, एका विशिष्ट फीडरला जोडलेल्या सौरकेंद्रातून पंपाला वीजपुरवठा होतो किंवा विविध ठिकाणी असलेल्या मोठ्या सौरऊर्जा कारखान्यांमधून होतो, याने फारसा फरक पडत नाही.(आय.आय.टी. मुंबई)